शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

मराठवाड्यात सरासरी ५९ टक्के पावसाची तूट; पेरण्या खोळंबल्या, परिस्थिती गंभीर वळणावर

By विकास राऊत | Updated: July 5, 2023 12:18 IST

धरणांमध्ये केवळ ३३ टक्के पाणी; जून महिन्यात मोठ्या धरणांमध्ये पाण्याची आवक शून्य टक्के

छत्रपती संभाजीनगर : पावसाअभावी मराठवाड्याची परिस्थिती गंभीर वळणावर आली आहे. जून महिन्यातील १३४ मि.मी. सरासरीच्या तुलनेत ५५ मि.मी. पाऊस विभागात झाला आहे. ५९ टक्के पावसाची तूट गेल्या महिन्यात राहिल्यामुळे त्याचा परिणाम खरीप हंगामातील पेरण्यांवर झाला आहे.चार वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करीत असलेल्या आठही जिल्ह्यांत यंदाचा जून महिना समाधानकारक राहिला नाही. जुलै महिन्यात दमदार पाऊस होईल, असे भाकित हवामान खात्याने केले आहे; परंतु पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाऊस लांबल्यास पिण्याच्या पाण्याचे संकट देखील येण्याची शक्यता आहे. संभाव्य परिस्थिती पाहता टँकरने पाणीपुरवठा, विहिरी अधिग्रहण करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.

धरणांमध्ये ३३ टक्के पाणीमराठवाड्यातील ११ मोठ्या धरणांमध्ये ३३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी ४१ टक्के साठा होता. जायकवाडी धरणात २६ टक्के, निम्न दुधना २५, येलदरी ५५, सिद्धेश्वर प्रकल्प कोरडा आहे. माजलगाव प्रकल्पात १६.७१ टक्के, मांजरा २०, पैनगंगा ४२, मानार ३२, निम्न तेरणा २९, विष्णुपुरी ३९, तर सीना कोळेगाव प्रकल्पात ५ टक्के उपयुक्त जलसाठा सध्या आहे.

जूनमध्ये किती पावसाची तूट?विभागाच्या वार्षिक सरासरीनुसार जूनमध्ये १३४ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते. ५५ मि.मी.पाऊस झाला असून, हा ४१ टक्केच पाऊस आहे. त्यामुळे पेरण्या रखडल्या आहेत. जून महिन्याच्या एकूण सरासरीनुसार औरंगाबादमध्ये ५८ टक्के, जालना ४६, बीड ४३, लातूर ४४, धाराशिव २६, नांदेड २९, परभणी ३८, हिंगोलीत २६ टक्के पाऊस झाला आहे.

टँकरचा आकडा शतकाकडे८५ गावे आणि २४ वाड्यांमध्ये ९९ टँकरने पाणीपुरवठा सध्या सुरू आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ४३ गावांना ३७ टँकर, जालना २८ गावांना ४४ टँकर, तर हिंगोलीत १० गावांना १२ टँकर, नांदेडमध्ये ४ गावांना ६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ९५५ विहिरींचे प्रशासनाने अधिग्रहण केले आहे.

पेरण्यांचा टक्का वाढेनामराठवाड्यात आजवर २० टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी ४५ टक्क्यांहून अधिक पेरण्या झाल्या होत्या. पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्यांचा टक्का वाढत नसून याचा परिणाम पीक उत्पादकतेवर होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणRainपाऊसAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी