शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जालन्याच्या रेल्वेकडून औरंगाबादला ‘ओव्हरटेक’; पीटलाइनचे तिकडे काम सुरू, इकडे कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 19:19 IST

पीटलाईनमुळे औरंगाबादवरून लांब पल्ल्याच्या रेल्वे सुटण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. परंतु, औरंगाबादची पीटलाईन लवकर होईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : जालन्यात पीटलाइनचे काम सुरू झालेले आहे. पीटलाइनबरोबरच येथे ‘लोको शेड’ तयार करण्याची तयारी सुरू आहे. दुसरीकडे औरंगाबादरेल्वे स्टेशनवर पीटलाइनची जागा निश्चित झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात काम सुरू होण्यासाठी कोणत्याही हालचाली होत नाहीत. रेल्वे सुविधांच्या बाबतीत जालना औरंगाबादला मागे टाकत असल्याची परिस्थिती आहे.

औरंगाबादेत अनेक वर्षांपासून रेल्वेच्या पीटलाईनची प्रतीक्षा होती. पीटलाईन आधी औरंगाबाद व नंतर चिकलठाणा येथे प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, २ जानेवारीला जालना रेल्वे स्टेशनवर १०० कोटी रुपयांच्या निधीतून पीटलाईन केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. त्यानंतर औरंगाबादेतही पीटलाईन करण्याची मागणी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी लावून धरली. अखेर मे महिन्यात औरंगाबादेत १६ बोगींच्या पीटलाईनसाठीही २९ कोटी ९४ लाख २६ हजार रुपये मंजूर करण्यात आले. परंतु, त्यापुढे प्रत्यक्षात पीटलाइन उभारणीला गती मिळत नसल्याची परिस्थिती आहे. जालन्यात पीटलाइनसह लोको शेड आणि रेल्वेच्या सोयी-सुविधांमध्ये भर पडत आहे.

जागा निश्चित, पण..चिकलठाण्याऐवजी औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरील वरिष्ठ सेक्शन इंजिनिअर कार्यालयाच्या परिसरात ही पीटलाईन होणार आहे. पीटलाईनमुळे औरंगाबादवरून लांब पल्ल्याच्या रेल्वे सुटण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. परंतु, औरंगाबादची पीटलाईन लवकर होईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

रेल्वे अधिकारी म्हणतात...यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, जालन्यातील पीटलाइनचे काम सुरू झाले. औरंगाबादच्या पीटलाइनचा समावेश ‘गती शक्ती’ योजनेत केला जाणार आहे, असे सांगण्यात आले.

पीटलाइन मार्गी लागावीऔरंगाबादच्या पीटलाइनची नुसती घोषणा झाली. प्रत्यक्षात काम सुरू होत नाही. जुनी पीटलाइन आहे. ती दुरुस्त करण्याचा विचारही करता येईल. काम लवकर सुरू करावे.- ओमप्रकाश वर्मा, मराठवाडा रेल्वे विकास समिती

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे