शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Aurangabad Violence : चंद्रकात खैरेंची स्मरणशक्ती कमीच, भाजपाचा प्रत्यारोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 16:01 IST

दंगलीच्या  या परिस्थितीचा खा. चंद्रकात खैरे हे राजकीय फायदा उचलत असल्याचा प्रत्यारोप भाजपाने पत्रकार परिषदेत घऊन केला. 

औरंगाबाद : शहरात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मुख्यमंत्र्यांवर केलेला निष्क्रियतेचा आरोप  भाजपाकडून आज फेटाळून लावला आहे.  तसेच दंगलीच्या  या परिस्थितीचा खा. चंद्रकात खैरे हे राजकीय फायदा उचलत असल्याचा प्रत्यारोप भाजपाने पत्रकार परिषदेत घऊन केला. 

११ व १२ मे रोजी शहरात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर भाजपने  आज पत्रकार परिषद घेतली. यात शिवसनेनेवर भाजपने जोरदार टीका करत मुख्यमंत्र्यावरील निष्क्रियतेचा आरोप फेटाळून लावला. यासोबतच दंगलग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपतर्फे मदतफेरी काढण्यात येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली. पत्रकार परिषदेत आ. अतुल सावे, प्रवक्ता शिरिष बोराळकर, प्रदेश सचिव डॉ. भागवत कराड, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांची उपस्थिती होती.

खा. खैरेंची स्मरणशक्ती कमी  पत्रकार परिषदेत बोलताना आ. अतुल सावे यांनी खा. खैरेंची स्मरणशक्ती कमी आहे; कारण दंगलीच्या काळात तेच माझ्या फोनवरून मुख्यमंत्र्यांशी बोलले अशी माहिती दिली. यासोबतच खा. खैरे हे दंगलीचा राजकीय लाभ घेण्याच्या प्रयत्नात आहेत असा आरोपही यावेळी भाजपकडून करण्यात आला.

काय म्हणाले होते खैरे

जुन्या शहरात दंगल होत असताना पोलीस खाते निष्क्रिय राहिले. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हलगर्जीपणा केल्यामुळेच दंगल भडकली, असा खळबळजनक आरोप  खा. चंद्रकांत खैरे आणि संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.  खा. खैरे म्हणाले, शुक्रवारी रात्री शहरात झालेली दंगल दोन्ही बाजूने नव्हे तर केवळ एकाच बाजूने घडलेली आहे. आम्ही लोकांचे व पोलिसांचे दंगेखोरांपासून संरक्षण केले. परंतु आता पोलीस आमच्या लोकांना अटक करीत आहेत. त्यामुळे पोलिसांवर आमचा विश्वास राहिला नाही. दंगलीच्या  रात्री पोलिसांनी निष्क्रियता दाखविली, असा आरोपही खा. खैरे यांनी केला.  

 

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारChandrakant Khaireचंद्रकांत खैरेBJPभाजपा