बोगस कागदपत्रांच्या आधारे सैन्यात भरती झालेल्या ३७ जवांनाना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 19:08 IST2017-08-10T19:04:12+5:302017-08-10T19:08:46+5:30

बनावट रहिवासी प्रमाणपत्र आणि राष्ट्रीयत्वाचा दाखल सादर करून भारतीय सैन्य दलात दाखल झालेल्या ३७ जवांनाना छावणी पोलिसांनी बुधवारी ( दि. ९ ) अटक केली.

On the basis of a bogus document, the arrest of 37 young men in the army was arrested | बोगस कागदपत्रांच्या आधारे सैन्यात भरती झालेल्या ३७ जवांनाना अटक

बोगस कागदपत्रांच्या आधारे सैन्यात भरती झालेल्या ३७ जवांनाना अटक

ठळक मुद्दे २०१५ मधील नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात औरंगाबादेत भारतीय सैन्य दलाचा भरती मेळावा झाला होता.२३ मे २०१६ रोजी कॅप्टन मोहनपाल सिंग यांच्या तक्रारीवरुन छावणी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.बनावट सही, शिक्का वापरूनबनवले प्रमाणपत्र

ऑनलाईन लोकमत 

औरंगाबाद, दि. १० :  बनावट रहिवासी प्रमाणपत्र आणि राष्ट्रीयत्वाचा दाखल सादर करून भारतीय सैन्य दलात दाखल झालेल्या ३७ जवांनाना छावणी पोलिसांनी बुधवारी ( दि. ९ ) अटक केली. या आरोपींना न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. गतवर्षी २३ मे २०१६ रोजी कॅप्टन मोहनपाल सिंग यांच्या तक्रारीवरुन याविषयी छावणी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

याविषयी अधिक माहिती देताना छावणी पोलिसांनी सांगितले की,  २०१५ मधील नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात औरंगाबादेत भारतीय सैन्य दलाचा भरती मेळावा झाला होता. या मेळाव्यात हजारो तरूण सहभागी झाले होते. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची सैन्य दलाने  निवड केली होती. त्यांनी दाखल केल्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी छावणीतील सैन्य भरती अधिका-यांनी केली.यावेळी ३७ उमेदवारांनी उमेदवारांनी औरंगाबाद,वैजापुर, धुळे, चाळीसगाव, साक्री आदी ठिकाणच्या तहसील कार्यालयाचे रहिवासी प्रमाणपत्र व  राष्ट्रीयत्वाचा दाखला सादर केल्याचे समोर आले. 

उमेदवारांच्या कागदपत्राविषयी शंका वाटत असल्याने कॅप्टन मोहनलपाल सिंग यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन याविषयी तक्रार दिली होती. आयुक्तांनी हे प्रकरण चौकशीसाठी आर्थिक गुन्हेशाखेकडे सोपविले होते. पोलीस उपनिरीक्षक सुभाष खंडागळे यांनी या तक्रारीच्या अनुषंगाने प्राप्त कागदपत्र व  उमेदवारांनी सैन्य दलास सादर केलेले रहिवासी आणि राष्ट्रीयत्वाचा दाखल्याची सत्यता पडताळण्यात आली. ज्या कार्यालयाचे प्रमाणपत्र सादर केले त्या कार्यालयास पत्र पाठवून त्यांनी त्यांची सत्यता तपासली असता ३७ उमेदवारांनी दाखल केलेले राष्ट्रीयत्वचा दाखला आणि रहिवासी प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले.

आरोपींनी संबंधित तहसील कार्यालय, उपविभागीय अधिका-यांचा बनावट सही शिक्का वापरून हे प्रमाणपत्र तयार केल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी गतवर्षी २३ मे  २०१६ रोजी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आणि याबाबतचा अहवाल सैन्य दलास देण्यात आला होता. दरम्यान या सर्व आरोपींना छावणी पोलिसांनी बुधवारी अटक केली.या आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी ठोठावल्याची माहिती पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी दिली. ते म्हणाले की, या आरोपींना आज गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. 

बनावट सही, शिक्का वापरून बनवले प्रमाणपत्र
यातील काही आरोपी जवान हे मूळचे सोलापुर, कोल्हापुर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. यातील ११ जवानांनी वैजापुर तहसील कार्यालयाचे, अन्य ११ जवानांनी औरंगाबाद तहसील कार्यालयाचे तर उर्वरित आरोपींनी जहगाव, धुळे, चाळीसगाव आणि साक्री तहसीलचे बनावट प्रमाणपत्र जोडले होते.
 

Web Title: On the basis of a bogus document, the arrest of 37 young men in the army was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.