शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

शासनाच्या अनुदानाचे २५ कोटी संपताच कचरा प्रक्रियेचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 18:14 IST

शासनाकडून अनुदानाचा दुसरा टप्पा आला नाही

ठळक मुद्देप्रकल्प उभारण्यासाठी मनपाला १४० कोटी रुपये खर्च येणार आहे.

औरंगाबाद :   चिकलठाणा येथे १५० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात आला. मात्र आता पडेगाव आणि नक्षत्रवाडी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणीचे काम निधीअभावी ठप्प पडले आहे.

शहरातील सर्व कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी मनपाला १४० कोटी रुपये खर्च येणार आहे. शासनाकडून आलेले २५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. मनपाने मागील महिन्यातच शासनाकडे सुधारित डीपीआर सादर केला. या डीपीआरची शहानिशा करण्यासाठी  शासनाचे एक पथकही शहरात आले होते. या पथकाने अत्यंत बारकाईने सर्व कामकाजाची पाहणी केली होती. या पथकाच्या अहवालावर पुढील निधी शासनाकडून देण्यात येणार होता. पथक रवाना होऊन आठवडा उलटला तरी मनपाला दुसऱ्या टप्प्यातील अनुदान मिळालेले नाही. पडेगाव आणि नक्षत्रवाडी येथे शेड उभारणीचे काम सुरू आहे. दोन्ही ठिकाणी सुरू असलेल्या कामाला किमान ४० ते ४५ कोटी रुपये लागणार आहेत. शासनाकडून आलेला निधी संपल्याने कंत्राटदारानेही काम जवळपास बंद केले आहे. 

मनपा पडेगाव येथेही १५० मॅट्रिक टन क्षमतेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे. नक्षत्रवाडी येथे कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रयोग करण्यात येईल. या प्रकल्पाला हॉटेलमधील खराब अन्न, ओला कचरा, सडलेला भाजीपाला लागणार आहे. भविष्यात महापालिका हा कचरा संकलित करण्यासाठी स्वतंत्र रिक्षांची नेमणूक करणार आहे.

कंपनीचे पैसे अडकलेचिकलठाणा येथे सध्या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या मायोवेसल्स या कंपनीने स्वत:च्या खिशातील कोट्यवधी रुपयांची यंत्रसामुग्री बसविली आहे. दहा वर्षे कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारीही मनपाने याच कंपनीवर सोपविली आहे. या कंपनीलाही यंत्रसामुग्री बसविण्याचे पैसे मनपाने दिलेले नाहीत.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीState Governmentराज्य सरकार