शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

औरंगाबाद जिल्हापरिषदेत चुरस; महाविकास आघाडी की, भाजप  मारणार बाजी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 13:02 IST

औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीच्या पक्षांची तीन वर्षांपासून सत्ता आहे.

ठळक मुद्देभाजपने जोरदार तयारी केल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे.सत्ता स्थापन करण्यासाठी ३१ सदस्यांचे संख्याबळ आवश्यक आहे.

औरंगाबाद : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी (दि.३) होणाऱ्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी सत्ता कायम राखणार की, भाजप चमत्कार घडविणार याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. भाजपने जोरदार तयारी केल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीच्या पक्षांची तीन वर्षांपासून सत्ता आहे. ही सत्ता कायम राखण्याचा विश्वास शिवसेना, काँग्रेसचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. मात्र त्याच वेळी सर्वात मोठा पक्ष होऊनही सत्तेपासून वंचित राहिलेल्या भाजपने यावेळी सत्ता मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. 

सत्ता स्थापन करण्यासाठी ३१ सदस्यांचे संख्याबळ आवश्यक आहे. भाजपकडे स्वत:चे २३ सदस्य असून, त्यांना आठ सदस्य कमी पडत आहेत. आठ सदस्यांची संख्या जुळविण्यासाठी गंगापूरचे आमदार प्रशांत बंब, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड आणि अध्यक्षपदाच्या उमेदवार अनुराधा चव्हाण हे प्रयत्न करीत आहेत. चार सदस्यांचा पाठिंबा मिळविण्यात भाजप यशस्वी ठरली आहे. आणखी चार सदस्यांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. यात काँग्रेसच्या एका गटाला फोडण्यासह शिवसेनेतील असंतुष्ट सदस्यही गळाला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.

याविषयी बोलण्यास भाजपचा एकही पदाधिकारी तयार नाही. मात्र शुक्रवारी जि.प.मध्ये चमत्कार होणार असल्याचा दावा केला जात आहे. त्याच वेळी महाविकास आघाडी भक्कम असल्याचेही शिवसेना नेत्यांकडून सांगितले जात आहे. जिल्ह्याला दोन मंत्रीपदे मिळाली असल्यामुळे शिवसेनेला जि.प.ची सत्ता ताब्यात ठेवणे अनिवार्य बनले आहे. त्याच वेळी भाजपही शिवसेनेला धक्का देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. काँग्रेसच्या काही सदस्यांना निवडणूक प्रक्रियेत अनुपस्थित राहण्यास भाग पाडत संख्याबळ कमी करण्यात येऊ शकते, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

भाजपचे ठरले, शिवसेनेचे गुलदस्त्यातभाजपकडून अध्यक्षपदासाठी अनुराधा चव्हाण यांचे नाव अंतिम करण्यात आले असल्याचे समजते. त्याच वेळी शोभा काळे यासुद्धा ऐनवेळच्या उमेदवार असू शकतात. मात्र शिवसेनेच्या गोटातून कोणाला उमेदवारी मिळणार याविषयीचा निर्णय गुलदस्त्यात आहे. मातोश्रीवरून उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही वेळ आधी अध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव सुचविले जाईल, अशी पक्षाच्या गोटात चर्चा सुरू आहे.

अशी होणार निवडणूक : जि. प. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी निवडणूक होणार आहे. यात सकाळी १० ते १२ या वेळेत दोन्ही पदांसाठी सदस्यांना अर्ज करता येणार आहेत. यानंतर दुपारी २ वाजता विशेष सभेचे आयोजन केले असून, सभेच्या सुुरुवातीला दहा मिनिटे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी देण्यात येतील. त्यानंतर मतदानाची प्रक्रिया सुरू होईल. सुरुवातीला अध्यक्षपदासाठी हात उंचावून मतदान केले जाईल. त्यानंतर उपाध्यक्षपदासाठी हात उंचावून मतदान होईल. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे हे असणार आहेत.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदElectionनिवडणूकBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना