शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

औरंगाबाद मनपाकडे १७० कोटींची बिले थकली; कंत्राटदारांनी दिला बहिष्काराचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 14:01 IST

लवकरच हा आकडा २०० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देयांत्रिकी विभागातील सर्व कंत्राटदारांची एकजूट १५० टँकरचालकांचे सोमवारपासून काम बंद

औरंगाबाद : महापालिकेतील कंत्राटदारांना आठ महिन्यांपासून बिले देण्यात आलेली नाहीत. कंत्राटदारांच्या देयकांची थकबाकी १७० कोटींहून अधिक झाली आहे. लवकरच हा आकडा २०० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यांत्रिकी विभागातील सर्व कंत्राटदारांनी एकजूट दाखवत नवीन वर्षापासून काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. 

महापालिकेचा यांत्रिकी विभाग आता नावालाच उरला आहे. महापालिकेच्या मालकीच्या सर्व वाहनांची दुरुस्ती खाजगी वर्कशॉपमध्ये करण्यात येते. काही वाहनांचे सुटे भाग खरेदी करून बदलण्याचे काम यांत्रिकी विभागाकडून करण्यात येते. यांत्रिकी विभागातील सर्व वाहनांचे सुटे भाग, दुरुस्तीचे काम खाजगी कंत्राटदारांमार्फत करण्यात येते. आठ महिन्यांपासून या कंत्राटदारांना बिलेच देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे सोमवारी सर्व कंत्राटदारांनी प्रशासनाला लेखी निवेदन देऊन मंगळवारपासून काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. कोट्यवधी रुपयांची बिले थकली आहेत. वारंवार निवेदन दिल्यानंतरही कंत्राटदारांची अजिबात दखल न घेतल्याने नाईलाजास्तव काम बंद केल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

कामकाज ठप्प होणारमनपाची सर्व वाहने २० ते २५ वर्षे जुनी आहेत. त्यांच्या दुरुस्तीवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होतात. बरीच वाहने अधिका-यांच्या दिमतीला आहेत. काही वाहने कचरा उचलण्यासाठी आहेत. कंत्राटदारांच्या बहिष्कारामुळे खराब वाहने जागेवर उभी राहण्याची शक्यता आहे. कचरा उचलण्यासाठी कंत्राटदाराच्या रिक्षा, मोठी वाहने भाडेतत्त्वावर घेतली आहेत. या कंत्राटदारांनीही काम बंदचा इशारा दिला. कंत्राटदाराचे  १५० रिक्षा आहे.

पाण्याचे टँकरही बंदशहरातील १५० पेक्षा अधिक वसाहतींची तहान महापालिका टँकरने भागवत आहे. मागील काही दिवसांपासून टँकर कंत्राटदाराला महापालिकेने बिल अदा केले नाही. त्यामुळे टँकरचालकांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले. सोमवारी टँकरचालकांना डिझेल टाकण्यासाठी पैसे नव्हते. उधारीवर डिझेल देणेही बंद करण्यात आले. 

चौकशीत लेखा विभागाला क्लीन चिटलेखा विभागाने वाटप केलेल्या १८ कोटी ४० लाखांचे बिल वाटप दोन महिन्यांपासून गाजतो आहे. जीबीने दिलेल्या आदेशानुसार आयुक्तांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमली. समितीचा अहवाल मंगळवारी सादर होण्याची शक्यता असून, अहवालात लेखा विभागाला क्लीन चिट देण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.समितीने सात मुद्यांवर माहिती मागविली होती. मात्र, लेखा विभागाने बिले कोणाला वाटली एवढीच माहिती दिली. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीTaxकर