शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

मुंंबई ते नागपूर सव्वातीन तासात, हायस्पीड रेल्वेच्या केंद्रस्थानी औरंगाबाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 12:53 IST

Mumbai-Nagpur High Speed Railway: औरंगाबाद जिल्ह्यातून जाणार १११ किलोमीटर ट्रॅक : पावणेदोन तासांत मुंबईला जाणे शक्य

औरंगाबाद : मुंबई - नागपूर हायस्पीड रेल्वेने (एमएनएचएसआर) औरंगाबादहून ( Mumbai-Nagpur High Speed Railway ) केवळ पावणेदोन तासांत मुंबईला जाणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया, पर्यावरण आणि सामाजिक परिणामाच्या मूल्यांकनासह डीपीआरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळ मजल्यावर रिजनल कमांड सेंटर (प्रादेशिक नियंत्रण केंद्र) सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी स्वतंत्र दालन देण्यात आले असून, अद्याप अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही.

जिल्ह्यात हायस्पीड रेल्वेचा १११ किलोमीटर ट्रॅक निर्माण करण्यात येणार असून, समृद्धी महामार्गालगत समांतर त्या रेल्वे ट्रॅकची बांधणी केली जाणार आहे. नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडचा हा प्रकल्प प्रस्तावित असून, कमांड कंट्रोल सेंटर सुरू होणार असल्याने लवकरच डीपीआरचे (सविस्तर प्रकल्प अहवाल) काम हाती घेण्यात येणार आहे. डीपीआरनंतर प्रकल्पाचा एकूण खर्च, बांधणीचा कालावधी, एकूण रहदारी याबाबी स्पष्ट होतील.

१४ ठिकाणी रेल्वे स्टेशन आणि फायद्याचे दावेअजनी, खापरी, वर्धा, पुलगाव, कारंजालाड, मालेगाव जहाँगीर, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, घोटी बुद्रूक, शहापूर, ठाणे या १४ ठिकाणी एचएसआर स्टेशन बांधणे प्रस्तावित आहे. मुंंबई ते नागपूर सव्वातीन तासात जाता येणार, टाऊनशिप वाढीसह रोजगारनिर्मिती होईल. शहरी रस्ते दुरुस्तीचा खर्च कमी, हवेची गुणवत्ता सुधारेल, शहरातील अंतर्गत वाहतुकीचे प्रमाण कमी होईल. विद्यमान दळणवळण सुविधा सुटसुटीत होतील. असा दावा आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील किती जमीन जाणार३ तालुक्यांतील ४९ गावांलगत १११ कि.मी. अंतरातून हायस्पीड रेल्वे जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातून १६७.९६ हेक्टर जमीन लागेल. त्यात ७३.७३ हेक्टर जमीन खासगी, तर ९४.२२ हेक्टर जमीन सरकारी असेल. सरकारी २०१, तर ४१० खासगी भूखंड संपादित करावे लागणार आहेत. औरंगाबाद तालुक्यातील २३ गावांतील ६१.९४ हेक्टर, गंगापूरमधील ११ गावांतील ३७.१०, तर वैजापूरमधील १५ गावांतील ६७.९० हेक्टर भूसंपादन केले जाणार आहे.

हायस्पीड रेल्वे प्रकल्पात नेमके काय असेल : एकूण लांबी - ७४९ किलोमीटरकिती स्थानक असणार - १४किती जिल्ह्यांना जोडणार-  १०भूसंपादन किती जमिनीचे - १२४५.६१ हेक्टररेल्वेचा ताशी वेग किती - ३३० ते ३५० कि.मी.प्रवासी वाहतूक क्षमता - ७५०एकूण किती बोगदे असणार - १५ (२५.२३ कि.मी. लांबी)समृद्धी महामार्गालगत - १७.५ मीटर रुंदीचा मार्ग

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादnagpurनागपूरrailwayरेल्वे