शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या टाईनी इंडस्ट्रीचे अर्थचक्र बिघडले; मंदीचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 06:51 IST

मंदीचा परिणाम औरंगाबादमधील टाईनी (सूक्ष्म) इंडस्ट्रीवरही झाला आहे.

- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : मंदीचा परिणाम औरंगाबादमधील टाईनी (सूक्ष्म) इंडस्ट्रीवरही झाला आहे. पूर्वी २४ तास जॉबवर्क केले जात होते. आज ६ ताससुद्धा पूर्ण क्षमतेने काम मिळत नाही. यामुळे या सूक्ष्म उद्योगांचे अर्थचक्रच बिघडले आहे.मंदीमुळे या उद्योगांची उलाढाल ६० कोटी रुपयांवरून केवळ ३० कोटी रुपयांवर आली आहे. कर्जाचे हप्ते फेडणे तर सोडाच, पण कामगारांचा पगार वेळेवर करणे अवघड होऊन बसल्याची प्रतिक्रिया उद्योजक व्यक्त करीत आहेत.आॅटोमोबाइल क्षेत्रात मोठी मंदी आहे. याचा सर्वाधिक फटका टाईनी (सूक्ष्म) इंडस्ट्रीला बसला आहे. यात प्रामुख्याने जॉबवर्क करून देणारे सूक्ष्म व लघू उद्योजक आहेत. त्यांच्याकडे भांडवलही कमीच असते. शिवाय जॉबवर्कची रक्कम वेळेवर न मिळाल्यास त्यांचे अर्थचक्र बिघडते. येथील चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील टाईनी इंडस्ट्रीमध्ये मंदीची तीव्रता जाणून येते. इथे सूक्ष्म, लघू, मध्यम मिळून ६ हजारांहून अधिक युनिट आहेत. त्यातील टाईनी इंडस्ट्रीजमध्ये ८० युनिट आहेत. त्यात डायमेकिंग, मशिनिंग, सीएनसी मिलिंग, लेथ, फॅब्रिकेशन, ग्राइंडिंग, कास्टिंग, पॅटर्न मेकर, प्लास्टिक इंडस्ट्रीज, टूल डिझायनिंग, आॅटोमोबाईल रिपेअर्स यांचा समावेश आहे.यांना बसतो फटकाटाईनी इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अनिल वाघ म्हणाले की, जे सूक्ष्म व लघु उद्योजक आॅर्डरनुसार काम करतात त्यांना मंदीचा जास्त फटका बसत आहे. इथे ६५ ते ७० टक्के सूक्ष्म, लघु उद्योग आहेत. टाईनी इंडस्ट्रीज को-आॅपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेटअंतर्गत सर्व ८० उद्योजकांची मिळून वार्षिक उलाढाल ६० कोटी रुपयांपेक्षा अधिक असते. पण जॉबवर्क निम्म्यावर आले आहे.जीएसटीने आगीत तेलसूक्ष्म, लघु उद्योजकांकडे कमी भांडवल असते. जॉबवर्कचे पेमेंट वेळेत न मिळाले नाही तरी पुढील जॉबवर्क चालू ठेवावे लागते. त्यासाठी रॉ मटेरियल खरेदी करणे व विक्रीवर १८ टक्के जीएसटी भरावा लागतो. पूर्वी १२.५ टक्केच व्हॅट भरावा लागत असे. वाढीव जीएसटीमुळे मंदीच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले, असे टाईनी इंडस्ट्रीजचे सचिव सुनील सिसोदिया म्हणाले>या आहेत उद्योजकांच्या मागण्या१) टाईनी इंडस्ट्रीजसाठी सरकारने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. त्या निधीतून उद्योजकांना ३ ते ४%नी कर्ज उपलब्ध करून द्यावे.२) जीएसटी १८ टक्क्यांहून १२ टक्क्यांवर आणावा.३) वाहनावरील २८ टक्के जीएसटी १८ टक्क्यांवर आणावा.४) इलेक्ट्रॉनिक्स वाहन व बीएस-६ वाहनाचे निश्चित धोरण जाहीर करावे.५) औद्योगिक धोरण जाहीर होऊन ५ ते ६ महिने झाले; पण अजूनही मुद्रांक शुल्क माफ झाले नाही.

.