शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

CM Uddhav Thackeray: नाव बदलायला आता बदलू शकतो, पण...; औरंगाबाद नामांतरावरून उद्धव ठाकरे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 21:00 IST

ढेकणं चिरडण्यासाठी तोफेची गरज लागत नाही. त्यासाठी आपली शक्ती वाया घालवायची नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

औरंगाबाद - पाणीप्रश्नाला मी सामोर जातोय, कुठेही फसवेगिरी नाही. मी प्रामाणिक आहे. पूर्वी दहा दिवसांपूर्वी पाणी यायचं आता हे दिवस कमी कमी होत चालले आहेत. सभेला येताना प्रशासकीय अधिकारी भेटले. झारीतले शुक्राचार्य त्यांना बाहेर फेका आणि माझ्या संभाजीनगरच्या लोकांना पाणी द्या असं अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले. पाणी योजनेसाठी मी पैसे देण्याची व्यवस्था राज्य सरकारच्या वतीने देणार आहे. योजनेसाठी पैसे कमी पडून देणार नाही. परंतु योजनेला विलंब झाला तर दया, माया न दाखवता कंत्राटदाराला तुरुंगात टाका असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, माझी शस्त्रक्रिया झाल्यानंतर जवळपास सहा महिन्यांनी मुंबईच्या बाहेर पाऊल टाकलं आहे. पूर्वीप्रमाणे आजही मैदानाचा कोपरा भरलेला आहे. तोच जल्लोष, उत्साह आहे. जागा नाहीत, मैदान पुरत नाही इतकी आपली ताकद वाढत चालली आहे. तुमच्या रुपाने आई तुळजाभवानीचं दर्शन घेतोय. देवसुद्धा आपली सभा कशी बघत असेल असं दृश्य मी पाहिले. ढेकणं चिरडण्यासाठी तोफेची गरज लागत नाही. त्यासाठी आपली शक्ती वाया घालवायची नाही. हिंदुत्व हा आपला श्वास आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच संभाजीनगरच्या पाण्यासाठी नव्हे तर सत्ता गेल्यामुळे शहरात आक्रोश काढण्यात आला. तुमची सत्ता असताना पाणी योजनेला का निधी दिला नाही. खोटे बोलणं हे आमच्या हिंदुत्वात नाही. रस्त्यासाठी निधी दिला आहे. ३-४ वर्षापूर्वी संभाजीनगरचे रस्ते कसे होते आणि आज पाहा. रस्ते सुधारत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झाले. पर्यटनासाठी जंगलसफारी होतेय. मेट्रोसाठी प्लॅन बनवण्याची सुरुवात झाली आहे. विद्रुपीकरण करणारी मेट्रो नसेल. विध्वंसक विकासकामे आमच्याकडून होणार नाही. शहराची शान वाढवणारी विकासकामे होतील हे वचन मी तुम्हाला देतो असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

संभाजीनगर कधी करणार?संभाजीनगर हे माझ्या वडिलांनी दिलेले वचन आहे. ते विसरलो नाही. ते केल्याशिवाय राहणार नाही. दीड वर्षापूर्वी विधानसभेत ठराव मंजूर झाला आहे. कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे. विमानतळाचा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगर करावं पुढे पाठवला आहे. छत्रपती संभाजीनगर करण्याआधी शहर विकसित करायचं आहे. नाव बदलायला आता बदलू शकतो. रस्ते, पाणी नसतील तर नाव बदलून काय अर्थ? दिल्ली दरबारी विमानतळाचा नाव बदलण्याचा प्रस्ताव दिलाय तो केंद्रातून मंजूर करून आणा आम्ही तुमचा सत्कार करतो असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी भाजपाला दिला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा