शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

बाबासाहेब आमची प्रेरणा : ‘तुम्ही शांतपणे शिकवा... विचलित होऊ नका...’, असे म्हणून बाबासाहेब निघून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 16:16 IST

मिलिंद महाविद्यालयातील प्राध्यापकाविरोधातील तक्रारींची शहानिशा स्वतः बाबासाहेबांनी केली

'मिलिंद'च्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी तथा प्रख्यात समीक्षक डॉ. सुधीर रसाळ सांगतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे महान विचारवंत होते. साधारणपणे १९४८-४९ च्या काळात औरंगाबादेत केवळ इंटरपर्यंतच शिक्षणाची सुविधा होती. पुढील शिक्षणासाठी हैदराबादला जावे लागत असे. माझे वडील सरस्वती भुवन शाळेत शिक्षक होते. १९५० साली दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर बाबासाहेबांनी सुरू केलेल्या पीईएस कॉलेजमध्ये मी प्रवेश घेतला. सुरुवातीला पीईएस कॉलेज व मग नंतर मिलिंद महाविद्यालय, असा या महाविद्यालयाच्या नावाचा प्रवास. सुरुवातीला छावणीतील मिलिटरीच्या बॅरेक्समध्ये वर्ग भरायचे. बाबासाहेबांचा संपूर्ण भर हा शैक्षणिक गुणवत्तेवर होता. सुरुवातीला बाबासाहेबांनी महाविद्यालयासाठी निष्णात आणि तज्ज्ञ प्राध्यापक मुंबई येथून आणले.

बाबासाहेबांना वाटायचे की आपण मराठवाड्यात कॉलेज सुरू करीत आहोत, तर इथलेही प्राध्यापक घ्यावेत. मात्र, त्यावेळी या भागात फारसे उच्चशिक्षित कोणी नव्हते. एक-दोघे होते. त्यांच्याकडे बाबासाहेबांचे अत्यंत विश्वासू प्राचार्य म.भि. चिटणीस गेले. तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये शिकविण्यासाठी यावे, अशी विनंती केली; परंतु त्यांनी असमर्थता दर्शविली. मिलिंदमध्ये शिकविणारे प्राध्यापक वेगवेगळ्या राजकीय विचारांचे, जाती-धर्मांचे आणि अत्यंत विद्वान होते. त्याचप्रमाणे या महाविद्यालयात वेगवेगळ्या जाती-धर्मांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकण्यासाठी यावेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचा सहवास लाभावा, असा कृतिशील व उदारमतवादी दृष्टिकोन बाबासाहेबांचा होता. त्यावेळी महाविद्यालयात एकूण १५० विद्यार्थी होते. त्यामध्ये अवघे १५-२० मागासवर्गीय विद्यार्थी होते. 

मी बी.ए. प्रथम वर्षात होतो. त्यावेळी विद्यार्थ्यांनी एका प्राध्यापकाच्या अनेक तक्रारी प्राचार्य म.भि. चिटणीस यांच्याकडे केल्या. बाबासाहेब दरवर्षी साधारणपणे जून- जुलैमध्ये औरंगाबादेत येत असत. तेव्हा त्यांना ही बाब समजली. वर्ग सुरू असताना मागच्या दरवाजातून हळूच बाबासाहेब वर्गात आले व बाकावर बसले. आमचे लक्ष समोर फळ्याकडे असल्यामुळे बाबासाहेब मागे बसलेले असल्याचे समजलेच नाही; परंतु प्राध्यापकाला मात्र, घाम फुटला. बाबासाहेबांविषयी सर्वांनाच आदरयुक्त भीती होती. तब्बल १५-२० मिनिटे बाबासाहेब बाकावर बसून होते. प्राध्यापक विचलित झालेले पाहून ‘तुम्ही शांतपणे शिकवा... विचलित होऊ नका...’, असे म्हणून बाबासाहेब निघून गेले. विद्यार्थ्यांचा समज झाला की, आता त्या प्राध्यापकाची खैर नाही. बाबासाहेब त्यांना काढून टाकतील; पण तसे काही झाले नाही. बाबासाहेब तक्रारींची दखल घेत. स्वत: त्यातील तथ्य तपासत व मगच निर्णय घेत असत. हा त्यांचा अलौकिक गुण होता. 

( संकलन : विजय सरवदे )

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरNagsen vanनागसेन वन