शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

वेळीच सावध व्हा, अंघोळीला अतिगरम पाणी; थंडीत ‘हार्ट अटॅक’चा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 19:50 IST

पुन्हा एकदा थंडीत वाढ; गरम पाण्याने अंघोळ केल्यास मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते. शरीराला आराम मिळतो. मात्र...

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून शहरात पुन्हा एकदा थंडी वाढू लागली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी विविध उपाय केले जातात. सकाळी अंघोळ करताना अनेकजण अतिगरम पाणी घेतात. मात्र, अतिगरम पाण्याने अंघोळ करणे, हे हृदयरोगाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे वेळीच सावध झालेले बरे.

हृदयरुग्णांसाठी अतिगरम पाणी टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हलक्या गार पाण्याने अंघोळ करणे किंवा शरीराचा तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी तापमानाच्या मध्यम पातळीवरील पाणी वापरणे योग्य ठरते. गरम पाण्याने अंघोळ करीत असताना शरीराच्या सहनशक्तीचा विचार करणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

तणावमुक्तीसाठी गरम पाण्याची अंघोळगरम पाण्याने अंघोळ केल्यास मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते. शरीराला आराम मिळतो. मात्र, अतिगरम पाण्याने अंघोळ करणे टाळावे.

स्नायू मोकळे होतात, रक्तप्रवाह सुरळीत होतोगरम पाण्याने अंघोळ केल्याने स्नायू सैल होतात. स्नायूच्या वेदना कमी होण्यासही मदत होते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

कडक पाणी, साबणाने अंग तडकतेकडक पाणी आणि साबणाने अंघोळ केल्यास हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्वचा तडकण्याचाही प्रकार होतो. त्वचा संवेदनशील होऊन खाज येऊ शकते.

कडक पाण्याने अंघोळ केल्यासरक्तदाब वाढणे : कडक आणि थंड पाणी शरीरावर काहीसा शॉकसारखा परिणाम करते. थंड पाणी शरीराला तत्काळ प्रतिक्रिया देण्यासाठी उत्तेजित करते, ज्यामुळे रक्तवाहिन्या संकुचित होतात आणि रक्तदाब वाढू शकतो.हृदयावर ताण वाढणे : थंड पाण्याने अंघोळ केल्याने हृदयाला अधिक मेहनत करावी लागते, कारण शरीराला तापमानाच्या बदलापासून वाचविण्यासाठी हृदयाला अधिक रक्तप्रवाहाची आवश्यकता असते. हे हृदयावर अतिरिक्त ताण आणू शकते.

हृदयरुग्णांनो, थंडीत ही काळजी घ्याथंडीत शक्यतो बाहेर जाणे टाळावे. उबदार कपडे परिधान करावे. रूम वार्मरचाही उपयोग करता येईल. अतिथंड, अतिगरम अन्नपदार्थ, पेय टाळले पाहिजे. हृदयरोग, मधुमेह, रक्तदाबाची औषधी नियमितपणे घ्यावी.

कोमट पाणी फायदेशीरथंड अथवा अतिगरम पाणी अंघोळीसाठी घेणे टाळावे. अंघोळीसाठी कोमट पाणी घेणे फायदेशीर राहते.- डाॅ. गणेश सपकाळ, हृदयरोगतज्ज्ञ

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHealthआरोग्य