शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

शासनाच्या अनुदानाचे २५ कोटी संपताच कचरा प्रक्रियेचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 18:14 IST

शासनाकडून अनुदानाचा दुसरा टप्पा आला नाही

ठळक मुद्देप्रकल्प उभारण्यासाठी मनपाला १४० कोटी रुपये खर्च येणार आहे.

औरंगाबाद :   चिकलठाणा येथे १५० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात आला. मात्र आता पडेगाव आणि नक्षत्रवाडी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणीचे काम निधीअभावी ठप्प पडले आहे.

शहरातील सर्व कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी मनपाला १४० कोटी रुपये खर्च येणार आहे. शासनाकडून आलेले २५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. मनपाने मागील महिन्यातच शासनाकडे सुधारित डीपीआर सादर केला. या डीपीआरची शहानिशा करण्यासाठी  शासनाचे एक पथकही शहरात आले होते. या पथकाने अत्यंत बारकाईने सर्व कामकाजाची पाहणी केली होती. या पथकाच्या अहवालावर पुढील निधी शासनाकडून देण्यात येणार होता. पथक रवाना होऊन आठवडा उलटला तरी मनपाला दुसऱ्या टप्प्यातील अनुदान मिळालेले नाही. पडेगाव आणि नक्षत्रवाडी येथे शेड उभारणीचे काम सुरू आहे. दोन्ही ठिकाणी सुरू असलेल्या कामाला किमान ४० ते ४५ कोटी रुपये लागणार आहेत. शासनाकडून आलेला निधी संपल्याने कंत्राटदारानेही काम जवळपास बंद केले आहे. 

मनपा पडेगाव येथेही १५० मॅट्रिक टन क्षमतेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे. नक्षत्रवाडी येथे कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रयोग करण्यात येईल. या प्रकल्पाला हॉटेलमधील खराब अन्न, ओला कचरा, सडलेला भाजीपाला लागणार आहे. भविष्यात महापालिका हा कचरा संकलित करण्यासाठी स्वतंत्र रिक्षांची नेमणूक करणार आहे.

कंपनीचे पैसे अडकलेचिकलठाणा येथे सध्या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या मायोवेसल्स या कंपनीने स्वत:च्या खिशातील कोट्यवधी रुपयांची यंत्रसामुग्री बसविली आहे. दहा वर्षे कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारीही मनपाने याच कंपनीवर सोपविली आहे. या कंपनीलाही यंत्रसामुग्री बसविण्याचे पैसे मनपाने दिलेले नाहीत.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीState Governmentराज्य सरकार