शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

औरंगाबादला वादळी वाऱ्याचा तडाखा; भिंत पडून दोन ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 12:48 IST

अनेक भागात घरांचे पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या, तर विविध भागांत शेकडो झाडे उन्मळून पडली. 

ठळक मुद्देवाऱ्याच्या वेगामुळे ठिकठिकाणी झाडे मुळापासून उन्मळून पडली.वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने सायंकाळी अर्ध्या वाळूज महानगराला चांगलेच झोडपले.

औरंगाबाद : औरंगाबाद शहराला सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. तब्बल ताशी ५६ किलोमीटर वेगाने वारे वाहिले. या वाऱ्यामुळे भिंत पडून एक महिला ठार झाली. तर दुसऱ्या एका घटनेत भिंत कोसळून आलमगीर कॉलनीतील अबुबकर  शकील मोहंमदी (३) या बालकाचा मृत्यू झाला. अनेक भागात घरांचे पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या, तर विविध भागांत शेकडो झाडे उन्मळून पडली. 

वाऱ्याच्या वेगामुळे ठिकठिकाणी झाडे मुळापासून उन्मळून पडली. एन-६ परिसरातील एका घरावर झाड पडल्याची घटना घडली. यावेळी झाड पडल्याने दुचाकीचेही नुकसान झाले. चेतक घोडा चौक परिसरात झाडाची फांदी पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. वादळी वाऱ्यानंतर पावसाला सुरुवात झाली मात्र, कुठे पावसाचा जोर कमी होता, तर कुठे अधिक. अवघ्या काही मिनिटांत पावसाचा जोर कमी झाला. सिडको, हडको भागात काही ठिकाणी गारा पडल्या. चिकलठाणा वेधशाळेत अवघ्या ०.२ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. तर ५६ कि.मी. प्रतितास इतका वाऱ्याचा वेग होता. ग्र्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस कॉलनी आणि परिसरातील सुमारे शंभर झाडे सोमवारी सायंकाळी वादळी पावसात जमीनदोस्त झाली.

वाळूज महानगराला झोडपलेवादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने सायंकाळी अर्ध्या वाळूज महानगराला चांगलेच झोडपले. सुमारे पाऊणतास झालेल्या पावसामुळे कामगार व व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. 

खामखेड्यात वीज पडून महिला ठारऔरंगाबाद तालुक्यातील खामखेडा येथील शेतात वीज पडून  गंगूबाई चतुर भगुरे (६५, रा. फुलंब्री) ही महिला ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजता घडली. या घटनेत रेणुका ज्ञानेश्वर बंगारे (२४, रा. खामखेडा, ता.औरंगाबाद)ही महिला जखमी झाली असून, घटनेची फुलंब्री पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. फुलंब्री येथील गंगाबाई या आपल्या मुलीला भेटण्यासाठी तीन दिवसांपूर्वी खामखेडा येथे आल्या होत्या. सोमवारी  खामखेडा शिवारातील गट क्रमांक १२३ मध्ये वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला. याचवेळी महिला आडोशाला जात असताना वीज पडून गंगूबाई  आणि रेणुका ज्ञानेश्वर बंगारे या गंभीर जखमी झाल्या.नातेवाईकांनी त्यांना तात्काळ  फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, गंगुबार्इंना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर रेणुका बंगारे यांना गंभीर इजा झाली असून, त्यांना उपचारासाठी औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल केले आहे.या घटनेची फुलंब्री पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू