शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

केवळ एका अफवेमुळे औरंगाबादेत १० रुपयांची ५ कोटींची नाणी बँकांमध्ये पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 16:25 IST

बँकेत १० रुपयांची नाणी जमा होत आहेत; पण घेऊन जाण्यास ग्राहकांचा नकार

ठळक मुद्देशहरात राष्ट्रीयीकृत बँकांचे ५ करन्सीचेस्ट आहेत.

औरंगाबाद :  व्यवहारात १० रुपयांच्या नाण्यांचा वापर करावा, असे रिझर्व्ह बँकेने जाहीर आवाहन केले असतानाही ही नाणी बाद झाल्याच्या अफवेचे भूत अजूनही नागरिकांमध्ये कायम आहे. परिणामी, बँकेत १० रुपयांची नाणी जमा होत आहेत; पण घेऊन जाण्यास ग्राहक नकार देत असल्याने आजघडीला येथील बँकांमध्ये ५ कोटी रुपये मूल्य असलेली १० रुपयांची नाणी तिजोरीत पडून आहेत. 

शहरात राष्ट्रीयीकृत बँकांचे ५ करन्सीचेस्ट आहेत. याशिवाय प्रत्येक बँकेच्या शाखेमध्येही कमी अधिक प्रमाणात १० रुपयांची नाणी तिजोरीत पडून आहेत. ग्राहक या नाण्यांना हात लावण्यास तयार नाहीत. रिझर्व्ह बँकेचे आदेश आहेत की,  ही नाणी बाद झाली नाही. ग्रामीण भागातील बँकांच्या शाखांमधून शहरातील करन्सीचेस्टमध्ये १० रुपयांची नाणी येत आहे. अनेक ग्राहक ही नाणी स्वीकारत नसल्याने ती बँकेतच ठेवावी लागत आहेत.

यासंदर्भात एसबीआयच्या शहागंज शाखेचे मुख्य व्यवस्थापक दीनबंधू रॉय यांनी सांगितले की, बँकेच्या तिजोरीत १, २,५ व १० रुपयांची २ कोटी ९ लाखांपेक्षा अधिक मूल्यांची नाणी आहे. यात पावणेदोन कोटी मूल्यांच्या १० रुपयांच्या नाण्यांचा समावेश आहे. १,२ व ५ रुपयांची नाणी ग्राहक स्वीकारतात; पण १० रुपयांची नाणी घेत नसल्याने ही तिजोरीत पडून आहे. तसेच दुधडेअरी चौकातील एसबीआयच्या करन्सीचेस्टमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्याकडे आजघडीला १ कोटी ८७ लाख रुपयांची १० रुपये मूल्यांची नाणी आहे. ग्राहकांनी ही नाणी घेऊन जावी व व्यवहारात वापरावी, असे आवाहनही त्यांनी केले. 

नाणी जड असल्याचे ग्राहकांचे मतमोंढ्यातील व्यापाऱ्यांनी सांगितले की, १, २, ५ व १० रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणात बाजारात मुबलक प्रमाणात आहेत. यातील १० रुपयांची नाणी वजनाने जड असल्याने ग्राहक स्वीकारत नाहीत. ग्राहक म्हणतात की, खिशात पाचपेक्षा अधिक नाणी असतील, तर तो खिसा फाटण्याची शक्यता अधिक असते. जास्त नाणी असतील तर खिसा जड होतो, चालणेही कठीण जाते. तरीही शहरातील ग्राहक १० रुपयांची नाणी घेतात; पण ग्रामीण भागात अजूनही १० रुपयांची नाणी स्वीकारली जात नाहीत. 

रिझर्व्ह बँकेचे स्पष्टीकरण १० रुपयांची नाणी व्यवहारातून बाद झाली नाहीत. नागरिकांनी ही नाणी व्यवहारात वापरावीत, असे स्पष्ट आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. यासंदर्भातील आदेशपत्रही सर्व बँकांना प्राप्त झाले आहे. काही बँकांनी यासंदर्भात आपल्या शाखांमध्ये माहितीपत्रकही लावले आहे. मात्र, नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :bankबँकAurangabadऔरंगाबादMONEYपैसाReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक