शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

केवळ एका अफवेमुळे औरंगाबादेत १० रुपयांची ५ कोटींची नाणी बँकांमध्ये पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 16:25 IST

बँकेत १० रुपयांची नाणी जमा होत आहेत; पण घेऊन जाण्यास ग्राहकांचा नकार

ठळक मुद्देशहरात राष्ट्रीयीकृत बँकांचे ५ करन्सीचेस्ट आहेत.

औरंगाबाद :  व्यवहारात १० रुपयांच्या नाण्यांचा वापर करावा, असे रिझर्व्ह बँकेने जाहीर आवाहन केले असतानाही ही नाणी बाद झाल्याच्या अफवेचे भूत अजूनही नागरिकांमध्ये कायम आहे. परिणामी, बँकेत १० रुपयांची नाणी जमा होत आहेत; पण घेऊन जाण्यास ग्राहक नकार देत असल्याने आजघडीला येथील बँकांमध्ये ५ कोटी रुपये मूल्य असलेली १० रुपयांची नाणी तिजोरीत पडून आहेत. 

शहरात राष्ट्रीयीकृत बँकांचे ५ करन्सीचेस्ट आहेत. याशिवाय प्रत्येक बँकेच्या शाखेमध्येही कमी अधिक प्रमाणात १० रुपयांची नाणी तिजोरीत पडून आहेत. ग्राहक या नाण्यांना हात लावण्यास तयार नाहीत. रिझर्व्ह बँकेचे आदेश आहेत की,  ही नाणी बाद झाली नाही. ग्रामीण भागातील बँकांच्या शाखांमधून शहरातील करन्सीचेस्टमध्ये १० रुपयांची नाणी येत आहे. अनेक ग्राहक ही नाणी स्वीकारत नसल्याने ती बँकेतच ठेवावी लागत आहेत.

यासंदर्भात एसबीआयच्या शहागंज शाखेचे मुख्य व्यवस्थापक दीनबंधू रॉय यांनी सांगितले की, बँकेच्या तिजोरीत १, २,५ व १० रुपयांची २ कोटी ९ लाखांपेक्षा अधिक मूल्यांची नाणी आहे. यात पावणेदोन कोटी मूल्यांच्या १० रुपयांच्या नाण्यांचा समावेश आहे. १,२ व ५ रुपयांची नाणी ग्राहक स्वीकारतात; पण १० रुपयांची नाणी घेत नसल्याने ही तिजोरीत पडून आहे. तसेच दुधडेअरी चौकातील एसबीआयच्या करन्सीचेस्टमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्याकडे आजघडीला १ कोटी ८७ लाख रुपयांची १० रुपये मूल्यांची नाणी आहे. ग्राहकांनी ही नाणी घेऊन जावी व व्यवहारात वापरावी, असे आवाहनही त्यांनी केले. 

नाणी जड असल्याचे ग्राहकांचे मतमोंढ्यातील व्यापाऱ्यांनी सांगितले की, १, २, ५ व १० रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणात बाजारात मुबलक प्रमाणात आहेत. यातील १० रुपयांची नाणी वजनाने जड असल्याने ग्राहक स्वीकारत नाहीत. ग्राहक म्हणतात की, खिशात पाचपेक्षा अधिक नाणी असतील, तर तो खिसा फाटण्याची शक्यता अधिक असते. जास्त नाणी असतील तर खिसा जड होतो, चालणेही कठीण जाते. तरीही शहरातील ग्राहक १० रुपयांची नाणी घेतात; पण ग्रामीण भागात अजूनही १० रुपयांची नाणी स्वीकारली जात नाहीत. 

रिझर्व्ह बँकेचे स्पष्टीकरण १० रुपयांची नाणी व्यवहारातून बाद झाली नाहीत. नागरिकांनी ही नाणी व्यवहारात वापरावीत, असे स्पष्ट आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. यासंदर्भातील आदेशपत्रही सर्व बँकांना प्राप्त झाले आहे. काही बँकांनी यासंदर्भात आपल्या शाखांमध्ये माहितीपत्रकही लावले आहे. मात्र, नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :bankबँकAurangabadऔरंगाबादMONEYपैसाReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक