शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

औरंगाबाद मनपा आयुक्त दीर्घ रजेवर; कामकाज ठप्प होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 7:15 PM

विकासकामांसाठी एक रुपयाही तिजोरीत नाही, अशा गंभीर परिस्थितीत आयुक्त डॉ. निपुण विनायक बुधवारपासून दीर्घ रजेवर जात आहेत.

औरंगाबाद : कचऱ्यावर प्रक्रिया करणारे कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प अजूनही कागदावर आहेत. हे प्रकल्प उभारणे महापालिकेसाठी मोठे आव्हान ठरत आहे. कचरा प्रश्नाला मागील आठ महिन्यांपासून औरंगाबादकर तोंड देत आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतरही रस्त्यांच्या कामाच्या निविदा अंतिम करण्यात आलेल्या नाहीत, महापालिकेच्या तिजोरीत तब्बल १६६ कोटींचा अधिभार येऊन ठेपला आहे. विकासकामांसाठी एक रुपयाही तिजोरीत नाही, अशा गंभीर परिस्थितीत आयुक्त डॉ. निपुण विनायक बुधवारपासून दीर्घ रजेवर जात आहेत. दहा दिवस महापालिकेचा कारभार जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

महापालिकेतील लहान-मोठा निर्णय आयुक्तांच्या संमतीनेच घ्यावा लागतो. प्रभारी आयुक्त दैनंदिन कामकाज, टपाल पाहण्याचे काम करीत असतात. धोरणात्मक कोणताही निर्णय प्रभारी आयुक्त घेत नाहीत. १७ आॅक्टोबर रोजी महापालिकेचे थोडेफार काम पाहून आयुक्त बाहेरगावी रवाना होणार आहेत. १८ रोजी दसऱ्यानिमित्त सुटीच आहे. १९ ते २९ आॅक्टोबरपर्यंत ते सुटीवर राहणार असल्याचे मनपातील सूत्रांनी सांगितले. दोन अतिरिक्त आयुक्त महापालिकेत कार्यरत असतानाही शासनाने आयुक्तांचा अतिरिक्त पदभार उदय चौैधरी यांच्याकडे सोपविला आहे. डॉ. निपुण विनायक रुजू होण्यापूर्वी चौैधरी यांच्याकडे काही दिवस अतिरिक्त कार्यभार होता. महापालिकेच्या कामकाजाचा चौैधरी यांना चांगलाच अनुभव आहे.

सर्वसाधारण सभेपूर्वी सुटीमनपा आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी ‘महापालिकेत नागरिक कमी आणि दलाल जास्त येतात,’ असे वादग्रस्त विधान केले होते. यावरून राजकीय मंडळी २० आॅक्टोबर रोजी सर्वसाधारण सभेत त्यांची कोंडी करणार होते. मनपात येणाऱ्या दलालांची नावेच जाहीर करा, असा आग्रह आयुक्तांकडे धरण्यात येणार होता. त्यापूर्वीच आयुक्त दीर्घ सुटीवर निघून गेले आहेत.

शेड उभारणीचा श्रीगणेशा नाहीचिकलठाणा आणि पडेगाव येथे प्रत्येकी १५० मेट्रिक टन क्षमतेचे दोन प्रकल्प मनपाला उभे करायचे आहेत. शहरात जमा होणाऱ्या ८० टक्के कचऱ्यावर या दोन केंद्रांवर प्रक्रिया करण्यात येणार आहे. या कामांच्या वर्कआॅर्डरही दोन महिन्यांपूर्वी झाल्या आहेत. प्रत्यक्षात घटनास्थळी शेड उभारणीचा श्रीगणेशा झालेला नाही. हे दोन मोठे प्रकल्प उभारल्याशिवाय शहरातील कचराकोंडी संपणार नाही, हे विशेष.

रस्त्यांचा प्रश्न प्रलंबितमागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२५ कोटींच्या रस्त्यांची प्रक्रिया लवकर पूर्ण करा, असे आदेश दिले होते. कंत्राटदारांनीही अंदाजपत्रकीय दराने काम करण्याची हमी दिली आहे. मनपा प्रशासनाकडून प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर करण्यात आला नाही.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादState Governmentराज्य सरकार