शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

औरंगाबादकरांना आणखी ३ दिवस पाण्याचा त्रास; ऐन उन्हाळ्यात वेळापत्रक कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 16:32 IST

ऐन उन्हाळ्यात तब्बल आठ ते नऊ दिवस पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

औरंगाबाद : शनिवारी, रविवारी जायकवाडी, फारोळा येथे वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. रविवारी ज्या वसाहतींना पाणी देता आले नाही, त्यांना सोमवारी पाणी देण्यात आले. शहरातील बहुतांश वॉर्डांमधील पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. ऐन उन्हाळ्यात तब्बल आठ ते नऊ दिवस पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मागील दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता वादळामुळे जायकवाडी, फारोळा येथील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे दोन्ही पाणीपुरवठा योजना बंद झाल्या. दोन तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. यानंतर रात्री दहा वाजता नक्षत्रवाडी एमबीआर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. पुन्हा ७०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीचा पाणीपुरवठा जायकवाडीतून बंद करावा लागला. सोमवारी पहाटे दोन वाजता वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर जायकवाडीतून पुन्हा पंपिंग सुरू करण्यात आले. ते पाणी एमबीआरपर्यंत आल्यानंतर एमबीआरचे पंप पहाटे चार वाजता सुरू करण्यात आले.

दरम्यानच्या काळात सुमारे सहा तास जुन्या जलवाहिनीद्वारे शहराला येणारे पाणी बंद होते. याचा परिणाम सोमवारी जुन्या शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला. सोमवारी दिवसभरातील पाणीपुरवठ्याचे चार ते पाच तास पुढे ढकलण्यात आले. सोमवारी रात्री बारा ते एक वाजेपर्यंत पाणीपुरवठ्याचे टप्पे सुरू ठेवणार असल्याचे उपअभियंता के. एम. फालक यांनी सांगितले. शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी तीन दिवस लागणार आहेत. सिडको-हडकोत सर्वाधिक पाणीटंचाई आहे. जाधववाडी, मयूर पार्क, मयूरनगर, सुदर्शननगर, सिद्धार्थनगर, टी.व्ही. सेंटर, जयभवानीनगर, अंबिकानगर, मुकुंदवाडी, रामनगर आदी भागांत सातव्या आणि आठव्या दिवशी पाणी देण्यात येत आहे. 

शहागंजचे १६ वॉर्ड दुर्लक्षितशहागंजच्या पाण्याच्या टाकीवर १६ वॉर्ड अवलंबून आहेत. काही वॉर्डांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याच्या टाकीवरून १८ ते २० तासांचे सप्लाय ठेवण्यात आले आहेत. १८ तास ज्या लाईनवरून नागरिकांनी थेट कनेक्शन घेतले आहेत, त्यांना २० तास पाणी मिळत आहे. येथील बहुतांश वॉर्डांना सातव्या दिवशी पाणी देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. शनिवारी, रविवारी जायकवाडीतील वीजपुरवठा खंडित झाल्याने सर्वाधिक त्रास शहागंज पाण्याच्या टाकीवरील वॉर्डांना होत आहे.

मरीमाताजवळील टाकीला १० एमएलडीसिडको एन-५ येथील टाकीवरून मरीमाता पाण्याच्या टाकीला १० एमएलडी पाणी देण्यात येते. या टाकीवर किती वॉर्ड अवलंबून आहेत. या वॉर्डांना किती तास पाणी देण्यात येते. अवघ्या ७ वॉर्डांसाठी दहा एमएलडी  पाणी कसे काय लागत आहे, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई