शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
4
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
5
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
6
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
7
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
8
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
9
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
10
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
11
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
12
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
13
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
14
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
15
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
16
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
17
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
18
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
19
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला

पाच ग्रामपंचायतींकडे औरंगाबाद मनपाचे थकले ३७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 19:21 IST

जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिन्यांवर चितेगाव, बिडकीन, ढोरकीन, इसापूर आणि पिंपळवाडी या पाच ग्रामपंचायतींना पाण्याचे कनेक्शन देण्यात आले आहेत. या ग्रामपंचायतींनी पाणीपट्टीच भरलेली नाही.

औरंगाबाद : जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिन्यांवर चितेगाव, बिडकीन, ढोरकीन, इसापूर आणि पिंपळवाडी या पाच ग्रामपंचायतींना पाण्याचे कनेक्शन देण्यात आले आहेत. या ग्रामपंचायतींनी पाणीपट्टीच भरलेली नाही. वारंवार पाठपुरावा करून आणि नोटिसा पाठवूनही त्याची दखल घेतली जात नाही. या ग्रामपंचायतींकडे मनपाचे तब्बल ३७ कोटी रुपये थकले आहेत.

जायकवाडी ते नक्षत्रवाडी या ५५ कि. मी. अंतरात ग्रामपंचायतींना राज्य सरकारच्या सूचनेनुसार पाणी देण्यात आले. पाणीपट्टी महानगरपालिकेकडे जमा करावी, असे आदेशही शासनाने दिले होते. महानगरपालिकेने पिंपळवाडी, इसापूर, ढोरकीन, बिडकीन आणि चितेगाव या पाच ग्रामपंचायतींना कनेक्शन दिले. पाणी न दिल्यास जलवाहिनी फोडून नागरिक पाणी घेत असत. 

मागील अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतींनी पाणीपट्टीची रक्कमच भरलेली नाही. मनपानेही वसुलीकडे दुर्लक्ष केले. दरवर्षी मार्च महिना येण्यापूर्वी मनपाला ग्रामपंचायतींकडे किती पैसे थकले याची आठवण येते. मार्च महिना संपला तर पुन्हा आलबेल होते. ४० वर्षांपासूनची ही थकबाकी कोटीच्या घरात गेली आहे. 

पाच ग्रामपंचायतींकडे ३७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. मनपाने जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाला पत्रव्यवहार सुरू केला आहे. राज्य सरकारकडेही पाणीपट्टीच्या थकबाकी रकमेची मागणी केली; परंतु जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेकडून मनपाला पाणीपट्टीची थकबाकी देण्यास टाळाटाळ होत आहे. पाच ग्रामपंचायतींकडे पाणीपट्टीची ३७ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती मनपाचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी आयुक्तांकडे सादर केली आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद