शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादकरांना आणखी ३ दिवस पाण्याचा त्रास; ऐन उन्हाळ्यात वेळापत्रक कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 16:32 IST

ऐन उन्हाळ्यात तब्बल आठ ते नऊ दिवस पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

औरंगाबाद : शनिवारी, रविवारी जायकवाडी, फारोळा येथे वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. रविवारी ज्या वसाहतींना पाणी देता आले नाही, त्यांना सोमवारी पाणी देण्यात आले. शहरातील बहुतांश वॉर्डांमधील पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. ऐन उन्हाळ्यात तब्बल आठ ते नऊ दिवस पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मागील दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता वादळामुळे जायकवाडी, फारोळा येथील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे दोन्ही पाणीपुरवठा योजना बंद झाल्या. दोन तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. यानंतर रात्री दहा वाजता नक्षत्रवाडी एमबीआर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. पुन्हा ७०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीचा पाणीपुरवठा जायकवाडीतून बंद करावा लागला. सोमवारी पहाटे दोन वाजता वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर जायकवाडीतून पुन्हा पंपिंग सुरू करण्यात आले. ते पाणी एमबीआरपर्यंत आल्यानंतर एमबीआरचे पंप पहाटे चार वाजता सुरू करण्यात आले.

दरम्यानच्या काळात सुमारे सहा तास जुन्या जलवाहिनीद्वारे शहराला येणारे पाणी बंद होते. याचा परिणाम सोमवारी जुन्या शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला. सोमवारी दिवसभरातील पाणीपुरवठ्याचे चार ते पाच तास पुढे ढकलण्यात आले. सोमवारी रात्री बारा ते एक वाजेपर्यंत पाणीपुरवठ्याचे टप्पे सुरू ठेवणार असल्याचे उपअभियंता के. एम. फालक यांनी सांगितले. शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी तीन दिवस लागणार आहेत. सिडको-हडकोत सर्वाधिक पाणीटंचाई आहे. जाधववाडी, मयूर पार्क, मयूरनगर, सुदर्शननगर, सिद्धार्थनगर, टी.व्ही. सेंटर, जयभवानीनगर, अंबिकानगर, मुकुंदवाडी, रामनगर आदी भागांत सातव्या आणि आठव्या दिवशी पाणी देण्यात येत आहे. 

शहागंजचे १६ वॉर्ड दुर्लक्षितशहागंजच्या पाण्याच्या टाकीवर १६ वॉर्ड अवलंबून आहेत. काही वॉर्डांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याच्या टाकीवरून १८ ते २० तासांचे सप्लाय ठेवण्यात आले आहेत. १८ तास ज्या लाईनवरून नागरिकांनी थेट कनेक्शन घेतले आहेत, त्यांना २० तास पाणी मिळत आहे. येथील बहुतांश वॉर्डांना सातव्या दिवशी पाणी देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. शनिवारी, रविवारी जायकवाडीतील वीजपुरवठा खंडित झाल्याने सर्वाधिक त्रास शहागंज पाण्याच्या टाकीवरील वॉर्डांना होत आहे.

मरीमाताजवळील टाकीला १० एमएलडीसिडको एन-५ येथील टाकीवरून मरीमाता पाण्याच्या टाकीला १० एमएलडी पाणी देण्यात येते. या टाकीवर किती वॉर्ड अवलंबून आहेत. या वॉर्डांना किती तास पाणी देण्यात येते. अवघ्या ७ वॉर्डांसाठी दहा एमएलडी  पाणी कसे काय लागत आहे, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई