शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

औरंगाबादेत मध्यरात्री राजीव गांधी मार्केटच्या मागील कचरा पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 02:20 IST

मुकुंदवाडी बसस्थानकालगत असलेल्या राजीव गांधी मार्के ट आणि पोस्ट आॅफिसच्या लगत असलेल्या सुरक्षाभिंतीजवळ साचलेल्या चमड्याच्या व इतर कचऱ्याला बुधवारी मध्यरात्री अचानक आग लागली.

औरंगाबाद : मुकुंदवाडी बसस्थानकालगत असलेल्या राजीव गांधी मार्के ट आणि पोस्ट आॅफिसच्या लगत असलेल्या सुरक्षाभिंतीजवळ साचलेल्या चमड्याच्या व इतर कचऱ्याला बुधवारी मध्यरात्री अचानक आग लागली.

२०१२ साली हे मार्केट आगीमध्ये जळून खाक झाले होते. त्यामुळे आगीचे वृत्त्त समजताच दुकानदार, नातेवाईक आणि मित्र परिवाराने तातडीने मार्केटकडे धाव घेत दुकाने उघडून सर्व काही सुरक्षित असल्याचे पाहून सुटकेचा नि:श्वास टाकला. दुकानदार रमेश घोडके यांनी सांगितले की, बुधवारी सायंकाळी मार्केटच्या मागील कचरा कुणीतरी अज्ञाताने पेटविला होता. दुकाने बंद करण्यापूर्वी तो कचरा विझविण्यात आला होता.

परंतु, रात्री एकच्या सुमारास अचानक मोठ्या आगीचे लोट उठले. आगीने गुलमोहर आणि बाभळीचे ओले झाड अर्धे जळाले. शिवाय मार्केटमधून बुट, चप्पल बनवून उरलेला कचरा भिंतीलगत टाकलेला होता, तोही पेटला. आग लागल्याचे पाहून काही दुकानदार तेथे आले, परंतु काय करावे हे त्यांना सुचले नाही.

‘लोकमत’ प्रतिनिधीने फायरब्रिगे्रडला संपर्क करून तातडीने बंब बोलावून घेतला. मध्यरात्री १२.५३ वाजता फायरब्रिगेडला फोन केल्यानंतर १ वाजून ७ मिनिटाला तेथे बंब व फायरचे जवान दाखल झाले. त्यांनी अर्धा ते पाऊण तास परिश्रम घेत कचºयाची आग विझविली. तोपर्यंत दुकानदार आणि नातेवाईकांनी मार्केट परिसरात मोठी गर्दी केली होती. नगरसेवक मनोज गांगवे, उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने यांनी फायरब्रिगे्रडच्या जवानांना मदत केली.

एक दुकान उघडले म्हणून...घोडके यांच्या दुकानाच्या पाठीमागेच आग लागली होती. त्यांचे दुकान उघडे होते म्हणून फायरब्रिगे्रडला मदत कार्य करण्यास अडथळे आले नाहीत. उपविभागीय कार्यालय, एमआयडीसीच्या गेस्ट हाऊस मागून फायरबंब जाणे शक्य नव्हते. जालना रोडवरच फायरबंब उभा करून आग विझविण्याचे प्रयत्न झाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादfireआगGarbage Disposal Issueकचरा प्रश्नMarathwadaमराठवाडा