शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

परीक्षांमधील कॉपी रोखण्यासाठी येणार ‘औरंगाबाद पॅटर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 14:36 IST

पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा होण्यासाठी आता ‘औरंगाबाद पॅटर्न’ राबविण्यात येणार

ठळक मुद्देदहावी-बारावीच्या परीक्षांची तयारी तहसीलदार, नायब तहसीलदार भरारी पथकात 

- राम शिनगारे 

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने १८ फेब्रुवारीपासून बारावी आणि ३ मार्चपासून दहावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षांमध्ये कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा दक्षता समिती, जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन आणि शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा होण्यासाठी आता ‘औरंगाबाद पॅटर्न’ राबविण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी दिली. यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या नियंत्रणात तयारी पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.

मंडळातर्फे २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षेत माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. चव्हाण यांच्या नेतृत्वातील भरारी पथकाने वादग्रस्त परीक्षा केंद्रांना भेटी देत शेकडो विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडून कारवाई केली होती. सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील केंद्रातील ३२२ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचे धाडस केले होते. त्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागाने मागील वर्षभर कॉपी रोखण्यासाठी संस्थाचालक, मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रम, कार्यशाळांच्या माध्यमातून समुपदेशन केले आहे. या त्यांच्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी उदय चौधरी, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. वर्षभर केलेल्या प्रयत्नांना परीक्षेच्या कालावधीत मूर्त स्वरूप देण्यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी परीक्षा केंद्र संचालक, मुख्याध्यापकांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी परीक्षा केंद्रांवर पालन करण्यासाठी विविध सूचना केल्या आहेत. याशिवाय औरंगाबाद पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांना पत्र पाठवून जबाबदारी निश्चित केली आहे. राज्यात पहिल्यांदाच तहसीलदार, नायब तहसीलदार यांना भरारी पथकांमध्ये सहभागी करून घेण्यात येत असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली. परीक्षेत होणारा कॉपीसारखा गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह महसूल विभागातील नायब तहसीलदार, तहसीलदार यांच्या नियंत्रणात प्रत्येक तालुक्यात यंत्रणा उभारण्यात येणार आहे. या यंत्रणेच्या जोडीला पोलीस प्रशासन असणार आहे. यासाठी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या आठवड्यात त्या जिल्हाभरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांची बैठक बोलावणार आहेत. त्यामध्ये परीक्षा काळात सुरक्षेसंदर्भात सूचना केल्या जाणार आहेत. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षेत पहिल्यांदाच ‘औरंगाबाद पॅटर्न’ राबविण्यात येणार आहे.

आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचा पुढाकारमाध्यमिक शिक्षण विभागाने वर्षभर राबविलेल्या कॉपी रोखण्यासाठीच्या कार्यक्रमांना शहरातील आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांनी सहकार्य केले आहे. यासाठी आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकाही पार पाडल्या आहेत. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या नेतृत्वात कॉपी रोखण्याचे अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी शहर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी वेळोवेळी बैठकांना हजेरी लावली असून, आगामी काळातही सहकार्य करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय नवनियुक्त जिल्हा परिषदेचे सीईओ एम.एम. गोंदवले, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनाही या अभियानाची माहिती देण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी डॉ. चव्हाण यांनी सांगितले. 

वर्षभर राबविले जनजागृती अभियानमाध्यमिक शिक्षण विभागातर्फे वर्षभर कॉपी रोखण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात आले. तालुकास्तरावर मुख्याध्यापक, शिक्षक, पालकांचे मेळावे, कार्यशाळा घेऊन कॉपीचे धोके समजावून सांगितले. पोलीस, केंद्र संचालक, संस्थाचालकांच्या बैठक घेतल्या. त्यामध्ये कॉपीमुळे भविष्यातील पिढीचे नुकसान करीत असल्याचे सांगण्यात आले. इंग्रजी, गणित या विषयांवर अधिक लक्ष देण्यास सांगितले. त्यानंतर आता हे अभियान राबविण्यात येत असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले................................

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीEducationशिक्षणAurangabadऔरंगाबाद