शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

बाबा, तुझ्या पाऊलखुणा शिक्षणासाठी दिशादर्शक; महामानव अन् छत्रपती संभाजीनगरचे अतूट नाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 19:52 IST

महापरिनिर्वाण दिन विशेष: नागसेवन परिसरात १९५० साली मिलिंद महाविद्यालय सुरू झाले. बाबासाहेबांच्या निगराणीखाली या महाविद्यालयाची इमारत, वसतिगृहाची इमारत उभारली गेली. त्यासाठी ते या शहरात सन १९४५ ते १९५६ पर्यंत सतत यायचे व अनेक दिवस त्यांचा येथे मुक्काम असायचा.

छत्रपती संभाजीनगर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आणि या शहराचे नाते अतुट आहे. मिलिंद महाविद्यालयाची उभारणी करण्यापूर्वी देखील बाबासाहेब अनेकदा या शहरात येऊन गेले. या प्रदेशातील समाजाची दयनीय अवस्था आणि उच्चशिक्षणाची असुविधा बाबासाहेबांना अस्वस्थ करणारी होती. म्हणूनच त्यांनी येथे मिलिंद महाविद्यालयाची उभारणी करून उच्चशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. या शहराला लाभलेला त्यांचा पदस्पर्श मागील तीन पिढ्यांपासून दिशादर्शकच ठरला आहे.

नागसेवन परिसरात १९५० साली मिलिंद महाविद्यालय सुरू झाले. बाबासाहेबांच्या निगराणीखाली या महाविद्यालयाची इमारत, वसतिगृहाची इमारत उभारली गेली. त्यासाठी ते या शहरात सन १९४५ ते १९५६ पर्यंत सतत यायचे व अनेक दिवस त्यांचा येथे मुक्काम असायचा. सुरुवातीला छावणीतील बंगला क्रमांक ९ मध्ये त्यांचे वास्तव्य होते. त्यावेळी महाविद्यालयाच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात येत असताना छावणीत ते ज्या बंगल्यात राहायचे, त्याच्या बाजूलाच बंगला क्रमांक ७ व ८ मध्ये मिलिंद महाविद्यालयाच्या तासिका चालायच्या. तेथेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची देखील सोय होती. मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे ‘अजिंठा’ हाॅस्टेल, मिलिंद कला महाविद्यालयाचे राउंड हाॅस्टेल व मिलिंद हायस्कूल या इमारतीचे प्लॅन कोणा वास्तूशास्त्रज्ञाचे नव्हे तर स्वत: बाबासाहेबांनीच तयार केले होते. पहिल्या बॅचपासून आज तिसरी पिढी नागसेवनातील शैक्षणिक संकुलांमध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडली असून देशात विविध सर्वोच्च पदांवर कार्यरत आहे.

आजही छावणीतील बंगला क्रमांक ९ असेल, बंगला क्रमांक ७ व ८ असेल. याशिवाय मिलिंद महाविद्यालयातील त्यांच्या वापरात असलेल्या खुर्ची, विविध काठ्या, पलंग, गादी, टॉवेल्स, जेवणाची भांडी, महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये बाबासाहेबांनी हाताळलेले अनेक ग्रंथ, ज्यात त्यांनी अनेक पानांवर पेन्सिलने अधोरेखीत केलेेले दिसून येत आहे. ज्ञानज्योत तेवत ठेवणाऱ्या बाबासाहेबांच्या आठवणींचा हा दुर्मीळ ठेवा आजही तरुणांसाठी दिशादर्शक आणि प्रेरणा देणारा आहे.

छावणीतील ७,८ व ९ या क्रमांकांच्या बंगल्यांची आठवणस्वत: बाबासाहेबांनी आपल्या देखरेखीत उभारलेल्या मिलिंद महाविद्यालयास ऐतिहासिक महत्त्व आहे. या इमारतीला प्राचीन वारसा स्थळाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी महाविद्यालय प्रशासनाने शासनाकडे केली आहे, तर दुसरीकडे, छावणीतील ७,८ व ९ या क्रमांकांच्या बंगल्यांची आठवण पुढील पिढीला मार्गदर्शक राहील, यासाठी या परिसरात बाबासाहेबांचे स्मारक उभारावे, अशी मागणी शहरातील सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारकडे केली. कारण, ही जागा केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाच्या ताब्यात आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने या मागण्यांना उजाळा देण्याचा हा प्रयत्न.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरNagsen vanनागसेन वन