शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भगवान महावीर जयंतीनिमित्त औरंगाबादेत कचरा, प्लास्टिकमुक्त रथयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:13 IST

सकल जैन समाजातर्फे महावीर जयंतीनिमित्त गुरुवारी (दि.२९) रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे़ गुढीपाडव्यापासून राज्य सरकारने सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू वापराला बंदी घातली आहे़ हे लक्षात घेऊन यंदा कचरा आणि प्लास्टिकमुक्त रथयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत भगवान महावीर जन्मोत्सव समितीतर्फे देण्यात आली.

औरंगाबाद : सकल जैन समाजातर्फे महावीर जयंतीनिमित्त गुरुवारी (दि.२९) रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे़ गुढीपाडव्यापासून राज्य सरकारने सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू वापराला बंदी घातली आहे़ हे लक्षात घेऊन यंदा कचरा आणि प्लास्टिकमुक्त रथयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत भगवान महावीर जन्मोत्सव समितीतर्फे देण्यात आली.

सकल जैन समाजाचे कार्याध्यक्ष आ़ सुभाष झांबड, महासचिव महावीर पाटणी, भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष विनोद बोकडिया, कार्याध्यक्ष मुकेश साहुजी, भारती बागरेचा, रमेश घोडके, मिठालाल कांकरिया, भावना सेठिया, अनिल संचेती, करुणा साहुजी, राजेश मुथा, नीलेश पहाडे, जी. एम. बोथरा, डॉ. प्रकाश झांबड आदी उपस्थित होते.

विनोद बोकडिया म्हणाले, महावीर जयंतीच्या दिवशी राजाबाजारातील जैन मंदिरापासून वाहन रॅली काढण्यात येईल. सकाळी ७ वाजता महावीर स्तंभ येथे सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा आणि कार्याध्यक्ष आ. सुभाष झांबड यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण होईल. त्यानंतर उत्तमचंद ठोळे जैन छात्रालय, गुरूगणेशनगर येथे धर्मध्वजारोहण होईल. सकाळी ८ वाजता पैठणगेट ते औरंगपुरा येथील सरस्वती भुवन महाविद्यालय प्रांगणापर्यंत रथयात्रा काढण्यात येईल. कचरा आणि प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्याच्या उद्देशाने रथयात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. पाणीवाटप, शीतपेय, आइस्क्रीम आदींमुळे कचरा निर्माण होतो. तो टाळण्यासाठी हे खाद्यपदार्थ बंद करून स्टीलच्या ग्लासमध्ये पाणी देण्यात येणार आहे.

रथयात्रेच्या सांगतानंतर सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत महाविद्यालयाच्या प्रांगणात महाप्रसाद होईल. यावर्षी स्व. डॉ. चंपालालजी देसरडा यांच्या स्मृतीत प्रभादेवी देसरडा, शेखर चंपालाल देसरडा आणि देसरडा कुटुंबीय महाप्रसादाचे लाभार्थी आहेत. सकाळी १० ते २ दरम्यान रक्तदान शिबीर, थालेसेमिया चेकअप शिबीर आणि रोपट्यांचे वाटप होईल. पीरबाजार चौक (उस्मानपुरा), भगवानबाबा आश्रम, मातोश्री वृद्धाश्रम आणि हेडगेवार रुग्णालयात अन्नदान करण्यात येईल.

१०८ कारची रॅलीज्युनिअर सिडको रॉयल जैन ग्रुपतर्फे यावर्षी १०८ कारच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापन, क्लीन सिटी-ग्रीन सिटी, साक्षरता, वाहतूक व्यवस्थापन, वीज वाचवा, पाणी वाचवा, बेटी बचावो-बेटी पढाओ, जैन धर्माची शिकवण, जैन साधू-संतांची शिकवण आणि भगवान महावीर यांचे सामाजिक, धार्मिक संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविला जाणार आहे. ही वाहन रॅली सकाळी ६.०० वा. सिडको एन-३ येथील शंखेश्वर पार्श्वनाथ जैन मंदिरापासून निघेल आणि भगवान महावीर स्तंभ येथे समारोप होईल.

‘महावीर रसोई घर’गाडीचे लोकार्पणजयंतीनिमित्त महावीर रसोई घरगाडीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. हे रसोई घर ३६५ दिवस घाटी रुग्णालयात रुग्ण आणि गरजूंसाठी अन्नदान करणार आहे. गरजूंसाठी संपूर्ण जेवण मोफत देण्याची व्यवस्था केली आहे.

टॅग्स :Bhagavan Mahavir Janmotasavभगवान महावीर जन्मोत्सवAurangabadऔरंगाबादRajendra Dardaराजेंद्र दर्डाPlastic banप्लॅस्टिक बंदीGarbage Disposal Issueकचरा प्रश्न