शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

मुले पळविण्याचा संशय; जमावाच्या तावडीतुन महिलेला सोडवले

By राम शिनगारे | Updated: October 6, 2022 21:41 IST

आंबेडकनगर परिसरातील घटना : सिडको पोलीस घटनास्थळी पोहचल्यामुळे अनर्थ टळला

औरंगाबाद : मुले पळवून नेण्यात येत असल्याच्या अफवा सोशल मिडियावरुन प्रसारीत केल्या जात आहे. त्याच संशयावरुन एका मानसिकदृष्ट्या कमकुमत असलेल्या महिलेला आंबेडकरनगर ग.नं. ३ परिसरातील जमावाने घेरले होते. त्या महिलेला काहीजणांनी मारहाणही केली. तेवढ्यात सिडको पोलिसांनी घटेनेची माहिती समजताच तात्काळ धाव घेत जमावाच्या तावडीतून महिलेची सुटका करीत ठाण्यात आणले. त्याठिकाणी चौकशी करुन महिलेला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.

आंबेडकरनगर परिसरातील ग.नं. ३ च्या रस्त्यावर एक मानसिक उपचार सुरु असलेली महिला एका पाच वर्षाच्या मुलीला बोलताना नागरिकांनी पाहिले. तेव्हा त्यांना मुले पळविणाऱ्या टोळीतील सदस्य असल्याचा संशय आला. नागरिकांना महिलेला आडवून विचारपुस केली. महिलेला उत्तर देता येत नसल्यामुळे तिच्या दोनचार चापटाही मारण्यात आल्या. तेव्हा अधिक मोठ्या प्रमाणात जमाव जमला. त्या जमावातील एकाने सिडको पोलिसांनी घटनेची माहिती मिळाली. सिडको पोलिसांनी महिलेला मारहाण न करण्याच्या सूचना देत उपनिरीक्षक अशोक अवचार, कैलास अन्नलदास, कृष्णा घायाळ यांच्यासह हवालदार लाल खॉ पठाण, बिट मार्शलने धाव घेतली. माहिती मिळाल्यानंतर आवघ्या पाच मिनिटात सिडको पोलीस पोहचल्यामुळे पुढील अनर्थ टळला. सिडको पोलिसांनी महिलेला जमावाच्या तावडीतुन सोडवत पोलिसांच्या गाडीत बसवून ठाण्यात आणले. त्याठिकाणी महिलेच्या नातेवाईकांनी बोलावून घेत अधिक चौकशी करीत ताब्यात दिले. नातेवाईकांनी महिलेवर मानसिक रुग्णाचे वैद्यकीय उपचार सुरु असल्याची कागदपत्रेही पोलिसांना दाखवली आहेत.

यापूर्वीही चार घटना उघडकीस

मुले पळविणारी टोळी असल्याच्या यापुर्वी चार घटना उघडकीस आल्या आहेत. या सर्व अफवाच निघाल्या आहेत. त्यातील तीन घटना औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात घडल्या आहेत. तर एक घटना जवाहरगनर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली होती. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्यासह ग्रामीणचे अधीक्षक मनिष कलवानया यांनी मुले पळविणारी टोळी अस्तित्वात नसून, कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस