शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

औरंगाबादेत मध्यरात्री राजीव गांधी मार्केटच्या मागील कचरा पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 02:20 IST

मुकुंदवाडी बसस्थानकालगत असलेल्या राजीव गांधी मार्के ट आणि पोस्ट आॅफिसच्या लगत असलेल्या सुरक्षाभिंतीजवळ साचलेल्या चमड्याच्या व इतर कचऱ्याला बुधवारी मध्यरात्री अचानक आग लागली.

औरंगाबाद : मुकुंदवाडी बसस्थानकालगत असलेल्या राजीव गांधी मार्के ट आणि पोस्ट आॅफिसच्या लगत असलेल्या सुरक्षाभिंतीजवळ साचलेल्या चमड्याच्या व इतर कचऱ्याला बुधवारी मध्यरात्री अचानक आग लागली.

२०१२ साली हे मार्केट आगीमध्ये जळून खाक झाले होते. त्यामुळे आगीचे वृत्त्त समजताच दुकानदार, नातेवाईक आणि मित्र परिवाराने तातडीने मार्केटकडे धाव घेत दुकाने उघडून सर्व काही सुरक्षित असल्याचे पाहून सुटकेचा नि:श्वास टाकला. दुकानदार रमेश घोडके यांनी सांगितले की, बुधवारी सायंकाळी मार्केटच्या मागील कचरा कुणीतरी अज्ञाताने पेटविला होता. दुकाने बंद करण्यापूर्वी तो कचरा विझविण्यात आला होता.

परंतु, रात्री एकच्या सुमारास अचानक मोठ्या आगीचे लोट उठले. आगीने गुलमोहर आणि बाभळीचे ओले झाड अर्धे जळाले. शिवाय मार्केटमधून बुट, चप्पल बनवून उरलेला कचरा भिंतीलगत टाकलेला होता, तोही पेटला. आग लागल्याचे पाहून काही दुकानदार तेथे आले, परंतु काय करावे हे त्यांना सुचले नाही.

‘लोकमत’ प्रतिनिधीने फायरब्रिगे्रडला संपर्क करून तातडीने बंब बोलावून घेतला. मध्यरात्री १२.५३ वाजता फायरब्रिगेडला फोन केल्यानंतर १ वाजून ७ मिनिटाला तेथे बंब व फायरचे जवान दाखल झाले. त्यांनी अर्धा ते पाऊण तास परिश्रम घेत कचºयाची आग विझविली. तोपर्यंत दुकानदार आणि नातेवाईकांनी मार्केट परिसरात मोठी गर्दी केली होती. नगरसेवक मनोज गांगवे, उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने यांनी फायरब्रिगे्रडच्या जवानांना मदत केली.

एक दुकान उघडले म्हणून...घोडके यांच्या दुकानाच्या पाठीमागेच आग लागली होती. त्यांचे दुकान उघडे होते म्हणून फायरब्रिगे्रडला मदत कार्य करण्यास अडथळे आले नाहीत. उपविभागीय कार्यालय, एमआयडीसीच्या गेस्ट हाऊस मागून फायरबंब जाणे शक्य नव्हते. जालना रोडवरच फायरबंब उभा करून आग विझविण्याचे प्रयत्न झाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादfireआगGarbage Disposal Issueकचरा प्रश्नMarathwadaमराठवाडा