शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

कचरा संकलक कंपनीसमोर मनपाचे रेड कार्पेट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 18:51 IST

पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीसमोर मनपा प्रशासनाने रेड कार्पेट अंथरून ठेवले आहे.

ठळक मुद्देपार्किंगसाठी पाच जागा मोफतमालकीच्या ७० रिक्षाही दिल्या

औरंगाबाद : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीसमोर मनपा प्रशासनाने रेड कार्पेट अंथरून ठेवले आहे. कंपनीची वाहने उभी करण्यासाठी शहरात पाच ठिकाणी मोफत स्वरूपात महापालिकेने भूखंड उपलब्ध करून दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या मालकीच्या ७० रिक्षाही कंपनीला वापरण्यासाठी देण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या रिक्षांची देखभाल दुरुस्ती अनेक महिन्यांपासून महापालिका करीत आहे. एका खाजगी कंपनीचे एवढे लाड पुरविल्यानंतरही कंपनी एक मेट्रिक टन कचरा उचलल्यानंतर मनपाकडून १६८० रुपये वसूल करीत आहे.

कंपनीने पहिल्या दिवसापासून व्यावसायिक धोरण स्वीकारले आहे. कंपनीचे १ कोटी ३९ लाख रुपयांचे बिल लेखा विभागात प्रलंबित आहे. कंपनीच्या कामगारांनी मंगळवारी कामबंद आंदोलन करून मनपाला, शहराला वेठीस धरले. कंपनीला तातडीने ५० लाख रुपये द्या, अशी शिष्टाई महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली. कंपनी काम सोडून पळून जाईल, या भीतीपोटी कंपनीच्या सर्व मागण्या विनाअट मंजूर करण्यात येत आहेत. मनपाने कंपनीसोबत केलेल्या करारात पार्किंगसाठी मोफत भूखंड उपलब्ध करून देण्याचा कुठेच उल्लेख नाही. तरीही कंपनीला एन-१२, शिवाजीनगर पाण्याची टाकी, उल्कानगरी, रमानगर, मध्यवर्ती जकात नाका येथे पार्किंगसाठी भूखंड देण्यात आले आहेत. या भूखंडापोटी मनपा कंपनीकडून एक रुपयाही भाडे घेत नाही, हे विशेष.

शहरातील ११५ वॉर्डांतील कचरा संकलन करण्यासाठी कंपनीने स्वत:च्या नावावर असलेली वाहने खरेदी करावीत, अशी अट आहे. महापालिकेने तब्बल ७० रिक्षा कंपनीला कचरा उचलण्यासाठी दिल्या आहेत. या सर्व रिक्षांचे मेंटेनन्स आजही मनपा प्रशासन करीत आहे. कंपनी आपल्या इतर रिक्षांसोबत मनपाच्या रिक्षांचीही देखभाल दुरुस्ती करू शकते, पण मनपा प्रशासन लाखो रुपये खर्च करीत आहे.

संमिश्र कचऱ्यावर प्रक्रिया करणार तरी कशी?- कंपनीने शहरातील ११५ वॉर्डांतील नागरिकांच्या दारावर जाऊन कचरा जमा करावा, असे करारात नमूद केले आहे. मोजक्याच वॉर्डांमध्ये डोअर-टू- डोअर कलेक्शन सुरू आहे. अनेक वॉर्डांमध्ये कंपनी गल्लोगल्लीत पडलेला कचरा उचलण्याचे काम करीत आहे. - एकाही नागरिकाच्या दारावर कंपनी जाण्यास तयार नाही. कंपनीने ओला व सुका कचरा वेगळा जमा केला पाहिजे, असेही करारात म्हटले असताना मोठ्या वाहनांमध्ये सर्व कचरा मिक्स करून प्रक्रिया केंद्रावर नेण्यात येत आहे. - मिक्स कचऱ्यावर प्रक्रिया करणार तरी कशी, असा प्रश्न प्रक्रिया करणाऱ्या कंत्राटदारांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

सहा झोनमध्ये कामकंपनीला आपले काम सुरू करून पाच महिने होत आले तरी शहरातील सहा झोनमधीलच कचरा कंपनी जमा करीत आहे. उर्वरित तीन झोनमध्ये आजही महापालिका लाखो रुपये खर्च करून कचरा संकलन, वाहतूक करीत आहे. कंपनीने काम सुरू केल्यावर मनपाची कोट्यवधी रुपयांची बचत होईल, असे दिवास्वप्न प्रशासनाने दाखविले होते. या खर्चात किंचितही फरक पडलेला नाही.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीAurangabadऔरंगाबाद