शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

पाणी मिळेना, कचरा हटेना; पथदिवे लागेनात; चार महिन्यांपासून औरंगाबादकर मेटाकुटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 11:32 IST

पाणी मिळेना, कचरा हटेना आणि पथदिवे लागेना, अशा त्रांगड्यात नागरिक मेटाकुटीने दिवस काढीत आहेत.

ठळक मुद्दे११९ दिवसांपासून शहरातील कचरा समस्येमुळे नागरिक वैतागले आहेत

औरंगाबाद : ११९ दिवसांपासून शहरातील कचरा समस्येमुळे नागरिक वैतागले आहेत, तर ६० दिवसांपासून पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना महागडे टँकरचे पाणी घ्यावे लागते आहे. त्यातच आता पावसाळ्याच्या तोंडावर पथदिव्यांचा लपंडाव सुरू झाला आहे. सेवा, सुरक्षा, विकासाचे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या पालिका सत्ताधाऱ्यांनी नागरिकांना पाणी-पाणी करण्याची वेळ आणली आहे. पाणी मिळेना, कचरा हटेना आणि पथदिवे लागेना, अशा त्रांगड्यात नागरिक मेटाकुटीने दिवस काढीत आहेत.

कधी पहाटे तर कधी रात्री तर कधी दिवसा, अशा पद्धतीने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक सध्या सुरू असून, आठवड्यातून चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा करण्याचा नवीन पायंडा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाडल्यामुळे शहरवासीय मेटाकुटीला आले आहेत. मुबलक पाणीपुरवठा होत असतानादेखील नियोजनाअभावी नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येत आहे.

आठवड्यात नियोजन कराअडीच महिन्यांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. प्रशासनाने तीन दिवसांआड पाणी देण्याचे नियोजन करूनही नागरिकांना पाणी मिळत नाही. शहरात पाण्याची ओरड कायम आहे. पाणीपुरवठा विभागाने येत्या आठवड्यात दोन दिवसांआड पाणी देण्याचे नियोजन करावे, असे आदेश स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य यांनी गुरुवारी दिले.

दूषित पाणीपुरवठाकोणत्याही दिवशी पाणीपुरवठा होत असल्यामुळे जलवाहिनीत साचलेले आणि नव्याने सोडण्यात आलेले पाणी दूषित होऊन ते नळांना येत आहे. त्यामुळे कावीळसारखे आजार होऊ लागले आहेत. पुंडलिकनगर परिसरात लहान मुलांना ताप येणे, उलट्या होण्यासारखे आजार होऊ लागले आहेत. हा प्रकार शहरातील बहुतांश भागात होतो आहे. स्थायी समितीमध्ये नगरसेवकांनी दूषित पाणीपुरवठ्यावरून आकांडतांडव केले.

नगरसेवकांचा संतापशहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून, साथरोगांचा संसर्ग होण्याची शक्यता बळावली आहे. कचऱ्याच्या ढिगांमुळे दुर्गंधी पसरत आहे. शहराच्या स्वच्छतेवरून स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील कचऱ्याच्या प्रश्नावर नगरसेवक संतप्त झाले.

महापौरांचे मुख्यमंत्र्यांना पत्रघनकचरा व्यवस्थापनासाठी घनसावंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांना ४ महिने महापालिकेत कायम ठेवावे, अशी मागणी करणारे पत्र महापौर नंदकुमार घोडेले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. ९ मार्चपासून मांडुरके पालिकेत शासनाच्या आदेशाने कचरा समस्या सोडविण्यासाठी कार्यरत झाले आहेत. दरम्यान, अंबडचे मुख्याधिकारी नंदकुमार भोंबे बुधवारी सहायक आयुक्त म्हणून महापालिकेत रुजू झाले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादWaterपाणी