टंचाईत ‘इम्पती’चा लातूरवासीयांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2016 00:02 IST2016-05-09T23:58:37+5:302016-05-10T00:02:44+5:30
बाळासाहेब जाधव ल्ल लातूर जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी मुंबईच्या इंम्पती संस्थेच्या पुढाकारातून ४० बोअर घेतले आहेत़ एकूण बोअर पैकी त्यातील ३६ बोअरला पाणी लागले आहे़

टंचाईत ‘इम्पती’चा लातूरवासीयांना आधार
बाळासाहेब जाधव ल्ल लातूर
जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी मुंबईच्या इंम्पती संस्थेच्या पुढाकारातून ४० बोअर घेतले आहेत़ एकूण बोअर पैकी त्यातील ३६ बोअरला पाणी लागले आहे़ जिल्ह्यातील पाणी पातळी व टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन आणखी ६० बोअर घेण्यात संकल्प इंम्पती फाऊंडेशनने घेतला आहे़
लातूर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे़ गेल्या ३ वर्षापासून पर्जन्यमानच होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ स्थानिक प्रकल्पासह जलस्त्रोतातील पाणीसाठा आटल्याने लातूर शहरासाठी मिरजेहून रेल्वेने पाणी आणावे लागत आहे़ अशा परिस्थितीमध्ये दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून मुंबई येथील इंम्पती फाऊंडेश्नच्या वतीने लातूर जिल्ह्यातील चाकूर, रेणापूर या तालुक्यासह इतर तालुक्यातही बोअर घेऊन मोटर बसवून चार तोट्या बसवून त्याद्वारे २४ तास पाणीपुरवठा सुरु ठेवण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे़ आजपर्यंत ४० बोअर घेण्यात आले आहेत़ त्या एकूण बोअर पैकी ३६ बोअरला पाणी लागले आहे़ तर ४ बोअर फेल गेले आहेत़ पाणी लागलेल्या बोअर पैकी कोणत्या बोरला १़५ इंच, २़५ इंच, ३ इंच याप्रमाणात पाणी लागल्याने दुष्काळी परिस्थितीत त्या-त्या गावातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे़
६० बोअर घेणाऱ़़
शहरासह जिल्हाभरातील पाणीटंचाईच्या परिसरात दिवसेंदिवस गंभीर होत आहे़ या पुर्वीचे जलस्त्रोत आटल्याने नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे, अशा परिस्थतीमध्ये आधार मिळावा म्हणून मुंबई येथील इंम्पती फाऊंडेशनच्या वतीने घेतलेल्या ४० बोअरपैकी ३६ बोअरला पाणी लागले आहे़ यामुळे काही प्रमाणात शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनाही दिलासा मिळाल्याने आणखी ६० बोअर घेण्याचा संकल्प संस्थेचे ईश्वर मानकरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे़