शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

महायुतीच्या प्रतिष्ठेची तर आघाडीच्या अस्तित्वाची लढाई

By admin | Updated: June 13, 2014 00:35 IST

मारूती कदम, उमरगा लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या उमरगा विधानसभा मतदारसंघातील सर्वच पक्षांची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

मारूती कदम, उमरगालोकसभा निवडणुकीनंतर राजकीय प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या उमरगा विधानसभा मतदारसंघातील सर्वच पक्षांची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. या मतदारसंघातून महायुतीला तब्बल ३५ हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक महायुतीच्या प्रतिष्ठेची तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाची मानण्यात येत आहे. त्यानुसार विधानसभेचा गड जिंकण्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणीस सुरुवात झाली आहे. औश्याचे विद्यमान आ. बसवराज पाटील यांच्यामुळे या तालुक्यात गेल्या २० वर्षाच्या कालावधीत काँग्रेस पक्षाला आपले वर्चस्व प्रस्थापित करता आले. पहिल्याच प्रयत्नात पाटील यांना आमदारकी आणि राज्यमंत्रीपदही मिळाले. त्यांच्या रुपाने उमरगा मतदारसंघात काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यानंतर हा मतदारसंघ आरक्षित झाल्याने आमदार पाटील यांनी औसा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. औसा आणि उमरगा या दोन्ही मतदारसंघात त्यांनी काँग्रेसचे वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. आमदार पाटील आगामी विधानसभेसाठी ज्या उमेदवाराची शिफारस करतील, त्या उमेदवारालाच काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार आहे. सन २००९ साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे नवखे उमेदवार ज्ञानराज चौगुले व काँग्रेसचे बी. पी. गायकवाड यांच्यात लढत होऊन त्यामध्ये चौगुले यांनी बाजी मारली होती. काँग्रेसचे कार्यकर्ते प्रा. डी. के. कांबळे यांनी या निवडणुकीत बंडखोरी केली होती. मागील पाच वर्षाच्या कालावधीत या विधानसभा मतदारसंघात पंचायत समिती, जि. प. च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे वर्चस्व अबाधित ठेवण्यात या पक्षाला यश आले असले तरी उमरगा पालिकेची निवडणूक जिंकून महायुतीने शहरात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. राजकीय प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या या विधानसभा मतदारसंघात आमदार बसवराज पाटील व खा. प्रा. रविंद्र गायकवाड, आ. ज्ञानराज चौगुले, आ. सतीश चव्हाण, प्रा. सुरेश बिराजदार, बापूराव पाटील, संताजी चालुक्य, जि. प. अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, जिल्ह्याच्या राजकारणातील सर्व महत्वाची पदे या विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडे असल्याने राजकीयदृष्ट्या हा विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यात प्रतिष्ठेचा मानला जात आहे. महायुतीतून आमदार ज्ञानराज चौगुले यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी गेल्या अनेक दिवसापासून चढाओढ सुरू आहे. प्रा. डी. के. कांबळे हे काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय झाल्याने उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची चर्चा आहे. मागील निवडणुकीत पराभूत झालेले डॉ. बी. पी. गायकवाड हे पुन्हा उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आमदार बसवराज पाटील यांच्या निकटचे कार्यकर्ते दिलीप भालेराव यांचेही नाव पुढे येऊ शकते. दुसरीकडे महायुतीसाठी नवनिर्वाचित खासदार प्रा. रवींद्र गायकवाड सांगतील त्याच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडणार असल्याने बसवराज पाटील व खा. रविंद्र गायकवाड यांच्याकडेच या दोन्ही पक्षातील इच्छुकांच्या नजरा खिळल्या आहेत. गाव पुढारी सज्जमागील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा कालावधी अत्यल्प असल्याने लोकसभा निवडणूक कालावधी दरम्यान या मतदारसंघातील पं. स. सदस्य, जि. प. सदस्य, ग्रा. पं. सदस्य, सरपंच, उपसरपंच यांच्यापर्यंत पक्षाची मदत पोहोचली नाही. विधानसभा निवडणूक मात्र मर्यादित असल्याने या निवडणुकीत उमेदवारांना गाव पुढाऱ्यांना अधिक महत्व द्यावे लागणार आहे. त्यामुळेच गाव पुढारीही निवडणुकीचा रागरंग लुटण्यासाठी सज्ज झाले आहेत. २००९ च्या निवडणुकीत पडलेली मते्नआ. ज्ञानराज चौगुले : ७०,८०६डॉ. बी. पी. गायकवाड : ६०,४७४म्हन्तय्या स्वामी :१३,९५४राम गायकवाड : २०६२दत्तात्रय कांबळे : १८२३