शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:37 IST

साने गुरुजींच्या कार्याचा वसा घेतलेल्या आणि त्यांच्या नावाने सुरू असलेल्या नाशिक येथील शिक्षण संस्थेने आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या पाल्यांना मोफत शिक्षणाचा आधार देण्याची जबाबदारी उचलली आहे.

नाशिक : साने गुरुजींच्या कार्याचा वसा घेतलेल्या आणि त्यांच्या नावाने सुरू असलेल्या नाशिक येथील शिक्षण संस्थेने आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या पाल्यांना मोफत शिक्षणाचा आधार देण्याची जबाबदारी उचलली आहे. केवळ नाशिकमध्येच नव्हे तर नगर जिल्ह्यातील अशा पाल्यांसाठीदेखील योजना आखण्यात आली आहे. नाशिक आणि नगर या जिल्ह्यांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या पाल्यांसाठी अनेक संस्था काम करीत आहेत. या माध्यमातून त्यांनी आश्रय मिळाला असला तरी शिक्षणाचा आधार देण्याचे काम साने गुरुजी शिक्षण संस्थेने घेतले आहे.आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबातील मुलांना प्राथमिक वर्गापासून ते पदवीपर्यंतचे सर्व शिक्षण कोणत्याही शुल्काशिवाय देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रवीण जोशी यांनी सांगितले. या योजनेत विद्यार्थ्यांना वर्षभर लागणारी पुस्तके, वह्या, गणवेश, परीक्षा शुल्क, प्रवासाचा खर्च आदींचा समावेश असून, हा सर्व खर्च संस्था करणार आहे. यासाठी शाळेचे शिक्षक आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. शेतकºयांनी आत्महत्या केल्यानंतर त्याच्या मुलांचे शिक्षण संपून जाते. त्यांना निवारा मिळतो, कसेबसे पोटही भरते, परंतु शिक्षणापासून ही मुले वंचित राहू नयेत म्हणून साने गुरुजींच्या विचाराने प्रेरित संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरीStudentविद्यार्थीSchoolशाळा