शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये शेतीमालाला मातीमोल भाव; दुष्काळानंतर शेतकऱ्यांना पालेभाज्या उत्पादनातही जबर फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 13:52 IST

हातगाडीवर विक्रेते चढ्या भावात फळभाज्या विकत असले तरी अडत व्यवहारात मात्र शेतकऱ्यांना मातीमोल भाव मिळत आहे.

औरंगाबाद : पाण्याअभावी रबी पीक घेण्याऐवजी फळभाजीपाल्याचे उत्पादन घेतले; पण येथेही शेतकऱ्यांना आर्थिक फटकाच सहन करावा लागत आहे. कारण भाजीमंडीत असो, वा हातगाडीवर विक्रेते चढ्या भावात फळभाज्या विकत असले तरी अडत व्यवहारात मात्र शेतकऱ्यांना मातीमोल भाव मिळत आहे. एकानंतर एक येणारे संकट बळीराजाची पाठ सोडण्यास तयार नाही. 

पालक १० रुपयाला १० जुडी, मेथी १० रुपयाला ५ जुडी, अशा मातीमोल भावात विकली जात आहे, तर टोमॅटो २५० ते ६०० रुपये, कांदा १०० ते ७०० रुपये, दुधी भोपळा २०० ते ४०० रुपये, तर पत्ताकोबी १५० ते २५० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. दररोज भाजीमंडीत किंवा गल्लोगल्ली हातगाड्यांवर भाजी घेऊन येणाऱ्या विक्रेत्यांकडून जे ग्राहक फळभाज्या विकत घेतात त्यांना हे भाव पाहिल्यावर धक्काच बसेल; पण हे सत्य आहे.

जाधववाडीतील  अडत बाजारात मागील आठ दिवसांपासून याच भावात फळभाजीपाला विक्री होत आहे. सकाळच्या वेळी अडत बाजाराबाहेर बसलेले किरकोळ विक्रेते ओरडून-ओरडून पालक १ रुपया गड्डी, मेथी १० रुपयाला ५ गड्डी विकताना दिसून येत आहेत. या भावातही पालेभाज्या शिल्लक राहत आहेत. कांद्याची आवक वाढली आहे. यामुळे सातत्याने भाव गडगडत असून, मंगळवारी तर १०० ते ७०० रुपये क्विंटलपर्यंत कांदा विक्री झाला. हाच कांदा बाजारात १२ ते २० रुपयांदरम्यान विकला जात आहे. २ ते ४ रुपये नग विकूनही उरलेला दुधी भोपळा आणखी कमी भावात विकावा लागत आहे. 

यासंदर्भात दादाराव जोगदंडे या शेतकऱ्याने सांगितले की, खरिपाने दगा दिला. आता पाणी कमी असल्याने रबीचे पीक घेण्याऐवजी आम्ही पालेभाज्यांची लागवड केली, पण अडत बाजारातही मातीमोल भावात विकला जात आहे. आम्ही चोहोबाजूने संकटात  सापडलो आहोत. वैजापूरहून कांदा घेऊन आलेल्या कल्याण काकडे यांच्या तर डोळ्यात पाणी आले. कारण, त्यांनी आणलेल्या ५० क्विंटल कांद्याला २०० ते ५०० रुपये क्विंटल भाव मिळाला होता. आज ७२३ क्विंटल कांदा बाजारात आला. अडत बाजारात १०० ते ७०० रुपयांदरम्यान कांदा विक्री झाला. टोमॅटो, दुधीभोपळा, पत्ताकोबी, फुलकोबीचे ढीगचे ढीग अडत दुकानांसमोर पडलेले बघण्यास मिळत आहेत. 

परराज्यातील कांद्याने भाव पडले अडत व्यापाऱ्यांनी सांगितले की, महाराष्ट्रासह आता मध्यप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांतही कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. यामुळे कांद्याचा गड मानल्या जाणाऱ्या लासलगाव, नाशिक येथील कांद्याला परराज्यातून उठाव कमी झाला. परिणामी, कांद्याची स्थानिक बाजारात आवक वाढली आहे. दररोज ८० टनपेक्षा अधिक कांदा बाजारात येत असल्याने भाव गडगडले. मंगळवारी १०० ते ७०० रुपये क्विंटलदरम्यान कांदा विकला गेला. 

बटाट्याची २०० टन आवक बटाट्याचे अडत व्यापारी मुजीब खान म्हणाले की, डिसेंबर महिन्यात इंदूरच्या नवीन बटाट्याची आवक सुरू होणार आहे. सध्या इंदूर व आग्रा येथील शीतगृहात मोठ्या प्रमाणात बटाट्याचा साठा पडून आहे. करार संपुष्टात आल्याने शीतगृह मालकांनी जुना बटाटा बाहेर काढण्यास सांगितले आहे. परिणामी, बटाटा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणला जात आहे. जाधववाडीत आज २०० टन बटाट्याची आवक झाली व ६०० ते ८०० क्विंटलदरम्यान बटाटा विक्री झाला. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीMarketबाजारvegetableभाज्याAurangabadऔरंगाबाद