शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

औरंगाबादेत राष्टवादीला जिल्हाध्यक्ष मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:42 IST

राष्टÑवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील आले तरी औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षाच्या नियुक्तीला मुहूर्त लागेना. त्यामुळे या पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्यांचा हिरमोड न झाल्यास नवल.

ठळक मुद्देपक्षसंघटनाही ढासळली : कोट्यवधींच्या राष्टÑवादी भवनातही सामसूमच

स. सो. खंडाळकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राष्टÑवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील आले तरी औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षाच्या नियुक्तीला मुहूर्त लागेना. त्यामुळे या पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्यांचा हिरमोड न झाल्यास नवल.वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असून नसल्यासारखे आहेत. २०१९ च्या निवडणुका जवळ येत असल्याने त्यांना त्यांच्या मतदारसंघातच लक्ष घालायला वेळ कमी पडतो. त्यामुळे मला मतदारसंघातच लक्ष घालू द्या, असा आग्रह त्यांनी आज नव्हे तर फार पूर्वीपासूनच धरून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी टाळली आहे. सुनील तटकरे अध्यक्ष होते, तेव्हापासूनच ते जिल्हाध्यक्ष असून नसल्यासारखे आहेत. स्वत: अजित पवार यांनी येऊन हडकोतील राष्टÑवादी भवनात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. तेव्हापासून नव्या अध्यक्षाच्या नियुक्तीला मुहूर्त लागतच नाही. सुनील तटकरे गेले, आता जयंतराव पाटील नवे प्रदेशाध्यक्ष बनले. ते जाणकार व अभ्यासू म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या असतानाच अद्याप नव्या जिल्हाध्यक्षाच्या नियुक्तीला मुहूर्त लागत नाही. त्यामुळे इच्छुकांची घालमेल वाढली आहे.आमदार जिल्हाध्यक्ष असल्यास कामे होण्यात अडचणी येत नाहीत, हे धोरण अजित पवारांचे होते. त्यातून पूर्वी संजय वाघचौरे व आता भाऊसाहेब चिकटगावकर यांच्या गळ्यात ही माळ पडली होती. परंतु आमदार आधी आपल्या मतदारसंघाकडे लक्ष देतो व फार कमी वेळ संघटनेला देतो, असेच सिद्ध झाल्याने हा प्रयोग फसला असेच म्हणावे लागेल.सुधाकर सोनवणे यांचा कार्यकाळ तसा उल्लेखनीयच राहिला. विविध आंदोलने, राजकीय घडामोडी, निवडणुकांमध्ये राष्टÑवादी काँग्रेसचा बोलबाला असायचा. आता जणू औरंगाबाद जिल्हा राष्टÑवादीच्या नेत्यांनी वाऱ्यावरच सोडून दिला असल्याचे जाणवत आहे. अलीकडे झालेल्या विविध निवडणुकांमध्ये राष्टÑवादी काँग्रेसचा परफॉर्मन्स नगण्य राहिला आहे. राष्टÑवादी भवनातील चहलपहलही कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर सक्षम जिल्हाध्यक्षांची नियुक्ती लवकरात लवकर होईल काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.नावे नुसतीच चर्चेतभाऊसाहेब पाटील चिकटगावकर, संजय वाघचौरे व सुधाकर सोनवणे यांना सोडून रंगनाथ काळे, विलास चव्हाण, माजी आमदार कैलास पाटील गंगापूरकर, पांडुरंग तांगडे पाटील ही नावे पूर्वीपासूनच स्पर्धेत आहेत. यापैकी कोण अध्यक्ष होणार ही उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. जयंतराव पाटील यांना भेटून आलेल्या इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या असल्या तरी अजित पवार यांच्या मनात नेमके कोण आहे व काय आहे, यावरच सारे अवलंबून आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAurangabadऔरंगाबादPoliticsराजकारण