शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

कचरा संकलक कंपनीसमोर मनपाचे रेड कार्पेट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 18:51 IST

पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीसमोर मनपा प्रशासनाने रेड कार्पेट अंथरून ठेवले आहे.

ठळक मुद्देपार्किंगसाठी पाच जागा मोफतमालकीच्या ७० रिक्षाही दिल्या

औरंगाबाद : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीसमोर मनपा प्रशासनाने रेड कार्पेट अंथरून ठेवले आहे. कंपनीची वाहने उभी करण्यासाठी शहरात पाच ठिकाणी मोफत स्वरूपात महापालिकेने भूखंड उपलब्ध करून दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या मालकीच्या ७० रिक्षाही कंपनीला वापरण्यासाठी देण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या रिक्षांची देखभाल दुरुस्ती अनेक महिन्यांपासून महापालिका करीत आहे. एका खाजगी कंपनीचे एवढे लाड पुरविल्यानंतरही कंपनी एक मेट्रिक टन कचरा उचलल्यानंतर मनपाकडून १६८० रुपये वसूल करीत आहे.

कंपनीने पहिल्या दिवसापासून व्यावसायिक धोरण स्वीकारले आहे. कंपनीचे १ कोटी ३९ लाख रुपयांचे बिल लेखा विभागात प्रलंबित आहे. कंपनीच्या कामगारांनी मंगळवारी कामबंद आंदोलन करून मनपाला, शहराला वेठीस धरले. कंपनीला तातडीने ५० लाख रुपये द्या, अशी शिष्टाई महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली. कंपनी काम सोडून पळून जाईल, या भीतीपोटी कंपनीच्या सर्व मागण्या विनाअट मंजूर करण्यात येत आहेत. मनपाने कंपनीसोबत केलेल्या करारात पार्किंगसाठी मोफत भूखंड उपलब्ध करून देण्याचा कुठेच उल्लेख नाही. तरीही कंपनीला एन-१२, शिवाजीनगर पाण्याची टाकी, उल्कानगरी, रमानगर, मध्यवर्ती जकात नाका येथे पार्किंगसाठी भूखंड देण्यात आले आहेत. या भूखंडापोटी मनपा कंपनीकडून एक रुपयाही भाडे घेत नाही, हे विशेष.

शहरातील ११५ वॉर्डांतील कचरा संकलन करण्यासाठी कंपनीने स्वत:च्या नावावर असलेली वाहने खरेदी करावीत, अशी अट आहे. महापालिकेने तब्बल ७० रिक्षा कंपनीला कचरा उचलण्यासाठी दिल्या आहेत. या सर्व रिक्षांचे मेंटेनन्स आजही मनपा प्रशासन करीत आहे. कंपनी आपल्या इतर रिक्षांसोबत मनपाच्या रिक्षांचीही देखभाल दुरुस्ती करू शकते, पण मनपा प्रशासन लाखो रुपये खर्च करीत आहे.

संमिश्र कचऱ्यावर प्रक्रिया करणार तरी कशी?- कंपनीने शहरातील ११५ वॉर्डांतील नागरिकांच्या दारावर जाऊन कचरा जमा करावा, असे करारात नमूद केले आहे. मोजक्याच वॉर्डांमध्ये डोअर-टू- डोअर कलेक्शन सुरू आहे. अनेक वॉर्डांमध्ये कंपनी गल्लोगल्लीत पडलेला कचरा उचलण्याचे काम करीत आहे. - एकाही नागरिकाच्या दारावर कंपनी जाण्यास तयार नाही. कंपनीने ओला व सुका कचरा वेगळा जमा केला पाहिजे, असेही करारात म्हटले असताना मोठ्या वाहनांमध्ये सर्व कचरा मिक्स करून प्रक्रिया केंद्रावर नेण्यात येत आहे. - मिक्स कचऱ्यावर प्रक्रिया करणार तरी कशी, असा प्रश्न प्रक्रिया करणाऱ्या कंत्राटदारांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

सहा झोनमध्ये कामकंपनीला आपले काम सुरू करून पाच महिने होत आले तरी शहरातील सहा झोनमधीलच कचरा कंपनी जमा करीत आहे. उर्वरित तीन झोनमध्ये आजही महापालिका लाखो रुपये खर्च करून कचरा संकलन, वाहतूक करीत आहे. कंपनीने काम सुरू केल्यावर मनपाची कोट्यवधी रुपयांची बचत होईल, असे दिवास्वप्न प्रशासनाने दाखविले होते. या खर्चात किंचितही फरक पडलेला नाही.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीAurangabadऔरंगाबाद