शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

औरंगाबादचा कचरा महामार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 1:23 AM

औरंगाबाद शहरातील कचरा आता महानगरपालिकेने ग्रामीण भागात टाकायला सुरुवात केल्याने ग्रामीण भागात डोकेदुखी वाढली आहे. गावकऱ्यांनी कच-यास कडाडून विरोध करून बंड पुकारले आहे. रविवारी पहाटे औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळे गावाजवळ मनपाने कचरा आणून टाकल्याचे दिसताच गावकरी संतप्त झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कपाचोड : औरंगाबाद शहरातील कचरा आता महानगरपालिकेने ग्रामीण भागात टाकायला सुरुवात केल्याने ग्रामीण भागात डोकेदुखी वाढली आहे.गावकऱ्यांनी कच-यास कडाडून विरोध करून बंड पुकारले आहे. रविवारी पहाटे औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळे गावाजवळ मनपाने कचरा आणून टाकल्याचे दिसताच गावकरी संतप्त झाले.सकाळी सरपंच अंकुशराव जावळे मॉर्निंग वॉकसाठी जात असताना त्यांना रोडलगतच कचरा पडलेला दिसला. या कच-याचा घाण वास येत होता. जावळे यांनी तात्काळ गावात येऊन सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावक-यांना याबाबत माहिती दिली व काही क्षणांतच गावकरी संतप्त होऊन सरपंच जावळे यांच्या घरी जमा झाले व याची माहिती पाचोड पोलीस, पैठणचे आमदार संदीपान भुमरे, जि.प. सभापती विलास भुमरे व पैठण तालुका बाजार समितीचे सभापती राजू भुमरे यांना दिली.त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.उपसरपंच शिवाजी तागड, बाळासाहेब जावळे, अण्णा पाटील, लहू जावळे, सुदर्शन जावळे, सतीश जावळे, प्रकाश जावळे, रामनाथ जावळे, रामनाथ भावले, दादा चिंतामणी, संदीप बुरकूल, नवनाथ कळमकर आदींनी घटनास्थळावर जाऊन संताप व्यक्त केला.