शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

भगवान महावीर जयंतीनिमित्त औरंगाबादेत कचरा, प्लास्टिकमुक्त रथयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:13 IST

सकल जैन समाजातर्फे महावीर जयंतीनिमित्त गुरुवारी (दि.२९) रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे़ गुढीपाडव्यापासून राज्य सरकारने सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू वापराला बंदी घातली आहे़ हे लक्षात घेऊन यंदा कचरा आणि प्लास्टिकमुक्त रथयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत भगवान महावीर जन्मोत्सव समितीतर्फे देण्यात आली.

औरंगाबाद : सकल जैन समाजातर्फे महावीर जयंतीनिमित्त गुरुवारी (दि.२९) रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे़ गुढीपाडव्यापासून राज्य सरकारने सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू वापराला बंदी घातली आहे़ हे लक्षात घेऊन यंदा कचरा आणि प्लास्टिकमुक्त रथयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत भगवान महावीर जन्मोत्सव समितीतर्फे देण्यात आली.

सकल जैन समाजाचे कार्याध्यक्ष आ़ सुभाष झांबड, महासचिव महावीर पाटणी, भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष विनोद बोकडिया, कार्याध्यक्ष मुकेश साहुजी, भारती बागरेचा, रमेश घोडके, मिठालाल कांकरिया, भावना सेठिया, अनिल संचेती, करुणा साहुजी, राजेश मुथा, नीलेश पहाडे, जी. एम. बोथरा, डॉ. प्रकाश झांबड आदी उपस्थित होते.

विनोद बोकडिया म्हणाले, महावीर जयंतीच्या दिवशी राजाबाजारातील जैन मंदिरापासून वाहन रॅली काढण्यात येईल. सकाळी ७ वाजता महावीर स्तंभ येथे सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा आणि कार्याध्यक्ष आ. सुभाष झांबड यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण होईल. त्यानंतर उत्तमचंद ठोळे जैन छात्रालय, गुरूगणेशनगर येथे धर्मध्वजारोहण होईल. सकाळी ८ वाजता पैठणगेट ते औरंगपुरा येथील सरस्वती भुवन महाविद्यालय प्रांगणापर्यंत रथयात्रा काढण्यात येईल. कचरा आणि प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्याच्या उद्देशाने रथयात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. पाणीवाटप, शीतपेय, आइस्क्रीम आदींमुळे कचरा निर्माण होतो. तो टाळण्यासाठी हे खाद्यपदार्थ बंद करून स्टीलच्या ग्लासमध्ये पाणी देण्यात येणार आहे.

रथयात्रेच्या सांगतानंतर सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत महाविद्यालयाच्या प्रांगणात महाप्रसाद होईल. यावर्षी स्व. डॉ. चंपालालजी देसरडा यांच्या स्मृतीत प्रभादेवी देसरडा, शेखर चंपालाल देसरडा आणि देसरडा कुटुंबीय महाप्रसादाचे लाभार्थी आहेत. सकाळी १० ते २ दरम्यान रक्तदान शिबीर, थालेसेमिया चेकअप शिबीर आणि रोपट्यांचे वाटप होईल. पीरबाजार चौक (उस्मानपुरा), भगवानबाबा आश्रम, मातोश्री वृद्धाश्रम आणि हेडगेवार रुग्णालयात अन्नदान करण्यात येईल.

१०८ कारची रॅलीज्युनिअर सिडको रॉयल जैन ग्रुपतर्फे यावर्षी १०८ कारच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापन, क्लीन सिटी-ग्रीन सिटी, साक्षरता, वाहतूक व्यवस्थापन, वीज वाचवा, पाणी वाचवा, बेटी बचावो-बेटी पढाओ, जैन धर्माची शिकवण, जैन साधू-संतांची शिकवण आणि भगवान महावीर यांचे सामाजिक, धार्मिक संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविला जाणार आहे. ही वाहन रॅली सकाळी ६.०० वा. सिडको एन-३ येथील शंखेश्वर पार्श्वनाथ जैन मंदिरापासून निघेल आणि भगवान महावीर स्तंभ येथे समारोप होईल.

‘महावीर रसोई घर’गाडीचे लोकार्पणजयंतीनिमित्त महावीर रसोई घरगाडीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. हे रसोई घर ३६५ दिवस घाटी रुग्णालयात रुग्ण आणि गरजूंसाठी अन्नदान करणार आहे. गरजूंसाठी संपूर्ण जेवण मोफत देण्याची व्यवस्था केली आहे.

टॅग्स :Bhagavan Mahavir Janmotasavभगवान महावीर जन्मोत्सवAurangabadऔरंगाबादRajendra Dardaराजेंद्र दर्डाPlastic banप्लॅस्टिक बंदीGarbage Disposal Issueकचरा प्रश्न