शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
2
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
3
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
4
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
5
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
6
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
7
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
8
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
9
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स
10
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
11
तुम्ही देखील सोने-चांदी खरेदी करुन घरात ठेवलंय? CA नितीन कौशिक म्हणतात ही गुंतवणूक नाही तर...
12
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण 
13
Suryakumar Yadav: श्रेयसच्या दुखापतीची बातमी मिळताच सूर्याचा फिजिओला फोन, आता कशी आहे त्याची तब्येत?
14
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
15
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
16
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
17
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
18
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
19
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
20
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक

बाबा, तुझ्या पाऊलखुणा शिक्षणासाठी दिशादर्शक; महामानव अन् छत्रपती संभाजीनगरचे अतूट नाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 19:52 IST

महापरिनिर्वाण दिन विशेष: नागसेवन परिसरात १९५० साली मिलिंद महाविद्यालय सुरू झाले. बाबासाहेबांच्या निगराणीखाली या महाविद्यालयाची इमारत, वसतिगृहाची इमारत उभारली गेली. त्यासाठी ते या शहरात सन १९४५ ते १९५६ पर्यंत सतत यायचे व अनेक दिवस त्यांचा येथे मुक्काम असायचा.

छत्रपती संभाजीनगर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आणि या शहराचे नाते अतुट आहे. मिलिंद महाविद्यालयाची उभारणी करण्यापूर्वी देखील बाबासाहेब अनेकदा या शहरात येऊन गेले. या प्रदेशातील समाजाची दयनीय अवस्था आणि उच्चशिक्षणाची असुविधा बाबासाहेबांना अस्वस्थ करणारी होती. म्हणूनच त्यांनी येथे मिलिंद महाविद्यालयाची उभारणी करून उच्चशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. या शहराला लाभलेला त्यांचा पदस्पर्श मागील तीन पिढ्यांपासून दिशादर्शकच ठरला आहे.

नागसेवन परिसरात १९५० साली मिलिंद महाविद्यालय सुरू झाले. बाबासाहेबांच्या निगराणीखाली या महाविद्यालयाची इमारत, वसतिगृहाची इमारत उभारली गेली. त्यासाठी ते या शहरात सन १९४५ ते १९५६ पर्यंत सतत यायचे व अनेक दिवस त्यांचा येथे मुक्काम असायचा. सुरुवातीला छावणीतील बंगला क्रमांक ९ मध्ये त्यांचे वास्तव्य होते. त्यावेळी महाविद्यालयाच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात येत असताना छावणीत ते ज्या बंगल्यात राहायचे, त्याच्या बाजूलाच बंगला क्रमांक ७ व ८ मध्ये मिलिंद महाविद्यालयाच्या तासिका चालायच्या. तेथेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची देखील सोय होती. मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे ‘अजिंठा’ हाॅस्टेल, मिलिंद कला महाविद्यालयाचे राउंड हाॅस्टेल व मिलिंद हायस्कूल या इमारतीचे प्लॅन कोणा वास्तूशास्त्रज्ञाचे नव्हे तर स्वत: बाबासाहेबांनीच तयार केले होते. पहिल्या बॅचपासून आज तिसरी पिढी नागसेवनातील शैक्षणिक संकुलांमध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडली असून देशात विविध सर्वोच्च पदांवर कार्यरत आहे.

आजही छावणीतील बंगला क्रमांक ९ असेल, बंगला क्रमांक ७ व ८ असेल. याशिवाय मिलिंद महाविद्यालयातील त्यांच्या वापरात असलेल्या खुर्ची, विविध काठ्या, पलंग, गादी, टॉवेल्स, जेवणाची भांडी, महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये बाबासाहेबांनी हाताळलेले अनेक ग्रंथ, ज्यात त्यांनी अनेक पानांवर पेन्सिलने अधोरेखीत केलेेले दिसून येत आहे. ज्ञानज्योत तेवत ठेवणाऱ्या बाबासाहेबांच्या आठवणींचा हा दुर्मीळ ठेवा आजही तरुणांसाठी दिशादर्शक आणि प्रेरणा देणारा आहे.

छावणीतील ७,८ व ९ या क्रमांकांच्या बंगल्यांची आठवणस्वत: बाबासाहेबांनी आपल्या देखरेखीत उभारलेल्या मिलिंद महाविद्यालयास ऐतिहासिक महत्त्व आहे. या इमारतीला प्राचीन वारसा स्थळाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी महाविद्यालय प्रशासनाने शासनाकडे केली आहे, तर दुसरीकडे, छावणीतील ७,८ व ९ या क्रमांकांच्या बंगल्यांची आठवण पुढील पिढीला मार्गदर्शक राहील, यासाठी या परिसरात बाबासाहेबांचे स्मारक उभारावे, अशी मागणी शहरातील सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारकडे केली. कारण, ही जागा केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाच्या ताब्यात आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने या मागण्यांना उजाळा देण्याचा हा प्रयत्न.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरNagsen vanनागसेन वन