शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

औरंगाबादेत दुचाकीस्वाराला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:42 IST

बीड बायपासवरील अपघात रोखण्यासाठी शहर पोलिसांनी जडवाहनांना सकाळी आणि सायंकाळी प्रवेशबंदी केली. ही प्रवेशबंदी सुरू असताना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भरधाव जीपचालकाने दुचाकीस्वाराला चिरडले. सुसाट जीपने दुचाकीला सुमारे शंभर फूट फरपटत नेले. हा भीषण अपघात सहारा सिटीसमोर घडला.

ठळक मुद्देशंभर फूट नेले फरपटत : सहारा सिटीसमोरील भीषण घटना

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बीड बायपासवरील अपघात रोखण्यासाठी शहर पोलिसांनी जडवाहनांना सकाळी आणि सायंकाळी प्रवेशबंदी केली. ही प्रवेशबंदी सुरू असताना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भरधाव जीपचालकाने दुचाकीस्वाराला चिरडले. सुसाट जीपने दुचाकीला सुमारे शंभर फूट फरपटत नेले. हा भीषण अपघात सहारा सिटीसमोर घडला.भगवान गंगाधर शेळके (४५, रा. शिवशाहीनगर, मुकुंदवाडी) असे मृताचे नाव आहे. एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, भगवान शेळके हे गांधेली शिवारातील सहारा सिटी येथे ठेकेदाराकडे पाच महिन्यांपासून काम करतात. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता मोटारसायकलवरून कामावर जात होते. सहारा सिटीमध्ये जाण्यासाठी ते बायपास ओलांडत असताना जालन्याकडून देवळाई चौकाकडे सुसाट निघालेल्या जीपचालकाने त्यांना उडवले. हा अपघात एवढा भीषण होता की, भगवान यांना दुचाकीसह जीपने बायपासवरून सहारा सिटीच्या रस्त्यावर सुमारे शंभर फूट फरफटत नेले. या घटनेत भगवान हे घटनास्थळीच ठार झाले. शहरातील एका लग्न समारंभासाठी निघालेल्या या चालकाने त्याची जीप तेथेच सोडून अन्य प्रवाशांसह पळ काढला. या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भगवान यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात दाखल केला. एमआयडीसी सिडको ठाण्यात जीपचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी दिली.मृत भगवान यांचे मूळ गाव पैठण तालुक्यातील केकत जळगाव आहे. ते बारा वर्षांपूर्वी कामधंद्यासाठी औरंगाबादेत आले. त्यांना दोन मुले आणि दोन विवाहित मुली आहेत. एक मुलगा वाहनचालक, तर दुसरा शिक्षण घेत आहे.मोकळ्या रस्त्याचा गैरफायदाभगवान यांना उडविणारी जीप प्रचंड वेगात होती. रस्त्यावर जडवाहने नसल्याने मोकळा रस्ता पाहून चालकाने जीपचा वेग वाढविला. दुचाकीस्वार भगवान हे रस्ता ओलांडत असल्याचे जीपचालकाच्या लक्षात येताच त्यांनी जीपवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला आणि त्याने दुचाकीला सुमारे शंभर फूट फरपटत नेले.जडवाहनांना प्रवेशबंदी तरीही अपघातआॅगस्ट महिन्यात पाच जणांचे बायपासवर बळी गेल्याने पोलीस आयुक्तांनी तेथील वाहतुकीचे नियमन करीत सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या कालावधीत जडवाहनांना प्रवेशबंदी केली. प्रायोगिक तत्त्वावर ९ सप्टेंबरपर्यंत हा प्रयोग सुरू राहणार आहे, असे असताना बायपासवर आज सकाळी जीपच्या धडकेत दुचाकीस्वाराला प्राणास मुकावे लागले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातDeathमृत्यू