शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

औरंगाबादमध्ये १ ते ४० वयोगटातील रुग्ण अधिक मात्र, मृत्यूचे प्रमाण कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 7:28 PM

औरंगाबादेत दीड महिन्यापासून रोज कोरोनाग्रस्तांची भर पडत आहे. यात ५१ ते ८० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण सर्वात कमी आहे.

ठळक मुद्दे ज्येष्ठांनाच धोका का, कमी वयात मृत्यूचे प्रमाण कमी का?९० टक्के मृत्यू हे ५० वर्षांवरील असल्याचे समोर आले

- संतोष हिरेमठ औरंगाबाद : औरंगाबादेत १ ते ४० वयोगटात कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. एकूण रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण या वयोगटातील आहेत. मात्र, सर्वाधिक रुग्ण असूनही या वयोगटात मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी आहे. ज्येष्ठांनाच धोका का, कमी वयात मृत्यूचे प्रमाण कमी का, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

औरंगाबादेत दीड महिन्यापासून रोज कोरोनाग्रस्तांची भर पडत आहे. यात ५१ ते ८० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण सर्वात कमी आहे. या वयोगटातील रुग्णसंख्या जवळपास २५ टक्के आहे; परंतु याच वयातील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याउलट १ ते ४० वयाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक असूनही, या वयोगटात मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी आहे. शहरात बुधवारपर्यंत कोरोनाच्या १२१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात ४० वर्षांखालील केवळ ९ रुग्णांचा समावेश आहे. 

वयाच्या ४० वर्षांनंतर शरीरात रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे कोरोना व्हायरस या वयोगटातील व्यक्तींवर अधिक लवकर हल्ला करतो; परंतु तरुण, लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती अधिक असते. सर्दी, खोकला यासारख्या समस्यांवर लहान मुले सहजपणे लढतात. त्यामुळे कोरोना व्हायरसचा तरुण आणि लहान मुलांवर परिणाम होत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एकट्या जिल्हा सामान्य रुग्णालयात १२ वर्षांखालील ४८ मुले दाखल झाली होती. हे सर्व उपचार घेऊन घरी परतल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.

९०% मृत्यू ५० वर्षांवरीलसमितीच्या माध्यमातून दर १५ दिवसांनी डेथ आॅडिट केले जाते. ९० टक्के मृत्यू हे ५० वर्षांवरील असल्याचे यातून समोर आले आहे. नागरिकांनी लवकरात लवकर उपचार घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या.

वयोमानानुसार कोरोनाग्रस्तांचे प्रमाणवय               टक्केवारी१ ते १०            ७.१११ ते २०          ११.२२१ ते ३०           १९.५३१ ते ४०           २२.५४१ ते  ५०          १४.२५१ ते  ६०           १२.८६१ ते  ७०           ८.९७१ ते ८०           ३.२८० वरील             ०.९ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद