शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

औरंगाबादमध्ये अकरावीच्या १६ हजार जागा रिक्त; आता महाविद्यालयीन स्तरावर मिळणार  प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 18:42 IST

महापालिका हद्दीतील ११२ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या प्रवेश फेऱ्या संपल्या आहेत.

औरंगाबाद : महापालिका हद्दीतील ११२ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेच्या गुणवत्ता यादीप्रमाणे जाहीर होणाऱ्या फेऱ्या संपल्या आहेत. चार नियमित आणि एका विशेष फेरीनंतर १२ हजार ९४९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, तर १६ हजार ४५६ जागा रिक्त असल्याची माहिती शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.

राज्य सरकारने ११ वी प्रवेशासाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर महानगरपालिका क्षेत्रात आॅनलाईन प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला होता. मागील वर्षी उडालेल्या गोंधळानंतर यावर्षी मे महिन्यापासूनच ११ वी प्रवेशासाठी आॅनलाईन नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात आली. दहावीचा निकाल लागताच प्रक्रियेला वेग आला.

या प्रक्रियेसाठी एक निश्चित वेळापत्रक ठरविण्यात आले. या वेळापत्रकानुसार ३१ जुलैपर्यंत सर्व प्रवेश प्रक्रिया संपणार होती; मात्र सुरुवातीला मुंबई, नागपूर येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे वेळापत्रक बदलावे लागले. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पसंख्याक महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेसंदर्भात दिलेल्या आदेशामुळे दोन वेळा वेळापत्रक बदलण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढावली. यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया ३१ आॅगस्टपर्यंत लांबली आहे.

२१ आॅगस्टपर्यंत शिक्षण विभागाने चार गुणवत्ता याद्या आणि एक विशेष प्रवेश फेरी जाहीर केली. यातील पहिल्या चार फेऱ्यांमध्ये सर्वसाधारण आणि अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये १२ हजार ३९१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चिती केली आहे, तर शेवटच्या विशेष फेरीत १७७६ विद्यार्थ्यांचे अलॉटमेंट केले. त्यातील ५५८ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. यामुळे एकूण पाच फेऱ्यांमध्ये १२ हजार ९४९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. ११२ महाविद्यालयांमध्ये २९ हजार ४०५ जागा उपलब्ध आहेत. झालेले प्रवेश आणि उपलब्ध जागांनुसार १६ हजार ४५६ रिक्त राहिल्या आहेत. या रिक्त जागांवर प्रथम येणाऱ्यास प्राधान्यानुसार महाविद्यालयीन स्तरावर प्रवेश देण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने कळविले आहे.

२५ आॅगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत चालणार प्रक्रियाअकरावी प्रवेशाच्या रिक्त राहिलेल्या जागांवर २५ आॅगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत नियमानुसार महाविद्यालयीन स्तरावर प्रवेश देण्यात येणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वाचा वापर केला जाणार आहे. या प्रवेशासाठीही तीन गट केले आहेत. यात पहिल्या गटात ८० ते १०० टक्के गुण प्राप्त विद्यार्थी. दुसऱ्या गटात ६० ते १०० टक्के विद्यार्थी आणि तिसऱ्या गटात दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या गटानुसार प्रवेश निश्चिती केली जाणार आहे.

तासिकांना महिनाभर विलंबअकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेला तब्बल महिनाभर विलंब झाला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार ३१ जुलैपर्यंतच सर्व प्रवेश प्रकिया संपणार होती; मात्र विविध कारणांमुळे एक महिना विलंब झाला आहे. यामुळे महाविद्यालयातील तासिका महिनाभर विलंबाने सुरू होणार आहेत. काही महाविद्यालयांनी १ आॅगस्टपासूनच तासिकांना सुरुवात केली आहे; मात्र ज्या विद्यार्थ्यांनी उशिराने प्रवेश घेतला, त्यांचा अभ्यासक्रम कसा संपवणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

एक नजरमहाविद्यालये : ११२उपलब्ध जागा : २९,४०५झालेले प्रवेश : १२,९४९ रिक्त जागा : १६,४५६

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र