शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

काळजी घ्या, छत्रपती संभाजीनगरात प्रत्येक दहापैकी चार रुग्ण सौम्य उष्माघाताचे

By मुजीब देवणीकर | Updated: May 9, 2024 13:08 IST

नागरिकांनी काळजी घ्यावी, पाणी जास्त प्यावे

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या आरोग्य केंद्रांसह ‘अपना दवाखाना’मध्ये दहापैकी किमान चार रुग्णांना सौम्य उष्माघाताचा त्रास झाल्याचे निदर्शनास येत आहे. उलट्या, अतिसार, ताप, मळमळ, अस्वस्थ वाटणे, अशा प्रकारचे रुग्ण मोठ्या प्रमाणात येत आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रात रुग्णांना औषधी दिली जात असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.

१ मेपासून सूर्य आग ओकत आहे. रविवार, दि.५ मेपासून तापमान ४१ ते ४२ अंशापर्यंत जात आहे. दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत उष्माघाताचा धोका अधिक असतो. डोक्याला, कानाला रुमाल बांधलेला नसेल, तर निश्चितच उष्माघाताचा फटका बसण्याची दाट शक्यता असते. हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार उष्णतेची लाट येण्यापूर्वीच मनपाच्या सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना देण्यात आली होती. तापमानात वाढ होताच सकाळी आणि संध्याकाळी महापालिकेचे आरोग्य केंद्र, अपना दवाखान्यात किंचित उष्माघात असलेल्या रुग्णांची संख्या वाढू लागली.

डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले की, आरोग्य केंद्रांवर सौम्य उष्माघात असलेल्या रुग्णांची संख्या निश्चितच वाढली आहे. प्रत्येक केंद्रावर ओआरएस पाकिटांसह औषधीसाठाही देण्यात आला आहे. उन्हाचा किंचितही त्रास जाणवत असेल, तर रुग्णाने जवळच्या रुग्णालयात धाव घ्यायला हवी. वेळेवर औषधोपचार होणे महत्त्वाचे आहे. घराबाहेर पडताना नागरिकांनी डोके आणि कान रुमालाने झाकले पाहिजेत. दिवसभरात जास्तीत पाण्याचे सेवन करायला हवे, असेही त्यांनी नमूद केले. सर्व आरोग्य केंद्रांवर दिवसभरात १,१०० ते १,२०० रुग्ण येत आहेत. त्यातील काही रुग्णांना अत्यंत सौम्य उष्माघात असल्याचे निदर्शनास येत आहे.

तापमानातील चढ-उतार- ३ मे-----४०.४-४ मे -----४१.६-५ मे ------४१.६-६ मे ------४१.२-७ मे ------४०.८-८ मे ------४०.२

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHeat Strokeउष्माघातHealthआरोग्य