शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादकरांना आता म्हणे २ दिवसांआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:18 IST

शहरवासीयांना तीन दिवसांआड पाणी देण्यात महापालिका अपयशी ठरलेली असताना आता दोन दिवसांआड पाणी देण्याचे आदेश सोमवारी महापालिकेने काढले आहेत. शिवसेनेच्या नगरसेवकांच्या आग्रहामुळे महापालिका आयुक्तांनी हे आदेश काढले. शिवसेना आणि भाजपमधील श्रेयवादाच्या लढाईत शहरवासीयांचे मात्र पाण्यासाठी हाल सुरू असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देमनपा ‘तीन दिवसांआड’मध्ये नापास : नगरसेवकांच्या दबावामुळे आयुक्तांनी काढले आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरवासीयांना तीन दिवसांआड पाणी देण्यात महापालिका अपयशी ठरलेली असताना आता दोन दिवसांआड पाणी देण्याचे आदेश सोमवारी महापालिकेने काढले आहेत. शिवसेनेच्या नगरसेवकांच्या आग्रहामुळे महापालिका आयुक्तांनी हे आदेश काढले. शिवसेना आणि भाजपमधील श्रेयवादाच्या लढाईत शहरवासीयांचे मात्र पाण्यासाठी हाल सुरू असल्याचे चित्र आहे.शहरातील प्रत्येक वॉर्डाला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करा, असा आदेश ११ मे रोजी काढण्यात आला होता. या आदेशाची आजपर्यंत अंमलबजावणी प्रशासनाला करता आलेली नाही. त्यातच आज पुन्हा मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा, असे आदेश दिले.भाजप नगरसेवकांनी १० मे रोजी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या दालनात ‘झोपा काढा’आंदोलन केले होते. शहरातील सर्व वॉर्डांना समान पाणीवाटप करा, अशी मागणी नगरसेवकांची होती. तत्कालीन प्रभारी आयुक्त उदय चौधरी यांनी ११ मे रोजी शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करा, असे आदेश दिले. आजही शहरातील मोजक्याच वॉर्डांमध्ये तीन दिवसाआड पाणी येते. काही वॉर्डांमध्ये पाचव्या आणि सहाव्या दिवशी पाणी देण्यात येत आहे. तीन दिवसाआड पाण्याचे श्रेय भाजपला जाऊ नये म्हणून महापौर नंदकुमार घोडेलेंनंतर सभापती राजू वैद्य यांनी दोन दिवसाआड पाणी द्या, असा तगादा लावला. पाणीपुरवठा विभाग तीन दिवसाआड पाणी देण्यास असमर्थ ठरत असल्याचा ठपका मनपा आयुक्त निपुण विनायक यांनी प्रभारी कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांच्यावर ठेवला. चहल यांच्याकडील पदभार काढून घेत कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना देण्यात आला. त्यानंतरही सुधारणा झाली नाही. जिकडे-तिकडे पाण्यासाठी ओरड सुरूच आहे. अनेक वॉर्डांत पाचव्या आणि सहाव्या दिवशी पाणी येत असल्याची परिस्थिती आहे.अनेक वॉर्डांतसहाव्या दिवशी पाणीशहागंज पाण्याच्या टाकीवर अवलंबून असलेल्या १८ वॉर्डांना आजही सहाव्या दिवशीच पाणीपुरवठा करण्यात येत आहे. भीमनगर, भावसिंगपुरा, नंदनवन कॉलनी परिसरात मूळ वेळापत्रकानुसार तिसऱ्या दिवशी पाणी देण्याची योजना आहे; मात्र याठिकाणी चौथ्या दिवशी पाणी येते.नियोजनच नाहीसोमवारी सकाळी आयुक्त डॉ. विनायक यांनी शिवसेनेच्या दबावाला बळी पडत कार्यालयीन ‘आदेश’काढले. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून, पाणीपुरवठा विभागाने दोन दिवसांआड पाणीपुरवठा करावा, असेहीआदेशात नमूद केले आहे; मात्र महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे यासंबंधीचे कोणतेच नियोजन नसल्याचे समोर येत आहे.भाजपचे कचरा अस्त्र४शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा आदेश काढल्यानंतर महापालिकेत भाजप बॅकफूटवर आली होती. सायंकाळी भाजपने कच-याचे अस्त्र बाहेर काढून सेनेला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न केला. भाजप नगरसेवकांच्या वॉर्डांमध्ये मागील काही महिन्यांपासून शंभर टक्के ओला व सुका कचरा वेगळा करून प्रक्रिया करण्यात येत आहे.४या भागातील ओल्या कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून मशीन बसविण्याची मागणी आज मनपा आयुक्तांकडे भाजपच्या सर्व नगरसेवकांनी केली. आयुक्तांनी ही मागणी मान्य केली. कचरा प्रशासनात प्रशासनाला सहकार्य करणाºया वॉर्डांना विकास निधीत झुकते माप द्यावे, असेही यावेळी नमूद करण्यात आले. भाजप आणि मित्रपक्षाच्या नगरसेवकांचे पाच वॉर्ड आदर्श करून दाखविण्यात येणार आहेत.४उपमहापौर विजय औताडे यांच्या दालनात भाजप नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनाही बोलावण्यात आले. शिष्टाचार बाजूला ठेवून आयुक्तही उपमहापौरांच्या दालनात पोहोचले. महापालिकेत भाजपचे २३ नगरसेवक आहेत. प्रशासनाने २३ नगरसेवकांच्या वॉर्डांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी मशीन बसवून देण्याची मागणी आयुक्तांनी मान्य केली. भाजप नगरसेवकांच्या वॉर्डांमध्ये दुसºया वॉर्डांचा कचरा अजिबात आणण्यात येऊ नये, असेही मत भाजप नगरसेवकांनी व्यक्त केले. बैठकीला दिलीप थोरात, पूनम बमणे, सुरेंद्र कुलकर्णी, शिवाजी दांडगे, बालाजी मुंढे, राज वानखेडे, माधुरी अदवंत, कीर्ती शिंदे, पुष्पा रोजतकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :water shortageपाणीकपातAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नwater scarcityपाणी टंचाई