शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

औरंगाबाद हे चित्रपट उद्योगाचे केंद्र बनेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 13:02 IST

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप

ठळक मुद्देसातव्या महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद आनंददायी आहे.आठवा महोत्सव २० ते २४ जानेवारी २०२१ दरम्यान

औरंगाबाद : मुंबई, पुणे, दिल्ली याठिकाणीच चित्रपट, नाट्यांची निर्मिती होते, असे नाही. तर पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेतही निर्मिती होऊ शकते. मागील दोन दिवसांपासून याठिकाणी आयोजित महोत्सवाला युवा रसिकांचा मिळणारा उदंड प्रतिसाद पाहिल्यानंतर येत्या दहा वर्षांत औरंगाबादही चित्रपट निर्मितीच्या उद्योगाचे केंद्र बनेल, असा विश्वास राष्ट्रीय नाट्यसंस्थेचे माजी संचालक तथा ज्येष्ठ दिग्दर्शक  वामन केंद्रे यांनी व्यक्त केला.

औरंगाबादेतील प्रोझोन मॉलमध्ये ५ ते ९ फेब्रुवारीदरम्यान आयोजित सातव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा रविवारी (दि.९) सायंकाळी थाटात समारोप झाला. यावेळी व्यासपीठावर पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, औरंगाबाद विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम, विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, ज्येष्ठ दिग्दर्शक सुमित्रा भावे, वामन केंद्रे, महोत्सवाचे संचालक अशोक राणे, चंद्रकांत कुलकर्णी, प्रा. अजित दळवी, संयोजक नीलेश राऊत, सतीश कागलीवाल आदींची उपस्थिती होती.

प्रास्ताविकात अशोक राणे म्हणाले, सातव्या महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद आनंददायी आहे. आठवा महोत्सव २० ते २४ जानेवारी २०२१ दरम्यान आयोजित केला जाणार आहे. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी १५० पेक्षा अधिक जण बाहेरून आले होते. प्रेक्षकांची संख्याही अडीच हजारांपेक्षा अधिक आहे. १०० हून अधिक नाट्यक्षेत्रातील दिग्गजांनी महोत्सवाला हजेरी लावली. ही आनंदाची बाब आहे. औरंगाबादचे वैभव ठरलेल्या वेरूळ महोत्सवाची सुरुवात करावी, एमटीडीसीच्या इमारतींची परिस्थिती सुधारावी, शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलशी जोडून पर्यटनाला चालना द्यावी, दौलताबादेत लाईट अँड साउंड शोचा धूळखात पडलेला प्रस्ताव मंजूर करावा, पर्यटन प्राधिकरणाची सुरुवात करून पर्यटनाला चालना देण्याची मागणीही त्यांनी राज्यमंत्र्यांकडे केली. यावेळी नंदकिशोर कागलीवाल, अंकुशराव कदम, मोक्षदा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी दिग्दर्शक शिव कदम, जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटिंग, आकाश कागलीवाल, डॉ. अपर्णा कक्कड, प्रा. दासू वैद्य, डॉ. आनंद निकाळजे, प्राचार्या रेखा शेळके, किशोर निकम, सुबोध जाधव, महेश देशमुख, अभिजित हिरप आदींनी प्रयत्न केले.

सिनेमा माणूस म्हणून सहिष्णू बनवतोआजपासून ३५ वर्षांपूर्वी चित्रपट तयार करण्याच्या खेळाची मी खेळाडू झाले. तेव्हापासून असंख्य साथीदारांच्या सहकार्याने हा खेळ पुढे नेत आहे. चित्रपट हा माणूस म्हणून सहिष्णू बनवतो. औरंगाबादच्या चोखंदळ रसिकांनी माझ्या चित्रपटांचे कौतुक केले ही अभिमानाची बाब आहे. इतकेच नव्हे तर पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कारानेही माझा सन्मान केला, अशा शब्दांत ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaman Kendreवामन केंद्रेcinemaसिनेमा