शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

बाबा, तुझ्या पाऊलखुणा शिक्षणासाठी दिशादर्शक; महामानव अन् छत्रपती संभाजीनगरचे अतूट नाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 19:52 IST

महापरिनिर्वाण दिन विशेष: नागसेवन परिसरात १९५० साली मिलिंद महाविद्यालय सुरू झाले. बाबासाहेबांच्या निगराणीखाली या महाविद्यालयाची इमारत, वसतिगृहाची इमारत उभारली गेली. त्यासाठी ते या शहरात सन १९४५ ते १९५६ पर्यंत सतत यायचे व अनेक दिवस त्यांचा येथे मुक्काम असायचा.

छत्रपती संभाजीनगर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आणि या शहराचे नाते अतुट आहे. मिलिंद महाविद्यालयाची उभारणी करण्यापूर्वी देखील बाबासाहेब अनेकदा या शहरात येऊन गेले. या प्रदेशातील समाजाची दयनीय अवस्था आणि उच्चशिक्षणाची असुविधा बाबासाहेबांना अस्वस्थ करणारी होती. म्हणूनच त्यांनी येथे मिलिंद महाविद्यालयाची उभारणी करून उच्चशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. या शहराला लाभलेला त्यांचा पदस्पर्श मागील तीन पिढ्यांपासून दिशादर्शकच ठरला आहे.

नागसेवन परिसरात १९५० साली मिलिंद महाविद्यालय सुरू झाले. बाबासाहेबांच्या निगराणीखाली या महाविद्यालयाची इमारत, वसतिगृहाची इमारत उभारली गेली. त्यासाठी ते या शहरात सन १९४५ ते १९५६ पर्यंत सतत यायचे व अनेक दिवस त्यांचा येथे मुक्काम असायचा. सुरुवातीला छावणीतील बंगला क्रमांक ९ मध्ये त्यांचे वास्तव्य होते. त्यावेळी महाविद्यालयाच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात येत असताना छावणीत ते ज्या बंगल्यात राहायचे, त्याच्या बाजूलाच बंगला क्रमांक ७ व ८ मध्ये मिलिंद महाविद्यालयाच्या तासिका चालायच्या. तेथेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची देखील सोय होती. मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे ‘अजिंठा’ हाॅस्टेल, मिलिंद कला महाविद्यालयाचे राउंड हाॅस्टेल व मिलिंद हायस्कूल या इमारतीचे प्लॅन कोणा वास्तूशास्त्रज्ञाचे नव्हे तर स्वत: बाबासाहेबांनीच तयार केले होते. पहिल्या बॅचपासून आज तिसरी पिढी नागसेवनातील शैक्षणिक संकुलांमध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडली असून देशात विविध सर्वोच्च पदांवर कार्यरत आहे.

आजही छावणीतील बंगला क्रमांक ९ असेल, बंगला क्रमांक ७ व ८ असेल. याशिवाय मिलिंद महाविद्यालयातील त्यांच्या वापरात असलेल्या खुर्ची, विविध काठ्या, पलंग, गादी, टॉवेल्स, जेवणाची भांडी, महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये बाबासाहेबांनी हाताळलेले अनेक ग्रंथ, ज्यात त्यांनी अनेक पानांवर पेन्सिलने अधोरेखीत केलेेले दिसून येत आहे. ज्ञानज्योत तेवत ठेवणाऱ्या बाबासाहेबांच्या आठवणींचा हा दुर्मीळ ठेवा आजही तरुणांसाठी दिशादर्शक आणि प्रेरणा देणारा आहे.

छावणीतील ७,८ व ९ या क्रमांकांच्या बंगल्यांची आठवणस्वत: बाबासाहेबांनी आपल्या देखरेखीत उभारलेल्या मिलिंद महाविद्यालयास ऐतिहासिक महत्त्व आहे. या इमारतीला प्राचीन वारसा स्थळाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी महाविद्यालय प्रशासनाने शासनाकडे केली आहे, तर दुसरीकडे, छावणीतील ७,८ व ९ या क्रमांकांच्या बंगल्यांची आठवण पुढील पिढीला मार्गदर्शक राहील, यासाठी या परिसरात बाबासाहेबांचे स्मारक उभारावे, अशी मागणी शहरातील सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारकडे केली. कारण, ही जागा केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाच्या ताब्यात आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने या मागण्यांना उजाळा देण्याचा हा प्रयत्न.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरNagsen vanनागसेन वन