शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार विद्यार्थ्यांना हंगामी वसतिगृहाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2016 23:23 IST

परभणी : शिक्षण विभागाच्या सर्व शिक्षा अभियान विभागाच्या वतीने जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी ४३ ठिकाणी हंगामी वसतिगृह सुरू केले

परभणी : शिक्षण विभागाच्या सर्व शिक्षा अभियान विभागाच्या वतीने जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी ४३ ठिकाणी हंगामी वसतिगृह सुरू केले असून, या वसतिगृहाच्या माध्यमातून २ हजार १०४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळामुळे या विद्यार्थ्यांना या वसतिगृहांचा लाभ होताना दिसत आहे.राज्यातील मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आहेत. या साखर कारखान्यावर अवलंबून असलेल्या मजुरांची संख्याही मोठी आहे. जिल्ह्यातून कामगारही मोठ्या प्रमाणावर ऊस तोडणीसाठी जात असतात. तसेच जिल्ह्यात साखर कारखान्यावर बरेच कामगार अवलंबून आहेत. मजुरांससोबत त्यांची पाल्यही त्यांच्यासोबत जात होते. त्यामुळे या पाल्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत होता. शिक्षणात सातत्य राहत नसल्याने शाळाबाह्यमुलांच्या संख्येमध्ये वाढ होते. तसेच कामही हंगामी असल्याने काही पाल्यांना शाळेत जावेसे वाटले तरी या दरम्यानच्या काळात बराच अभ्यासक्रम वाया जात होता. ही बाब लक्षात घेऊन शिक्षण विभागाने हंगामी निवासी वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला. ऊसतोड कामगारांचे पाल्य शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शाळेमध्ये त्यांच्या निवासाची सोय व्हावी, या उद्देशाने सुरू केलेले वसतिगृह या पाल्यांसाठी लाभदायक ठरताना दिसत आहेत. जिल्ह्यामध्ये २०१५-१६ या वर्षामध्ये ४३ वसतिगृहांना मान्यता दिली असून यामध्ये २ हजार १०४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये पालम तालुक्यात रामपूर तांडा, रेवा तांडा, सिरसम, चाटोरी, लांडकवाडी, सोनेरी तांडा आशा ६ वसतिगृहांमध्ये २८० विद्यार्थी, मानवत तालुक्यात रामेटाकळी, किन्होळा बु., कोल्हा, कुंभारी तांडा, सारंगापूर, केकरजवळा अशा ६ वसतिगृहांमध्ये २३०, पाथरी तालुक्यातील बाबूलतार, देवनांद्रा ग्रामीण, मसला तांडा, कानसूर वस्ती, कानसूर, पाथरगव्हाण बु., कासापुरी, गुंज खूर्द अशा ८ वसतिगृहामध्ये ४६२ विद्यार्थी, परभणी तालुक्यात आमडापूर, ब्रह्मपुरी तांडा, विजयनगर तांडा, ताडलिमला अशा ४ वसतिगृहामध्ये १२७ विद्यार्थी, गंगाखेड तालुक्यातील सुप्पा तांडा, बोथी, बोथी तांडा, घटांग्रा, चंदू नाईक तांडा, थावरू नाईक तांडा, बडवणी, इसाद, बोर्डा, इरळद, गोदावरी तांडा, दामपुरी, देवकतवाडी, ढवळकेवाडी, पिंपळदरी, वरवंटी, धर्मापुरी तांडा, देवला नाईक तांडा, धारासूर तांडा अशा १९ वसतिगृहामध्ये १ हजार ५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १ डिसेंबरपासून हे वसतिगृह सुरू झाले असून ३१ मार्चपर्यंत चालणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)