शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

औरंगाबादेत दुचाकीस्वाराला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:42 IST

बीड बायपासवरील अपघात रोखण्यासाठी शहर पोलिसांनी जडवाहनांना सकाळी आणि सायंकाळी प्रवेशबंदी केली. ही प्रवेशबंदी सुरू असताना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भरधाव जीपचालकाने दुचाकीस्वाराला चिरडले. सुसाट जीपने दुचाकीला सुमारे शंभर फूट फरपटत नेले. हा भीषण अपघात सहारा सिटीसमोर घडला.

ठळक मुद्देशंभर फूट नेले फरपटत : सहारा सिटीसमोरील भीषण घटना

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बीड बायपासवरील अपघात रोखण्यासाठी शहर पोलिसांनी जडवाहनांना सकाळी आणि सायंकाळी प्रवेशबंदी केली. ही प्रवेशबंदी सुरू असताना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भरधाव जीपचालकाने दुचाकीस्वाराला चिरडले. सुसाट जीपने दुचाकीला सुमारे शंभर फूट फरपटत नेले. हा भीषण अपघात सहारा सिटीसमोर घडला.भगवान गंगाधर शेळके (४५, रा. शिवशाहीनगर, मुकुंदवाडी) असे मृताचे नाव आहे. एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, भगवान शेळके हे गांधेली शिवारातील सहारा सिटी येथे ठेकेदाराकडे पाच महिन्यांपासून काम करतात. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता मोटारसायकलवरून कामावर जात होते. सहारा सिटीमध्ये जाण्यासाठी ते बायपास ओलांडत असताना जालन्याकडून देवळाई चौकाकडे सुसाट निघालेल्या जीपचालकाने त्यांना उडवले. हा अपघात एवढा भीषण होता की, भगवान यांना दुचाकीसह जीपने बायपासवरून सहारा सिटीच्या रस्त्यावर सुमारे शंभर फूट फरफटत नेले. या घटनेत भगवान हे घटनास्थळीच ठार झाले. शहरातील एका लग्न समारंभासाठी निघालेल्या या चालकाने त्याची जीप तेथेच सोडून अन्य प्रवाशांसह पळ काढला. या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भगवान यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात दाखल केला. एमआयडीसी सिडको ठाण्यात जीपचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी दिली.मृत भगवान यांचे मूळ गाव पैठण तालुक्यातील केकत जळगाव आहे. ते बारा वर्षांपूर्वी कामधंद्यासाठी औरंगाबादेत आले. त्यांना दोन मुले आणि दोन विवाहित मुली आहेत. एक मुलगा वाहनचालक, तर दुसरा शिक्षण घेत आहे.मोकळ्या रस्त्याचा गैरफायदाभगवान यांना उडविणारी जीप प्रचंड वेगात होती. रस्त्यावर जडवाहने नसल्याने मोकळा रस्ता पाहून चालकाने जीपचा वेग वाढविला. दुचाकीस्वार भगवान हे रस्ता ओलांडत असल्याचे जीपचालकाच्या लक्षात येताच त्यांनी जीपवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला आणि त्याने दुचाकीला सुमारे शंभर फूट फरपटत नेले.जडवाहनांना प्रवेशबंदी तरीही अपघातआॅगस्ट महिन्यात पाच जणांचे बायपासवर बळी गेल्याने पोलीस आयुक्तांनी तेथील वाहतुकीचे नियमन करीत सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या कालावधीत जडवाहनांना प्रवेशबंदी केली. प्रायोगिक तत्त्वावर ९ सप्टेंबरपर्यंत हा प्रयोग सुरू राहणार आहे, असे असताना बायपासवर आज सकाळी जीपच्या धडकेत दुचाकीस्वाराला प्राणास मुकावे लागले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातDeathमृत्यू