शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मराठवाड्यात सरासरी ५९ टक्के पावसाची तूट; पेरण्या खोळंबल्या, परिस्थिती गंभीर वळणावर

By विकास राऊत | Updated: July 5, 2023 12:18 IST

धरणांमध्ये केवळ ३३ टक्के पाणी; जून महिन्यात मोठ्या धरणांमध्ये पाण्याची आवक शून्य टक्के

छत्रपती संभाजीनगर : पावसाअभावी मराठवाड्याची परिस्थिती गंभीर वळणावर आली आहे. जून महिन्यातील १३४ मि.मी. सरासरीच्या तुलनेत ५५ मि.मी. पाऊस विभागात झाला आहे. ५९ टक्के पावसाची तूट गेल्या महिन्यात राहिल्यामुळे त्याचा परिणाम खरीप हंगामातील पेरण्यांवर झाला आहे.चार वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करीत असलेल्या आठही जिल्ह्यांत यंदाचा जून महिना समाधानकारक राहिला नाही. जुलै महिन्यात दमदार पाऊस होईल, असे भाकित हवामान खात्याने केले आहे; परंतु पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाऊस लांबल्यास पिण्याच्या पाण्याचे संकट देखील येण्याची शक्यता आहे. संभाव्य परिस्थिती पाहता टँकरने पाणीपुरवठा, विहिरी अधिग्रहण करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.

धरणांमध्ये ३३ टक्के पाणीमराठवाड्यातील ११ मोठ्या धरणांमध्ये ३३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी ४१ टक्के साठा होता. जायकवाडी धरणात २६ टक्के, निम्न दुधना २५, येलदरी ५५, सिद्धेश्वर प्रकल्प कोरडा आहे. माजलगाव प्रकल्पात १६.७१ टक्के, मांजरा २०, पैनगंगा ४२, मानार ३२, निम्न तेरणा २९, विष्णुपुरी ३९, तर सीना कोळेगाव प्रकल्पात ५ टक्के उपयुक्त जलसाठा सध्या आहे.

जूनमध्ये किती पावसाची तूट?विभागाच्या वार्षिक सरासरीनुसार जूनमध्ये १३४ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते. ५५ मि.मी.पाऊस झाला असून, हा ४१ टक्केच पाऊस आहे. त्यामुळे पेरण्या रखडल्या आहेत. जून महिन्याच्या एकूण सरासरीनुसार औरंगाबादमध्ये ५८ टक्के, जालना ४६, बीड ४३, लातूर ४४, धाराशिव २६, नांदेड २९, परभणी ३८, हिंगोलीत २६ टक्के पाऊस झाला आहे.

टँकरचा आकडा शतकाकडे८५ गावे आणि २४ वाड्यांमध्ये ९९ टँकरने पाणीपुरवठा सध्या सुरू आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ४३ गावांना ३७ टँकर, जालना २८ गावांना ४४ टँकर, तर हिंगोलीत १० गावांना १२ टँकर, नांदेडमध्ये ४ गावांना ६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ९५५ विहिरींचे प्रशासनाने अधिग्रहण केले आहे.

पेरण्यांचा टक्का वाढेनामराठवाड्यात आजवर २० टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी ४५ टक्क्यांहून अधिक पेरण्या झाल्या होत्या. पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्यांचा टक्का वाढत नसून याचा परिणाम पीक उत्पादकतेवर होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणRainपाऊसAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी