शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

औरंगाबादकरांना आता म्हणे २ दिवसांआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:18 IST

शहरवासीयांना तीन दिवसांआड पाणी देण्यात महापालिका अपयशी ठरलेली असताना आता दोन दिवसांआड पाणी देण्याचे आदेश सोमवारी महापालिकेने काढले आहेत. शिवसेनेच्या नगरसेवकांच्या आग्रहामुळे महापालिका आयुक्तांनी हे आदेश काढले. शिवसेना आणि भाजपमधील श्रेयवादाच्या लढाईत शहरवासीयांचे मात्र पाण्यासाठी हाल सुरू असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देमनपा ‘तीन दिवसांआड’मध्ये नापास : नगरसेवकांच्या दबावामुळे आयुक्तांनी काढले आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरवासीयांना तीन दिवसांआड पाणी देण्यात महापालिका अपयशी ठरलेली असताना आता दोन दिवसांआड पाणी देण्याचे आदेश सोमवारी महापालिकेने काढले आहेत. शिवसेनेच्या नगरसेवकांच्या आग्रहामुळे महापालिका आयुक्तांनी हे आदेश काढले. शिवसेना आणि भाजपमधील श्रेयवादाच्या लढाईत शहरवासीयांचे मात्र पाण्यासाठी हाल सुरू असल्याचे चित्र आहे.शहरातील प्रत्येक वॉर्डाला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करा, असा आदेश ११ मे रोजी काढण्यात आला होता. या आदेशाची आजपर्यंत अंमलबजावणी प्रशासनाला करता आलेली नाही. त्यातच आज पुन्हा मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा, असे आदेश दिले.भाजप नगरसेवकांनी १० मे रोजी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या दालनात ‘झोपा काढा’आंदोलन केले होते. शहरातील सर्व वॉर्डांना समान पाणीवाटप करा, अशी मागणी नगरसेवकांची होती. तत्कालीन प्रभारी आयुक्त उदय चौधरी यांनी ११ मे रोजी शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करा, असे आदेश दिले. आजही शहरातील मोजक्याच वॉर्डांमध्ये तीन दिवसाआड पाणी येते. काही वॉर्डांमध्ये पाचव्या आणि सहाव्या दिवशी पाणी देण्यात येत आहे. तीन दिवसाआड पाण्याचे श्रेय भाजपला जाऊ नये म्हणून महापौर नंदकुमार घोडेलेंनंतर सभापती राजू वैद्य यांनी दोन दिवसाआड पाणी द्या, असा तगादा लावला. पाणीपुरवठा विभाग तीन दिवसाआड पाणी देण्यास असमर्थ ठरत असल्याचा ठपका मनपा आयुक्त निपुण विनायक यांनी प्रभारी कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांच्यावर ठेवला. चहल यांच्याकडील पदभार काढून घेत कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना देण्यात आला. त्यानंतरही सुधारणा झाली नाही. जिकडे-तिकडे पाण्यासाठी ओरड सुरूच आहे. अनेक वॉर्डांत पाचव्या आणि सहाव्या दिवशी पाणी येत असल्याची परिस्थिती आहे.अनेक वॉर्डांतसहाव्या दिवशी पाणीशहागंज पाण्याच्या टाकीवर अवलंबून असलेल्या १८ वॉर्डांना आजही सहाव्या दिवशीच पाणीपुरवठा करण्यात येत आहे. भीमनगर, भावसिंगपुरा, नंदनवन कॉलनी परिसरात मूळ वेळापत्रकानुसार तिसऱ्या दिवशी पाणी देण्याची योजना आहे; मात्र याठिकाणी चौथ्या दिवशी पाणी येते.नियोजनच नाहीसोमवारी सकाळी आयुक्त डॉ. विनायक यांनी शिवसेनेच्या दबावाला बळी पडत कार्यालयीन ‘आदेश’काढले. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून, पाणीपुरवठा विभागाने दोन दिवसांआड पाणीपुरवठा करावा, असेहीआदेशात नमूद केले आहे; मात्र महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे यासंबंधीचे कोणतेच नियोजन नसल्याचे समोर येत आहे.भाजपचे कचरा अस्त्र४शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा आदेश काढल्यानंतर महापालिकेत भाजप बॅकफूटवर आली होती. सायंकाळी भाजपने कच-याचे अस्त्र बाहेर काढून सेनेला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न केला. भाजप नगरसेवकांच्या वॉर्डांमध्ये मागील काही महिन्यांपासून शंभर टक्के ओला व सुका कचरा वेगळा करून प्रक्रिया करण्यात येत आहे.४या भागातील ओल्या कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून मशीन बसविण्याची मागणी आज मनपा आयुक्तांकडे भाजपच्या सर्व नगरसेवकांनी केली. आयुक्तांनी ही मागणी मान्य केली. कचरा प्रशासनात प्रशासनाला सहकार्य करणाºया वॉर्डांना विकास निधीत झुकते माप द्यावे, असेही यावेळी नमूद करण्यात आले. भाजप आणि मित्रपक्षाच्या नगरसेवकांचे पाच वॉर्ड आदर्श करून दाखविण्यात येणार आहेत.४उपमहापौर विजय औताडे यांच्या दालनात भाजप नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनाही बोलावण्यात आले. शिष्टाचार बाजूला ठेवून आयुक्तही उपमहापौरांच्या दालनात पोहोचले. महापालिकेत भाजपचे २३ नगरसेवक आहेत. प्रशासनाने २३ नगरसेवकांच्या वॉर्डांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी मशीन बसवून देण्याची मागणी आयुक्तांनी मान्य केली. भाजप नगरसेवकांच्या वॉर्डांमध्ये दुसºया वॉर्डांचा कचरा अजिबात आणण्यात येऊ नये, असेही मत भाजप नगरसेवकांनी व्यक्त केले. बैठकीला दिलीप थोरात, पूनम बमणे, सुरेंद्र कुलकर्णी, शिवाजी दांडगे, बालाजी मुंढे, राज वानखेडे, माधुरी अदवंत, कीर्ती शिंदे, पुष्पा रोजतकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :water shortageपाणीकपातAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नwater scarcityपाणी टंचाई