शहरं
Join us  
Trending Stories
1
Hayli Gubbi: भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथियोपिया ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग?
2
PM Modi: ११ फूट रुंद, २२ फूट लांब, १९१ फूट उंच; पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या शिखरावर फडकवणार भगवा ध्वज!
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, दर महिन्याला छोटी रक्कम जमा करा; ५ वर्षात बनेल १४ लाखांचा फंड
4
मोहम्मद पैगंबरांच्या केसासाठी १० लाखांचे दागिने गमावले, माहीममधील कुटुंबाची भामट्याकडून फसवणूक
5
T20 World Cup 2026 Schedule : कधी अन् कुठं रंगणार IND vs PAK यांच्यातील सामना? मोठी माहिती आली समोर
6
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंचा भारत दौरा पुन्हा लांबणीवर! कारण काय? 
7
IND vs SA: गुवाहाटी कसोटीत भारताचा विजय अशक्य का? आतापर्यंत एकदाच गाठलाय ३००+ स्कोर!
8
धर्मेंद्र यांचे चाहते सनी-बॉबी देओलवर नाराज, म्हणाले- आयुष्यात त्यांचे सिनेमे पाहणार नाही !
9
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
10
'यमला पगला दीवाना' टायटल मीच धर्मेंद्र यांना दिलेलं..., सचिन पिळगावकरांनी सांगितला किस्सा
11
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
12
बिग बॉस मराठी ६ लवकरच...! अखेर झाली घोषणा, कोण असणार होस्ट? प्रेक्षकांची वाढली उत्सुकता
13
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
14
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
15
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
16
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
17
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
18
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
19
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
20
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाच ग्रामपंचायतींकडे औरंगाबाद मनपाचे थकले ३७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 19:21 IST

जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिन्यांवर चितेगाव, बिडकीन, ढोरकीन, इसापूर आणि पिंपळवाडी या पाच ग्रामपंचायतींना पाण्याचे कनेक्शन देण्यात आले आहेत. या ग्रामपंचायतींनी पाणीपट्टीच भरलेली नाही.

औरंगाबाद : जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिन्यांवर चितेगाव, बिडकीन, ढोरकीन, इसापूर आणि पिंपळवाडी या पाच ग्रामपंचायतींना पाण्याचे कनेक्शन देण्यात आले आहेत. या ग्रामपंचायतींनी पाणीपट्टीच भरलेली नाही. वारंवार पाठपुरावा करून आणि नोटिसा पाठवूनही त्याची दखल घेतली जात नाही. या ग्रामपंचायतींकडे मनपाचे तब्बल ३७ कोटी रुपये थकले आहेत.

जायकवाडी ते नक्षत्रवाडी या ५५ कि. मी. अंतरात ग्रामपंचायतींना राज्य सरकारच्या सूचनेनुसार पाणी देण्यात आले. पाणीपट्टी महानगरपालिकेकडे जमा करावी, असे आदेशही शासनाने दिले होते. महानगरपालिकेने पिंपळवाडी, इसापूर, ढोरकीन, बिडकीन आणि चितेगाव या पाच ग्रामपंचायतींना कनेक्शन दिले. पाणी न दिल्यास जलवाहिनी फोडून नागरिक पाणी घेत असत. 

मागील अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतींनी पाणीपट्टीची रक्कमच भरलेली नाही. मनपानेही वसुलीकडे दुर्लक्ष केले. दरवर्षी मार्च महिना येण्यापूर्वी मनपाला ग्रामपंचायतींकडे किती पैसे थकले याची आठवण येते. मार्च महिना संपला तर पुन्हा आलबेल होते. ४० वर्षांपासूनची ही थकबाकी कोटीच्या घरात गेली आहे. 

पाच ग्रामपंचायतींकडे ३७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. मनपाने जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाला पत्रव्यवहार सुरू केला आहे. राज्य सरकारकडेही पाणीपट्टीच्या थकबाकी रकमेची मागणी केली; परंतु जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेकडून मनपाला पाणीपट्टीची थकबाकी देण्यास टाळाटाळ होत आहे. पाच ग्रामपंचायतींकडे पाणीपट्टीची ३७ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती मनपाचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी आयुक्तांकडे सादर केली आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद