शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

केवळ एका अफवेमुळे औरंगाबादेत १० रुपयांची ५ कोटींची नाणी बँकांमध्ये पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 4:25 PM

बँकेत १० रुपयांची नाणी जमा होत आहेत; पण घेऊन जाण्यास ग्राहकांचा नकार

ठळक मुद्देशहरात राष्ट्रीयीकृत बँकांचे ५ करन्सीचेस्ट आहेत.

औरंगाबाद :  व्यवहारात १० रुपयांच्या नाण्यांचा वापर करावा, असे रिझर्व्ह बँकेने जाहीर आवाहन केले असतानाही ही नाणी बाद झाल्याच्या अफवेचे भूत अजूनही नागरिकांमध्ये कायम आहे. परिणामी, बँकेत १० रुपयांची नाणी जमा होत आहेत; पण घेऊन जाण्यास ग्राहक नकार देत असल्याने आजघडीला येथील बँकांमध्ये ५ कोटी रुपये मूल्य असलेली १० रुपयांची नाणी तिजोरीत पडून आहेत. 

शहरात राष्ट्रीयीकृत बँकांचे ५ करन्सीचेस्ट आहेत. याशिवाय प्रत्येक बँकेच्या शाखेमध्येही कमी अधिक प्रमाणात १० रुपयांची नाणी तिजोरीत पडून आहेत. ग्राहक या नाण्यांना हात लावण्यास तयार नाहीत. रिझर्व्ह बँकेचे आदेश आहेत की,  ही नाणी बाद झाली नाही. ग्रामीण भागातील बँकांच्या शाखांमधून शहरातील करन्सीचेस्टमध्ये १० रुपयांची नाणी येत आहे. अनेक ग्राहक ही नाणी स्वीकारत नसल्याने ती बँकेतच ठेवावी लागत आहेत.

यासंदर्भात एसबीआयच्या शहागंज शाखेचे मुख्य व्यवस्थापक दीनबंधू रॉय यांनी सांगितले की, बँकेच्या तिजोरीत १, २,५ व १० रुपयांची २ कोटी ९ लाखांपेक्षा अधिक मूल्यांची नाणी आहे. यात पावणेदोन कोटी मूल्यांच्या १० रुपयांच्या नाण्यांचा समावेश आहे. १,२ व ५ रुपयांची नाणी ग्राहक स्वीकारतात; पण १० रुपयांची नाणी घेत नसल्याने ही तिजोरीत पडून आहे. तसेच दुधडेअरी चौकातील एसबीआयच्या करन्सीचेस्टमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्याकडे आजघडीला १ कोटी ८७ लाख रुपयांची १० रुपये मूल्यांची नाणी आहे. ग्राहकांनी ही नाणी घेऊन जावी व व्यवहारात वापरावी, असे आवाहनही त्यांनी केले. 

नाणी जड असल्याचे ग्राहकांचे मतमोंढ्यातील व्यापाऱ्यांनी सांगितले की, १, २, ५ व १० रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणात बाजारात मुबलक प्रमाणात आहेत. यातील १० रुपयांची नाणी वजनाने जड असल्याने ग्राहक स्वीकारत नाहीत. ग्राहक म्हणतात की, खिशात पाचपेक्षा अधिक नाणी असतील, तर तो खिसा फाटण्याची शक्यता अधिक असते. जास्त नाणी असतील तर खिसा जड होतो, चालणेही कठीण जाते. तरीही शहरातील ग्राहक १० रुपयांची नाणी घेतात; पण ग्रामीण भागात अजूनही १० रुपयांची नाणी स्वीकारली जात नाहीत. 

रिझर्व्ह बँकेचे स्पष्टीकरण १० रुपयांची नाणी व्यवहारातून बाद झाली नाहीत. नागरिकांनी ही नाणी व्यवहारात वापरावीत, असे स्पष्ट आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. यासंदर्भातील आदेशपत्रही सर्व बँकांना प्राप्त झाले आहे. काही बँकांनी यासंदर्भात आपल्या शाखांमध्ये माहितीपत्रकही लावले आहे. मात्र, नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :bankबँकAurangabadऔरंगाबादMONEYपैसाReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक