शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

औरंगाबादमध्ये अकरावीच्या १६ हजार जागा रिक्त; आता महाविद्यालयीन स्तरावर मिळणार  प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 18:42 IST

महापालिका हद्दीतील ११२ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या प्रवेश फेऱ्या संपल्या आहेत.

औरंगाबाद : महापालिका हद्दीतील ११२ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेच्या गुणवत्ता यादीप्रमाणे जाहीर होणाऱ्या फेऱ्या संपल्या आहेत. चार नियमित आणि एका विशेष फेरीनंतर १२ हजार ९४९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, तर १६ हजार ४५६ जागा रिक्त असल्याची माहिती शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.

राज्य सरकारने ११ वी प्रवेशासाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर महानगरपालिका क्षेत्रात आॅनलाईन प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला होता. मागील वर्षी उडालेल्या गोंधळानंतर यावर्षी मे महिन्यापासूनच ११ वी प्रवेशासाठी आॅनलाईन नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात आली. दहावीचा निकाल लागताच प्रक्रियेला वेग आला.

या प्रक्रियेसाठी एक निश्चित वेळापत्रक ठरविण्यात आले. या वेळापत्रकानुसार ३१ जुलैपर्यंत सर्व प्रवेश प्रक्रिया संपणार होती; मात्र सुरुवातीला मुंबई, नागपूर येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे वेळापत्रक बदलावे लागले. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पसंख्याक महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेसंदर्भात दिलेल्या आदेशामुळे दोन वेळा वेळापत्रक बदलण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढावली. यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया ३१ आॅगस्टपर्यंत लांबली आहे.

२१ आॅगस्टपर्यंत शिक्षण विभागाने चार गुणवत्ता याद्या आणि एक विशेष प्रवेश फेरी जाहीर केली. यातील पहिल्या चार फेऱ्यांमध्ये सर्वसाधारण आणि अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये १२ हजार ३९१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चिती केली आहे, तर शेवटच्या विशेष फेरीत १७७६ विद्यार्थ्यांचे अलॉटमेंट केले. त्यातील ५५८ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. यामुळे एकूण पाच फेऱ्यांमध्ये १२ हजार ९४९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. ११२ महाविद्यालयांमध्ये २९ हजार ४०५ जागा उपलब्ध आहेत. झालेले प्रवेश आणि उपलब्ध जागांनुसार १६ हजार ४५६ रिक्त राहिल्या आहेत. या रिक्त जागांवर प्रथम येणाऱ्यास प्राधान्यानुसार महाविद्यालयीन स्तरावर प्रवेश देण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने कळविले आहे.

२५ आॅगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत चालणार प्रक्रियाअकरावी प्रवेशाच्या रिक्त राहिलेल्या जागांवर २५ आॅगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत नियमानुसार महाविद्यालयीन स्तरावर प्रवेश देण्यात येणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वाचा वापर केला जाणार आहे. या प्रवेशासाठीही तीन गट केले आहेत. यात पहिल्या गटात ८० ते १०० टक्के गुण प्राप्त विद्यार्थी. दुसऱ्या गटात ६० ते १०० टक्के विद्यार्थी आणि तिसऱ्या गटात दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या गटानुसार प्रवेश निश्चिती केली जाणार आहे.

तासिकांना महिनाभर विलंबअकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेला तब्बल महिनाभर विलंब झाला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार ३१ जुलैपर्यंतच सर्व प्रवेश प्रकिया संपणार होती; मात्र विविध कारणांमुळे एक महिना विलंब झाला आहे. यामुळे महाविद्यालयातील तासिका महिनाभर विलंबाने सुरू होणार आहेत. काही महाविद्यालयांनी १ आॅगस्टपासूनच तासिकांना सुरुवात केली आहे; मात्र ज्या विद्यार्थ्यांनी उशिराने प्रवेश घेतला, त्यांचा अभ्यासक्रम कसा संपवणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

एक नजरमहाविद्यालये : ११२उपलब्ध जागा : २९,४०५झालेले प्रवेश : १२,९४९ रिक्त जागा : १६,४५६

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र