शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

औरंगाबादला वादळी वाऱ्याचा तडाखा; भिंत पडून दोन ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 12:48 IST

अनेक भागात घरांचे पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या, तर विविध भागांत शेकडो झाडे उन्मळून पडली. 

ठळक मुद्देवाऱ्याच्या वेगामुळे ठिकठिकाणी झाडे मुळापासून उन्मळून पडली.वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने सायंकाळी अर्ध्या वाळूज महानगराला चांगलेच झोडपले.

औरंगाबाद : औरंगाबाद शहराला सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. तब्बल ताशी ५६ किलोमीटर वेगाने वारे वाहिले. या वाऱ्यामुळे भिंत पडून एक महिला ठार झाली. तर दुसऱ्या एका घटनेत भिंत कोसळून आलमगीर कॉलनीतील अबुबकर  शकील मोहंमदी (३) या बालकाचा मृत्यू झाला. अनेक भागात घरांचे पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या, तर विविध भागांत शेकडो झाडे उन्मळून पडली. 

वाऱ्याच्या वेगामुळे ठिकठिकाणी झाडे मुळापासून उन्मळून पडली. एन-६ परिसरातील एका घरावर झाड पडल्याची घटना घडली. यावेळी झाड पडल्याने दुचाकीचेही नुकसान झाले. चेतक घोडा चौक परिसरात झाडाची फांदी पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. वादळी वाऱ्यानंतर पावसाला सुरुवात झाली मात्र, कुठे पावसाचा जोर कमी होता, तर कुठे अधिक. अवघ्या काही मिनिटांत पावसाचा जोर कमी झाला. सिडको, हडको भागात काही ठिकाणी गारा पडल्या. चिकलठाणा वेधशाळेत अवघ्या ०.२ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. तर ५६ कि.मी. प्रतितास इतका वाऱ्याचा वेग होता. ग्र्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस कॉलनी आणि परिसरातील सुमारे शंभर झाडे सोमवारी सायंकाळी वादळी पावसात जमीनदोस्त झाली.

वाळूज महानगराला झोडपलेवादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने सायंकाळी अर्ध्या वाळूज महानगराला चांगलेच झोडपले. सुमारे पाऊणतास झालेल्या पावसामुळे कामगार व व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. 

खामखेड्यात वीज पडून महिला ठारऔरंगाबाद तालुक्यातील खामखेडा येथील शेतात वीज पडून  गंगूबाई चतुर भगुरे (६५, रा. फुलंब्री) ही महिला ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजता घडली. या घटनेत रेणुका ज्ञानेश्वर बंगारे (२४, रा. खामखेडा, ता.औरंगाबाद)ही महिला जखमी झाली असून, घटनेची फुलंब्री पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. फुलंब्री येथील गंगाबाई या आपल्या मुलीला भेटण्यासाठी तीन दिवसांपूर्वी खामखेडा येथे आल्या होत्या. सोमवारी  खामखेडा शिवारातील गट क्रमांक १२३ मध्ये वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला. याचवेळी महिला आडोशाला जात असताना वीज पडून गंगूबाई  आणि रेणुका ज्ञानेश्वर बंगारे या गंभीर जखमी झाल्या.नातेवाईकांनी त्यांना तात्काळ  फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, गंगुबार्इंना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर रेणुका बंगारे यांना गंभीर इजा झाली असून, त्यांना उपचारासाठी औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल केले आहे.या घटनेची फुलंब्री पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू