शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

बारावीच्या निकालात औरंगाबाद विभागाचा सहा वर्षातील सर्वात कमी निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 15:01 IST

बारावीचा निकालात संपूर्ण राज्यात औरंगाबाद विभाग चौथ्या स्थानी

ठळक मुद्देमुलींचे वर्चस्व कायमविभागात औरंगाबाद जिल्ह्याची बाजी

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रवारी-मार्च महिन्यात घेतलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२८) दुपारी १ वाजता आॅनलाईन जाहीर करण्यात आला. या निकालात औरंगाबाद विभागाने ८७.२९ टक्के निकाला नोंद करत राज्यात चौथे स्थान पटकावले. मात्र मागील २०१४ पासून सर्वात निच्चाकी निकालाची नोंदही यावर्षी झाली आहे.

बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान विभागातील ३८८ केंद्रांवर घेण्यात आल्या होत्या. यात १२४० कनिष्ठ महाविद्यालयातील १ लाख ६२ हजार ३४४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी  विभागीय मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी उपस्थिती होती. राज्याचा निकाल ८५.८८ टक्के एवढा लागला आहे. त्यातुलनेत औरंगाबाद विभागाने ८७.२९ टक्के एवढा निकाल नोंदवला. मागील सहा वर्षातील हा सर्वात कमी निकाल आहे. २०१४ साली औरंगाबाद विभागाचा निकाल ९०.९८ टक्के एवढा लागला होता. त्यानंर २०१५ मध्ये ९१.७७, २०१६ मध्ये ८७.८०, २०१७ मध्ये ८९.८३, २०१८ मध्ये ८८.७४ आणि यावर्षी सर्वात कमी निकाल हा ८७.२९ इतकाच लागला आहे. त्यापुर्वी २०१२ मध्ये ६७.१० टक्के आणि २०१३ मध्ये ८५.२६ टक्के निकालाची नोंद झाली होती.

बारावीचा निकाल जाहीर : उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये यंदाही मुलींची बाजी, तर विभागवार निकालामध्ये कोकण अव्वल

औरंगाबाद विभागात औरंगाबाद जिल्ह्याचा सर्वात जास्त ८९.२२ टक्के निकाल लागला आहे. तर विभागात सर्वात कमी निकाल ८०.७७ टक्के हिगोंली जिल्ह्याचा लागला आहे. या निकालात बीड जिल्हा ८८.२७ टक्के, जालना ८७.१२ टक्के आणि परभणी जिल्ह्याचा निकाल ८४.५१ टक्के एवढा लागला आहे. मागील सहा वर्षात सर्वात कमी निकाल कॉपी मुक्त अभियान राबविल्यामुळे लागला असल्याचा दावा विभागीय मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी पत्रकार परिषदेत केला. यावर्षीच्या परीक्षेत विभागातंर्गत सर्वच जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आल्याचे हे परिणाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विभागात मुलींची बाजी कायमबारावीच्या परीक्षेत विभागामध्ये मुलींनी यावर्षीही बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९०.८६ असून, मुलांची ८५.०९ एवढी आहे. यात १ लाख ५६२ मुलांपैकी ८५ हजार ४१० मुले उत्तीर्ण झाली. मुलींच्या ६२ हजार ८४ पैकी ५६ हजार २९५ उत्तीर्ण झाल्या आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे मुलींनीच टक्केवारीत बाजी मारली आहे.

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबाद