शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

औरंगाबाद पोलिसांचा मोठा निर्णय; महिला सुरक्षेसाठी आणखी एका दामिनी पथकाची स्थापना

By राम शिनगारे | Updated: August 31, 2022 15:55 IST

पोलीस आयुक्तांची निर्णयानंतर आता दोन्ही परिमंडळात स्वतंत्र पथक असणार

औरंगाबाद : शहरातील महिला, तरुणी, विद्यार्थिनींची सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड, समस्या, मंगळसूत्र हिसकावणे, महाविद्यालयात तरुणांकडून होणाऱ्या त्रासाला आळा घालण्यासाठी दामिनी पथकाची स्थापना केलेली आहे. एक पथक कार्यरत असताना शहरातील वाढत्या घटना लक्षात घेऊन दुसरे पथक स्थापन करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी घेतला आहे. दोन्ही परिमंडळात प्रत्येकी एक पथक कार्यरत असणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १३४ महिला विषयक गुन्ह्यांचे निर्जनस्थळे, कॉलेज, शाळा, मुलींचे वसतिगृह, अभ्यासिका, क्लासेस, वृद्धाश्रम, अनाथालय, गर्दीचे ठिकाणी गस्त घालण्याचे काम दामिनी पथक करीत असते. त्याचवेळी नियंत्रण कक्ष, ज्येष्ठ नागरिक कक्षाला येणाऱ्या दुरध्वनीवरुन प्राप्त कॉलची दखल घेऊन वेळोवेळी मदतही करण्याचे कामही दामिनी पथकाकडे सोपविण्यात आलेले आहे. त्याशिवाय शाळा, महाविद्यालयात स्वसंरक्षण, सोशल मिडियाचे दुष्परिणाम याविषयी जनजागृती करणारी व्याख्यानांचे आयोजनही दामिनी पथकाकडून करण्यात येते.

शहरातील वाढणाऱ्या घटना, लोकसंख्या पाहता एक दामिनी पथक अपुरे पडत होते. त्यात वाढ करण्याची मागणी विविध सामाजिक संस्था, संघनांनी पोलीस आयुक्तांकडे केली होती. याची दखल घेत आयुक्तांनी २४ ऑगस्ट रोजी आदेश देत आणखी एक पथकाची स्थापना केली आहे. त्यासाठी एक वाहन, दोन महिला अंमलदार आणि एक पुरुष पोलिसाची नेमणूक केली आहे. दोन्ही पथकाच्या कामाची विभागणी केली असून, एक पथक परिमंडळ १ आणि दुसरे पथक परिमंडळ २ मध्ये कार्यरत राहणार आहेत. ही दोन्ही पथके सहायक निरीक्षक सुषमा पवार यांच्या नेतृत्वात कार्य करणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही पथकात एक अधिकारी आणि सात महिला अंमलदार, एक पुरुष अंमलदार असणार आहेत.

मदतीसाठी संपर्काचे आवाहनमहिला, मुली यांना आपत्कालीन परिस्थिती पोलिसांची मदत हवी असल्यास ११२ सह नियंत्रण कक्ष, पोलिसांच्या व्हाटस्अपवर संपर्क साधण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. ही पथके आयुक्त डॉ. गुप्ता, उपायुक्त अपर्णा गिते आणि सहायक आयुक्त विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनात काम करतील, असेही निरीक्षक आघाव यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस