शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शहानुरमियाँ दर्गासमोर महापालिका प्रशासकीय इमारत उभारणार; करार रद्द करून जागा ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 13:03 IST

साडेचार कोटी देऊन महापालिकेने शहानुरमियाँ दर्गासमोरील मार्केट घेतले ताब्यात

औरंगाबाद : शहानुरमियाँ दर्गासमोरील जागा महापालिकेने २०१२ मध्ये बीओटी तत्त्वावर श्रीहरी असोसिएटला दिली होती. या जागेवर महापालिकेची प्रशासकीय इमारत बांधण्याच्या हालचालींना वेग आला असून, मागील आठवड्यात प्रशासनाने तब्बल साडेचार कोटी रुपये देऊन जागा परत घेतली.

दहा वर्षांपूर्वी महापालिकेत बोओटीचे वारे वाहत होते. कोट्यवधी रुपयांच्या जागा बीओटीवर खासगी विकसकांना देण्यात आल्या. त्यातील अनेक प्रकल्प दहा वर्षांनंतरही रखडलेले आहेत. शहानुरमियाँ दर्गासमोरील जागाही श्रीहरी असोसिएटस्ने बीओटी तत्त्वावर विकसित करण्यासाठी घेतली होती. या ठिकाणी युरोपियन मार्केट विकसित करण्याची कल्पना होती. पण, ही कल्पना साकार होऊ शकली नाही. सोमवारचा आठवडी बाजार या जागेत भरविण्यात येत होता. त्याशिवाय खासगी ट्रॅव्हल्सच्या बस उभ्या करण्यासाठी या जागेचा वापर होऊ लागला. विकसकाने ही जागा महापालिकेला परत करावी यासाठी तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी प्रयत्न सुरू केले. अखेर ती जागा विकसकाकडून परत घेण्यात आली तसा ठरावही घेण्यात आला.

महापालिकेचा फायदाच झालाउपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले की, श्रीहरी असोसिएटस्ला २०१२ मध्ये जागा देण्यात आली होती. दरवर्षी ३० लाख रुपये असोसिएटस्ने भरावे, असे ठरले होते. पण, लिज ॲग्रीमेंट झाले नव्हते. असोसिएटस्ने २०१३ पासून मनपाकडे पैसेच भरले नाहीत. त्यामुळे विकासकाकडून जागा परत मागण्यात आली. विकासकाने त्याला तयारी दर्शविली. त्यानुसार सुमारे ८ कोटी रुपये देऊन जागा परत घेण्याचा निर्णय झाला. त्यातून दरवर्षीच्या थकीत भाड्याचे ३ कोटी ५६ लाख रुपये वळते करून घेतले आणि साडेचार कोटी रुपये विकासकाला देण्यात आले. भविष्यात या ठिकाणी प्रशासकीय इमारत उभारण्याचा मनोदय असल्याचे त्यांनी नमूद केले.

बाजार मनपा भरविणारमहापालिकेने जागा ताब्यात घेतली असून, या ठिकाणी असलेले वाहनतळ आणि आठवडी बाजार सुरू राहील. वाहनतळाच्या माध्यमातून दरवर्षी १ लाख रुपये, तर आठवडी बाजाराच्या माध्यमातून दरवर्षी १ लाख २० हजार रुपये, असे २ लाख २० हजार रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका