शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

औरंगाबाद मनपाकडे १७० कोटींची बिले थकली; कंत्राटदारांनी दिला बहिष्काराचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 14:01 IST

लवकरच हा आकडा २०० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देयांत्रिकी विभागातील सर्व कंत्राटदारांची एकजूट १५० टँकरचालकांचे सोमवारपासून काम बंद

औरंगाबाद : महापालिकेतील कंत्राटदारांना आठ महिन्यांपासून बिले देण्यात आलेली नाहीत. कंत्राटदारांच्या देयकांची थकबाकी १७० कोटींहून अधिक झाली आहे. लवकरच हा आकडा २०० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यांत्रिकी विभागातील सर्व कंत्राटदारांनी एकजूट दाखवत नवीन वर्षापासून काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. 

महापालिकेचा यांत्रिकी विभाग आता नावालाच उरला आहे. महापालिकेच्या मालकीच्या सर्व वाहनांची दुरुस्ती खाजगी वर्कशॉपमध्ये करण्यात येते. काही वाहनांचे सुटे भाग खरेदी करून बदलण्याचे काम यांत्रिकी विभागाकडून करण्यात येते. यांत्रिकी विभागातील सर्व वाहनांचे सुटे भाग, दुरुस्तीचे काम खाजगी कंत्राटदारांमार्फत करण्यात येते. आठ महिन्यांपासून या कंत्राटदारांना बिलेच देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे सोमवारी सर्व कंत्राटदारांनी प्रशासनाला लेखी निवेदन देऊन मंगळवारपासून काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. कोट्यवधी रुपयांची बिले थकली आहेत. वारंवार निवेदन दिल्यानंतरही कंत्राटदारांची अजिबात दखल न घेतल्याने नाईलाजास्तव काम बंद केल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

कामकाज ठप्प होणारमनपाची सर्व वाहने २० ते २५ वर्षे जुनी आहेत. त्यांच्या दुरुस्तीवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होतात. बरीच वाहने अधिका-यांच्या दिमतीला आहेत. काही वाहने कचरा उचलण्यासाठी आहेत. कंत्राटदारांच्या बहिष्कारामुळे खराब वाहने जागेवर उभी राहण्याची शक्यता आहे. कचरा उचलण्यासाठी कंत्राटदाराच्या रिक्षा, मोठी वाहने भाडेतत्त्वावर घेतली आहेत. या कंत्राटदारांनीही काम बंदचा इशारा दिला. कंत्राटदाराचे  १५० रिक्षा आहे.

पाण्याचे टँकरही बंदशहरातील १५० पेक्षा अधिक वसाहतींची तहान महापालिका टँकरने भागवत आहे. मागील काही दिवसांपासून टँकर कंत्राटदाराला महापालिकेने बिल अदा केले नाही. त्यामुळे टँकरचालकांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले. सोमवारी टँकरचालकांना डिझेल टाकण्यासाठी पैसे नव्हते. उधारीवर डिझेल देणेही बंद करण्यात आले. 

चौकशीत लेखा विभागाला क्लीन चिटलेखा विभागाने वाटप केलेल्या १८ कोटी ४० लाखांचे बिल वाटप दोन महिन्यांपासून गाजतो आहे. जीबीने दिलेल्या आदेशानुसार आयुक्तांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमली. समितीचा अहवाल मंगळवारी सादर होण्याची शक्यता असून, अहवालात लेखा विभागाला क्लीन चिट देण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.समितीने सात मुद्यांवर माहिती मागविली होती. मात्र, लेखा विभागाने बिले कोणाला वाटली एवढीच माहिती दिली. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीTaxकर