शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

औरंगाबादकरांच्या स्वप्नातील ‘स्मार्ट बस’ रस्त्यावर आलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:35 PM

महापालिकेने रविवारी बराच गाजावाजा करून युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ‘स्मार्ट बस’चे लोकार्पण केले. सोमवारपासून शहर बस रस्त्यावर धावतील... आपण त्यात बसू, असे स्वप्न औरंगाबादकरांनी रंगविले होते. नागरिकांच्या स्वप्नांवर पाणी फेरण्याचे काम महापालिकेने केले. सोमवारी एकही बस शहरातील रस्त्यांवर धावली नाही. मनपाला प्राप्त झालेल्या चारही बस आरटीओ कार्यालयात पासिंगच्या प्रक्रियेत अडकल्या होत्या. त्यामुळे वर्षअखेरपर्यंत बससेवा सुरू होईल किंवा नाही, याची अजिबात शाश्वती नाही.

ठळक मुद्देलोकार्पणानंतर : आरटीओच्या पासिंगमध्ये अडकल्या बस

औरंगाबाद : महापालिकेने रविवारी बराच गाजावाजा करून युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ‘स्मार्ट बस’चे लोकार्पण केले. सोमवारपासून शहर बस रस्त्यावर धावतील... आपण त्यात बसू, असे स्वप्न औरंगाबादकरांनी रंगविले होते. नागरिकांच्या स्वप्नांवर पाणी फेरण्याचे काम महापालिकेने केले. सोमवारी एकही बस शहरातील रस्त्यांवर धावली नाही. मनपाला प्राप्त झालेल्या चारही बस आरटीओ कार्यालयात पासिंगच्या प्रक्रियेत अडकल्या होत्या. त्यामुळे वर्षअखेरपर्यंत बससेवा सुरू होईल किंवा नाही, याची अजिबात शाश्वती नाही.महापालिका प्रशासन, पदाधिकाऱ्यांना बस खरेदीची बरीच घाई झाली होती. टाटा कंपनीकडून ३६ लाख रुपयांमध्ये एक बस खरेदी करण्यात आली. तब्बल १०० बसची आॅर्डर कंपनीला देण्यात आली आहे. कर्नाटकच्या धारवाड येथे बसची बांधणी सुरू आहे. आतापर्यंत मनपाला चार बस प्राप्त झाल्या आहेत. रविवारी महापालिकेने युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शहर बसचे लोकार्पण केले. पहिल्या भाग्यवान ग्राहकाला तिकीटही देण्यात आल्याची घोषणा केली. सोमवारी किमान चार बस शहरातील प्रमुख मार्गांवर धावतील, असे औरंगाबादकरांना वाटत होते. कारण मागील आठ दिवसांमध्ये महापालिकेने शहर बसची जोरदार मार्केटिंग केली होती. सोमवारी एकही बस मनपाने रस्त्यावर आणली नाही. कंपनी आणि मनपाचे अधिकारी पासिंगच्या प्रक्रियेत होते. दिवसभरात एकाच बसची पासिंग झाली. बुधवारी उर्वरित बसची पासिंग होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.४३ बस कधी येणार...शहर बस चालविण्याची जबाबदारी एस.टी. महामंडळ पार पाडणार आहे. पहिल्या टप्प्यात ४० ते ४५ बस येतील, असे सांगण्यात आले होते. डिसेंबरअखेपर्यंत मनपाला फक्त ४ बस प्राप्त झाल्या आहेत. उर्वरित ४३ बस जानेवारी महिन्यात येतील, असे सांगण्यात येत आहे. एस.टी. महामंडळाने तूर्त ४० बस चालविण्याचे नियोजन केले आहे. उर्वरित ६० बस चालविण्यासाठी महामंडळाला मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती करावी लागणार आहे.बसथांबे जशास तसेमहापालिकेने मोठा गाजावाजा करून शहर बसचे लोकार्पण तर केले; परंतु आतापर्यंत मनपाने एकही बसथांबा अद्ययावत केलेला नाही. स्मार्ट सिटीतील बसथांबे अद्ययावत राहतील, अशी घोषणा मनपाकडूनच करण्यात आली होती. बसथांबे कोठे असावेत, याचेही नियोजन मनपाने आजपर्यंत केलेले नाही. त्यासाठी लागणाºया खर्चाकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. फक्त बस खरेदी करून एस.टी. महामंडळाला देण्याचीच घाई मनपाला होती.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBus Driverबसचालक