शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

काळजी घ्या, छत्रपती संभाजीनगरात प्रत्येक दहापैकी चार रुग्ण सौम्य उष्माघाताचे

By मुजीब देवणीकर | Updated: May 9, 2024 13:08 IST

नागरिकांनी काळजी घ्यावी, पाणी जास्त प्यावे

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या आरोग्य केंद्रांसह ‘अपना दवाखाना’मध्ये दहापैकी किमान चार रुग्णांना सौम्य उष्माघाताचा त्रास झाल्याचे निदर्शनास येत आहे. उलट्या, अतिसार, ताप, मळमळ, अस्वस्थ वाटणे, अशा प्रकारचे रुग्ण मोठ्या प्रमाणात येत आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रात रुग्णांना औषधी दिली जात असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.

१ मेपासून सूर्य आग ओकत आहे. रविवार, दि.५ मेपासून तापमान ४१ ते ४२ अंशापर्यंत जात आहे. दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत उष्माघाताचा धोका अधिक असतो. डोक्याला, कानाला रुमाल बांधलेला नसेल, तर निश्चितच उष्माघाताचा फटका बसण्याची दाट शक्यता असते. हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार उष्णतेची लाट येण्यापूर्वीच मनपाच्या सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना देण्यात आली होती. तापमानात वाढ होताच सकाळी आणि संध्याकाळी महापालिकेचे आरोग्य केंद्र, अपना दवाखान्यात किंचित उष्माघात असलेल्या रुग्णांची संख्या वाढू लागली.

डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले की, आरोग्य केंद्रांवर सौम्य उष्माघात असलेल्या रुग्णांची संख्या निश्चितच वाढली आहे. प्रत्येक केंद्रावर ओआरएस पाकिटांसह औषधीसाठाही देण्यात आला आहे. उन्हाचा किंचितही त्रास जाणवत असेल, तर रुग्णाने जवळच्या रुग्णालयात धाव घ्यायला हवी. वेळेवर औषधोपचार होणे महत्त्वाचे आहे. घराबाहेर पडताना नागरिकांनी डोके आणि कान रुमालाने झाकले पाहिजेत. दिवसभरात जास्तीत पाण्याचे सेवन करायला हवे, असेही त्यांनी नमूद केले. सर्व आरोग्य केंद्रांवर दिवसभरात १,१०० ते १,२०० रुग्ण येत आहेत. त्यातील काही रुग्णांना अत्यंत सौम्य उष्माघात असल्याचे निदर्शनास येत आहे.

तापमानातील चढ-उतार- ३ मे-----४०.४-४ मे -----४१.६-५ मे ------४१.६-६ मे ------४१.२-७ मे ------४०.८-८ मे ------४०.२

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHeat Strokeउष्माघातHealthआरोग्य