शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सावधान ! आणखी एका महिलेची ट्रॅव्हल बस प्रवासात १ लाख ३० हजारांची बॅग चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 20:05 IST

नेवाशाजवळ आल्यावर त्यांना जाग आली तेव्हा त्यांची दागिने आणि पैसे असलेली बॅग चोरी झाल्याचे दिसले.

ठळक मुद्दे बसचालक आणि क्लीनर यांना आवाज देऊन बस थांबवा आणि जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी बस थांबविली नाही. औरंगाबादला प्रवासी उतरल्यावर त्यांनी बस क्रांतीचौक ठाण्यात नेली.

औरंगाबाद : मुंबईहून ट्रॅव्हल बसने औरंगाबादला आलेल्या महिलेची १ लाख ३० हजार रुपयांची बॅग प्रवासादरम्यान चोरी झाली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. हा गुन्हा पुढील तपासासाठी नेवासा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

क्रांतीचौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. जी. एच. दराडे यांनी सांगितले की, तक्रारदार रंजना शिरसाट या २८ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता मुंबईतून डॉल्फिन ट्रॅव्हलच्या बसने औरंगाबादला येत होत्या. तीन बॅग सीटजवळ ठेवून त्या बसमध्ये झोपल्या. नेवाशाजवळ आल्यावर त्यांना जाग आली तेव्हा त्यांची दागिने आणि पैसे असलेली बॅग चोरी झाल्याचे दिसले. त्यांनी बसचालक आणि क्लीनर यांना आवाज देऊन बस थांबवा आणि जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी बस थांबविली नाही. औरंगाबादला प्रवासी उतरल्यावर त्यांनी बस क्रांतीचौक ठाण्यात नेली. तेथे शिरसाट यांनी तक्रार नोंदविली. त्यांच्या बॅगमध्ये एक लाख रुपयाचे सोन्याचे दागिने आणि रोख ३० हजार रुपये होते. ते चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादtheftचोरी