शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

औरंगाबाद नामांतराचा वाद; खबरदारी म्हणून रेल्वेस्टेशनवरील नामफलकाला चक्क संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 20:40 IST

Aurangabad renaming dispute : खबरदारी घेत लोहमार्ग आणि रेल्वे सुरक्षा बलाकडून गस्त

ठळक मुद्देफलकाला प्रत्येक पाळीत ३ ते ४ जवानांकडून पहारा

औरंगाबाद : प्रवाशांच्या सुरक्षेबरोबर रेल्वेस्टेशनवरील नामफलकाचीही सुरक्षा करण्याची वेळ सध्या लोहमार्ग आणि रेल्वे सुरक्षा बलावर ओढावली आहे. कारण शहराच्या नामकरणावरून गेल्या काही दिवसांपासून चांगलेच राजकारण तापले आहे. यातूनच रेल्वेस्टेशनवरील औरंगाबाद नामफलकाला चक्‍क संरक्षण देण्यात येत आहे.

नामकरणावरून सुरू असलेल्या राजकीय वादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्टेशनवर खबरदारी घेतली जात आहे. या फलकाला प्रत्येक पाळीत ३ ते ४ जवानांकडून पहारा देत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अरविंदकुमार शर्मा यांनी दिली. यापूर्वी रेल्वेस्टेशनवरील नामफलकावरील नाव बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नामकरणाच्या मुद्याला तोंड फुटले आहे. शिवसेनेने औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करणारच अशी ठाम भूमिका घेतली आहे. दुसरीकडे काँग्रेसने औरंगाबादचे नामाकरण करण्यास विरोध दर्शवला आहे. त्यातच मनसेने शहरात औरंगाबादच्या नामाकरणाबद्दल ठिकठिकाणी पोस्टर्स लावली होती. या सगळ्यात रेल्वेस्टेशनवर खबरदारी घेतली जात आहे. औरंगाबाद नामफलकाला सुरक्षा देण्यात आली आहे.

रिकामे फलाट तरीही...रेल्वेस्टेशनवरून सध्या मोजक्याच रेल्व धावत आहे. रेल्वेचे फलाट रिकामे असल्यावर सुरक्षेचा फारसा मुद्दा येत नाही. पण रिकाम्या फलाटाच्या शेवटच्या टोकावर सध्या नामफलकाजवळ लोहमार्ग, रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना उभे रहावे लागत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशन