शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेब आमची प्रेरणा : ‘तुम्ही शांतपणे शिकवा... विचलित होऊ नका...’, असे म्हणून बाबासाहेब निघून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 16:16 IST

मिलिंद महाविद्यालयातील प्राध्यापकाविरोधातील तक्रारींची शहानिशा स्वतः बाबासाहेबांनी केली

'मिलिंद'च्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी तथा प्रख्यात समीक्षक डॉ. सुधीर रसाळ सांगतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे महान विचारवंत होते. साधारणपणे १९४८-४९ च्या काळात औरंगाबादेत केवळ इंटरपर्यंतच शिक्षणाची सुविधा होती. पुढील शिक्षणासाठी हैदराबादला जावे लागत असे. माझे वडील सरस्वती भुवन शाळेत शिक्षक होते. १९५० साली दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर बाबासाहेबांनी सुरू केलेल्या पीईएस कॉलेजमध्ये मी प्रवेश घेतला. सुरुवातीला पीईएस कॉलेज व मग नंतर मिलिंद महाविद्यालय, असा या महाविद्यालयाच्या नावाचा प्रवास. सुरुवातीला छावणीतील मिलिटरीच्या बॅरेक्समध्ये वर्ग भरायचे. बाबासाहेबांचा संपूर्ण भर हा शैक्षणिक गुणवत्तेवर होता. सुरुवातीला बाबासाहेबांनी महाविद्यालयासाठी निष्णात आणि तज्ज्ञ प्राध्यापक मुंबई येथून आणले.

बाबासाहेबांना वाटायचे की आपण मराठवाड्यात कॉलेज सुरू करीत आहोत, तर इथलेही प्राध्यापक घ्यावेत. मात्र, त्यावेळी या भागात फारसे उच्चशिक्षित कोणी नव्हते. एक-दोघे होते. त्यांच्याकडे बाबासाहेबांचे अत्यंत विश्वासू प्राचार्य म.भि. चिटणीस गेले. तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये शिकविण्यासाठी यावे, अशी विनंती केली; परंतु त्यांनी असमर्थता दर्शविली. मिलिंदमध्ये शिकविणारे प्राध्यापक वेगवेगळ्या राजकीय विचारांचे, जाती-धर्मांचे आणि अत्यंत विद्वान होते. त्याचप्रमाणे या महाविद्यालयात वेगवेगळ्या जाती-धर्मांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकण्यासाठी यावेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचा सहवास लाभावा, असा कृतिशील व उदारमतवादी दृष्टिकोन बाबासाहेबांचा होता. त्यावेळी महाविद्यालयात एकूण १५० विद्यार्थी होते. त्यामध्ये अवघे १५-२० मागासवर्गीय विद्यार्थी होते. 

मी बी.ए. प्रथम वर्षात होतो. त्यावेळी विद्यार्थ्यांनी एका प्राध्यापकाच्या अनेक तक्रारी प्राचार्य म.भि. चिटणीस यांच्याकडे केल्या. बाबासाहेब दरवर्षी साधारणपणे जून- जुलैमध्ये औरंगाबादेत येत असत. तेव्हा त्यांना ही बाब समजली. वर्ग सुरू असताना मागच्या दरवाजातून हळूच बाबासाहेब वर्गात आले व बाकावर बसले. आमचे लक्ष समोर फळ्याकडे असल्यामुळे बाबासाहेब मागे बसलेले असल्याचे समजलेच नाही; परंतु प्राध्यापकाला मात्र, घाम फुटला. बाबासाहेबांविषयी सर्वांनाच आदरयुक्त भीती होती. तब्बल १५-२० मिनिटे बाबासाहेब बाकावर बसून होते. प्राध्यापक विचलित झालेले पाहून ‘तुम्ही शांतपणे शिकवा... विचलित होऊ नका...’, असे म्हणून बाबासाहेब निघून गेले. विद्यार्थ्यांचा समज झाला की, आता त्या प्राध्यापकाची खैर नाही. बाबासाहेब त्यांना काढून टाकतील; पण तसे काही झाले नाही. बाबासाहेब तक्रारींची दखल घेत. स्वत: त्यातील तथ्य तपासत व मगच निर्णय घेत असत. हा त्यांचा अलौकिक गुण होता. 

( संकलन : विजय सरवदे )

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरNagsen vanनागसेन वन