शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

बंजारा समाजाचा आक्रोश मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:44 AM

हनुमंतखेडा, ता. सोयगाव येथील सीमा राठोड या अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून करणाºया नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी आज हनुमंतखेडा अत्याचार विरोधी कृती समितीने बंजारा आक्रोश मूक मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : हनुमंतखेडा, ता. सोयगाव येथील सीमा राठोड या अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून करणाºया नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी आज हनुमंतखेडा अत्याचार विरोधी कृती समितीने बंजारा आक्रोश मूक मोर्चा काढला. तो भव्यदिव्य ठरला, लक्ष वेधून घेणारा ठरला. या मोर्चाने बंजारा समाजाची जणू ताकदच दाखवून दिली. मोर्चात बंजारा तरुण- तरुणींचा सहभाग लक्षणीय होता. विधानपरिषदेचे सदस्यद्वय प्रा.जोगेंद्र कवाडे व हरिभाऊ राठोड हे मोर्चात पायी चालले. सीमा राठोडचे आई- वडीलही या मोर्चात सहभागी झाले होते. पण कृती समितीच्या निर्णयानुसार तीन मुलींव्यतिरिक्त मोर्चाच्या समारोपस्थळी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर झालेल्या सभेत अन्य कुणीही बोलले नाही. विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन या मुलींनीच दिले.सकाळपासून औरंगाबादचा क्रांतीचौक बंजारा स्त्री- पुरुषांनी फुलत होता. तांड्यातांड्यातून बंजारा बंधू-भगिनी येतच राहिल्या. सकाळी ११ वाजता निघणारा हा मोर्चा दुपारी १ च्या सुमारास क्रांतीचौकातून मार्गक्रमण करू लागला. दोन दोनच्या रांगेत शिस्तीत हा मोर्चा सुरू झाला. मोर्चाच्या अग्रभागी भलेमोठे बॅनर धरून पारंपरिक वेशभूषेतील बंजारा महिला चालत होत्या. त्यापाठोपाठ बंजारा तरुणी चालत होत्या. नंतर मोठ्या संख्येने सहभागी झालेला बंजारा तरुण वर्ग होता. जवळपास प्रत्येकाच्याच हातात ‘ जय सेवालाल’चे झेंडे होते आणि बहुतेकांच्या हातात मागण्यांचे फलक झळकत होते. अनेक स्त्री- पुरुषांच्या डोक्यावर टोप्या होत्या आणि त्यावर ‘सीमा राठोडच्या मारेकºयांना फाशी द्या’ असे लिहिलेले होते.यापुढे सीमा राठोड घडणार नाहीमूक मोर्चा असल्यामुळे कुणीही घोषणाबाजी केली नाही. शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून हा मोर्चा दुपारी अडीचच्या सुमारास विभागीय आयुक्तालयावर धडकला. तेथील भव्य पटांगणात मोर्चेकरी बसून गेले. तेथे झालेल्या सभेत रविना राठोड, वृंदा पवार व भारती राठोड या तीन मुलींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. तिघींनीही जय सेवालाल म्हणत आपल्या भाषणाचा शेवट केला. रविना राठोड म्हणाली, सीमा राठोडसारखी वेळ कुणावरही येऊ नये.महिलांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान दिले जाते, असे सांगितले जाते, पण स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचा तरी अधिकार आहे काय? हा खरा प्रश्न आहे. दररोज स्त्रियांवर अन्याय- अत्याचार होतच आहेत. पण यापुढे तरी सीमा राठोड घडणार नाही, याची काळजी आता सर्वांनी घेतली पाहिजे.न्यायालयीन चौकशी करा -कवाडेसभास्थळीच आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, विधानपरिषदेत मी आणि हरिभाऊ राठोड यांनी सीमा राठोड हत्या प्रकरण उचलले होते. कारवाई होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. अद्याप साधे चार्जशीटसुद्धा दाखल झालेले नाही. या अन्याय- अत्याचार सहज घेतले जातात, असा आरोपही प्रा. कवाडे यांनी यावेळी केला. गरिबांच्या लेकीबाळी म्हणजे भाजीपाला आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला.या मोर्चात ध्वनिक्षेपकावरून राजपालसिंग राठोड हे बंजारा भाषेतच सूचना देत होते. मागणीपत्रावर डॉ. कृष्णा राठोड, राजेंद्र प्रल्हाद राठोड, अनिल चव्हाण, गोरखनाथ राठोड, रमेश पवार, पी. एम. पवार, नीलेश चव्हाण, सुनील चव्हाण, शरयू राठोड, कलाबाई राठोड, (पान ५ वर)