शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

‘वंचित बहुजन आघाडी-एमआयएम’मुळे औरंगाबाद महापालिकेत युतीला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 19:18 IST

६५ ते ७० नगरसेवक निवडून येण्याची क्षमता

ठळक मुद्देमूलभूत समस्यांनी शहरवासी अगोदरच  त्रस्त २२ दलित नगरसेवक

औरंगाबाद :  वंचित बहुजन आघाडी-एमआयएमला लोकसभा निवडणुकीत शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांतून २ लाख ६२ हजार मते मिळाली आहेत. या मतांच्या बळावर महापालिकेत मागील ३४ वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजप युतीला सत्तेपासून ‘वंचित’ करण्याची संधी आघाडीला चालून आली आहे. वर्षभरानंतर महापालिकेच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये यामुळे युतीच्या सत्तेला धोका निर्माण झाला आहे. 

महापालिकेत शिवसेना-भाजप युतीला कधीच बहुमत मिळाले नाही. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकांमध्ये युतीने अपक्षांच्या मदतीनेसत्ता स्थापन केली. २०१५ मध्ये युतीचे ११३ पैकी फक्त ५१ उमेदवार निवडून आले. सातारा, देवळाईचा समावेश मनपात झाल्यानंतर भाजप, काँग्रेसला प्रत्येकी १ जागा मिळाली. युतीपाठोपाठ सर्वात मोठा पक्ष म्हणून महापालिकेत एमआयएमचा उदय झाला. पक्षाच्या चिन्हावर २४ नगरसेवक निवडून आले. नंतर काहींची हकालपट्टी पक्षातून करण्यात आली. बुढीलेन वॉर्डाच्या पोटनिवडणुकीत एमआयएमची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने हिसकावून घेतली. आजही एमआयएमचे संख्याबळ २३ आहे. महापालिकेत काँग्रेसचे ११ नगरसेवक निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या ५ आहे. दोन्ही पक्षात सहा मुस्लिम नगरसेवकांचा समावेश आहे.

२२ दलित नगरसेवक२०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, बीएसपी, रिपाइं डेमोक्रॅटिक, अपक्ष, अशा विविध पक्ष़ाच्या २२ दलित उमेदवारांनी विजय मिळविला. एमआयएमचे २३, काँग्रेस- राष्ट्रवादीमधील ६ मुस्लिम नगरसेवकांची बेरीज केल्यास २९ जण होतात. त्यात २२ दलित नगरसेवकांचा समावेश केला तर संख्या ५१ पर्यंत जाते. शिवसेना-भाजप युतीएवढीच ताकद दलित, मुस्लिम नगरसेवकांची आहे. 

मिशन ७० ठेवणारएमआयएम-बहुजन वंचित आघाडी आगामी मनपा निवडणुकीत युतीला सत्तेपासून रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे. कारण एमआयएमला मनपात घवघवीत यश मिळवून देणारे माजी जिल्हाध्यक्ष जावेद कुरैशी पुन्हा एकदा स्वगृही पोहोचले आहेत. शहरात ७० उमेदवार निवडून आणण्यासाठी जावेद कुरैशी व्यूहरचना आखणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. कारण मध्य विधानसभा मतदारसंघात जावेद कुरैशी ‘वंचित’चे संभाव्य उमेदवार राहण्याची शक्यता आहे. विधानसभेत यश मिळाल्यावर वंचित आघाडी मिशन मनपा राबविणार आहे.

युती विरोधात मतदारांमध्ये नाराजीमनपात मागील ३४ वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. मागील साडेतीन दशकांमध्ये युतीने काय केले, असा प्रश्न नागरिक विचारत आहे. नऊ दिवसांनंतर पाणी, शहरात कचऱ्याचे डोंगर, जिकडे तिकडे खड्डे, मूलभूत सोयी- सुविधांची ओरड सुरू आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये युतीला पाणी, कचरा प्रश्नाचे बरेच चटके सहन करावे लागले.

पक्षीय बलाबलशिवसेना     -    २८भाजप     -    २३एमआयएम    -    २३काँग्रेस     -    १२बीएसपी     -    ०५राष्ट्रवादी काँग्रेस    -    ०५रिपाइं(डेमोक्रॅटिक)    -    ०२अपक्ष    -    १७एकूण    -    ११५

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन