शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

औरंगाबाद जिल्हापरिषदेत चुरस; महाविकास आघाडी की, भाजप  मारणार बाजी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 13:02 IST

औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीच्या पक्षांची तीन वर्षांपासून सत्ता आहे.

ठळक मुद्देभाजपने जोरदार तयारी केल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे.सत्ता स्थापन करण्यासाठी ३१ सदस्यांचे संख्याबळ आवश्यक आहे.

औरंगाबाद : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी (दि.३) होणाऱ्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी सत्ता कायम राखणार की, भाजप चमत्कार घडविणार याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. भाजपने जोरदार तयारी केल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीच्या पक्षांची तीन वर्षांपासून सत्ता आहे. ही सत्ता कायम राखण्याचा विश्वास शिवसेना, काँग्रेसचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. मात्र त्याच वेळी सर्वात मोठा पक्ष होऊनही सत्तेपासून वंचित राहिलेल्या भाजपने यावेळी सत्ता मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. 

सत्ता स्थापन करण्यासाठी ३१ सदस्यांचे संख्याबळ आवश्यक आहे. भाजपकडे स्वत:चे २३ सदस्य असून, त्यांना आठ सदस्य कमी पडत आहेत. आठ सदस्यांची संख्या जुळविण्यासाठी गंगापूरचे आमदार प्रशांत बंब, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड आणि अध्यक्षपदाच्या उमेदवार अनुराधा चव्हाण हे प्रयत्न करीत आहेत. चार सदस्यांचा पाठिंबा मिळविण्यात भाजप यशस्वी ठरली आहे. आणखी चार सदस्यांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. यात काँग्रेसच्या एका गटाला फोडण्यासह शिवसेनेतील असंतुष्ट सदस्यही गळाला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.

याविषयी बोलण्यास भाजपचा एकही पदाधिकारी तयार नाही. मात्र शुक्रवारी जि.प.मध्ये चमत्कार होणार असल्याचा दावा केला जात आहे. त्याच वेळी महाविकास आघाडी भक्कम असल्याचेही शिवसेना नेत्यांकडून सांगितले जात आहे. जिल्ह्याला दोन मंत्रीपदे मिळाली असल्यामुळे शिवसेनेला जि.प.ची सत्ता ताब्यात ठेवणे अनिवार्य बनले आहे. त्याच वेळी भाजपही शिवसेनेला धक्का देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. काँग्रेसच्या काही सदस्यांना निवडणूक प्रक्रियेत अनुपस्थित राहण्यास भाग पाडत संख्याबळ कमी करण्यात येऊ शकते, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

भाजपचे ठरले, शिवसेनेचे गुलदस्त्यातभाजपकडून अध्यक्षपदासाठी अनुराधा चव्हाण यांचे नाव अंतिम करण्यात आले असल्याचे समजते. त्याच वेळी शोभा काळे यासुद्धा ऐनवेळच्या उमेदवार असू शकतात. मात्र शिवसेनेच्या गोटातून कोणाला उमेदवारी मिळणार याविषयीचा निर्णय गुलदस्त्यात आहे. मातोश्रीवरून उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही वेळ आधी अध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव सुचविले जाईल, अशी पक्षाच्या गोटात चर्चा सुरू आहे.

अशी होणार निवडणूक : जि. प. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी निवडणूक होणार आहे. यात सकाळी १० ते १२ या वेळेत दोन्ही पदांसाठी सदस्यांना अर्ज करता येणार आहेत. यानंतर दुपारी २ वाजता विशेष सभेचे आयोजन केले असून, सभेच्या सुुरुवातीला दहा मिनिटे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी देण्यात येतील. त्यानंतर मतदानाची प्रक्रिया सुरू होईल. सुरुवातीला अध्यक्षपदासाठी हात उंचावून मतदान केले जाईल. त्यानंतर उपाध्यक्षपदासाठी हात उंचावून मतदान होईल. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे हे असणार आहेत.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदElectionनिवडणूकBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना