शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

औरंगाबादच्या कनेक्टिव्हिटीत होणार वाढ; ५ फेब्रुवारीपासून होणार मुंबईसाठी ‘इंडिगो’चे ‘टेकऑफ ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 6:10 PM

मुंबईसह दिल्ली आणि हैदराबादसाठी घेणार ‘उड्डाण’

ठळक मुद्देअनेक महिन्यांची मागणी पूर्णत्वास

औरंगाबाद : औरंगाबादहून अखेर बहुप्रतीक्षित ‘इंडिगो’ची ५ फेब्रुवारीपासून विमानसेवा सुरू होत आहे. मुंबईसाठी सकाळच्या वेळेत या कंपनीकडून विमानसेवा सुरू केली जात आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासूनची मागणी पूर्णत्वास गेली आहे. मुंबईसह दिल्ली आणि हैदराबादसाठीही इंडिगोकडून विमानसेवा सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे औरंगाबादच्या हवाई कनेक्टिव्हिटीत वाढ होणार आहे. 

एअर इंडिया, ट्रूजेट आणि स्पाईस जेटपाठोपाठ ‘इंडिगो’कडूनही औरंगाबादहून नवीन विमान सुरू करण्याचा निर्णय घेतला. १९ जुलै रोजी इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी चिकलठाणा विमानतळावर सोयी-सुविधांचीही पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान सोयी-सुविधांविषयी अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विमानतळावर आवश्यक कस्टमर सर्व्हिस, सुरक्षा, रॅम्प पोझिशन यासह ग्राऊंड स्टाफ आदी कर्मचाऱ्यांची निवड प्रक्रियाही पार पडली.

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘इंडिगो’च्या कार्यालयासाठी प्राधिकरणाने जागा दिली असून, तेथे कार्यालय उभारणीचे क ाम हाती घेण्यात आले. त्यामुळे शहरातून ‘इंडिगो’च्या ‘टेकआॅफ ’ होण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले होते; परंतु गेल्या ५ महिन्यांपासून या कंपनीची विमानसेवा कधी आणि कोणत्या शहरासाठी सुरू केली जाणार, याकडे प्रवाशांचे डोळे लागले होते. अखेर ५ फेब्रुवारीपासून ही कंपनी औरंगाबादहून झेपावणार आहे. औरंगाबादहून नव्या विमानसेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्या तयार आहेत. मात्र, मुंबई विमानतळाकडून स्लॉट (विमान उड्डाणासाठी वेळ) मिळत नसल्याची बाब समोर आली होती. तेव्हा उद्योजक सुनीत कोठारी यांनी ‘एमआयएएल’चे सीईओ राजीव जैन, स्लॉट आणि डाटा मॅनेजमेंटचे सहायक व्यवस्थापक तन्वीर मौलवी यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या बैठकीत मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानसेवेसाठी विमान कंपन्यांना स्लॉट देण्याची मागणी करण्यात आली. तेव्हा या मार्गासाठी स्लॉट देण्यास कोणतीही अडचण नसल्याचे सांगण्यात आले. या मार्गावरील विमानसेवेसाठी अर्ज येताच त्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, असे राजीव जैन यांनी सांगितले होते. उद्योजक सुनीत कोठारी, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष जसवंत सिंह राजपूत यांच्यासह लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे मुंबई विमानसेवेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

१८० आसनी विमानइंडिगोकडून तिन्ही मार्गांवर १८० आसनी विमानाद्वारे विमानसेवा सुरू केली जाणार आहे. चिकलठाणा विमानतळावरून जेट एअरवेजची सकाळी आणि सायंकाळी मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानसेवा सुरू होती. मात्र, सहा महिन्यांपूर्वी ही विमानसेवा बंद झाली. त्यानंतर मुंबईसाठी केवळ एकमेव एअर इंडियाच्या विमानाचा आधार होता. त्यानंतर एअर इंडियाने गत महिन्यात १६ आॅक्टोबरपासून आठवड्यातील तीन दिवसांसाठी मुंबई-औरंगाबाद-उदयपूर विमानसेवा सुरूकेली. त्यामुळे मुंबईची कनेक्टिव्हिटी आठवड्यात तीन दिवसांसाठी वाढली आहे; परंतु मुंबईसाठी सकाळच्या वेळेत किमान एक विमानसेवेची मागणी होत होती. अखेर इंडिगोच्या माध्यमातून ही मागणी पूर्णत्वास जात आहे.

असे आहे इंडिगोचे वेळापत्रकमुंबई-औरंगाबाद मुंबईहून सकाळी ६.२५ वाजता उड्डाण आणि ७.२५ वाजता औरंगाबादेत आगमन.

औरंगाबाद-मुंबईऔरंगाबादहून सकाळी ८.२० वाजता उड्डाण आणि मुंबईत ९.१५ वाजता दाखल.

दिल्ली-औरंगाबाददिल्लीहून दुपारी २.०५ वाजता उड्डाण आणि दुपारी ४ वाजता औरंगाबादेत आगमन.

औरंगाबाद-दिल्लीऔरंगाबादहून सायंकाळी ४.५५ वाजता उड्डाण आणि दिल्लीत सायंकाळी ६.४० वाजता दाखल.

हैदराबाद-औरंगाबाद हैदराबादहून सकाळी ११ वाजता उड्डाण आणि दुपारी १२.१० वाजता औरंगाबादेत आगमन.

औरंगाबाद-हैदराबादऔरंगाबादहून दुपारी १२.४० वाजता उड्डाण आणि हैदराबादेत दुपारी १.४५ वाजता दाखल.

सर्वांच्या प्रयत्नांना यशइंडिगोकडून विमानसेवा सुरू केली जात आहे. या कंपनीकडे ६ महिन्यांपासून पाठपुरावा केला जात होता. अखेर त्याला यश मिळाले. हे सगळ्यांचे यश आहे. आता औरंगाबादहून पुणे, नागपूरसह जयपूरसाठी विमानसेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.     - सुनीत कोठारी, उद्योजक

आंतरराष्ट्रीय सेवेसाठी प्रयत्नइंडिगोकडून मुंबई, दिल्ली आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू केली जात आहे. त्यासाठी बुकिंगदेखील सुरू झाली आहे. यामुळे देशांतर्गत विमानसेवेत वाढ होणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठीही प्रयत्न केला जात आहे.- डी. जी. साळवे, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटन