शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
5
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
6
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
7
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
8
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
9
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
10
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
11
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
12
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
13
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
14
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
15
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
16
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
17
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
18
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
19
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
20
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला

मुंंबई ते नागपूर सव्वातीन तासात, हायस्पीड रेल्वेच्या केंद्रस्थानी औरंगाबाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 12:53 IST

Mumbai-Nagpur High Speed Railway: औरंगाबाद जिल्ह्यातून जाणार १११ किलोमीटर ट्रॅक : पावणेदोन तासांत मुंबईला जाणे शक्य

औरंगाबाद : मुंबई - नागपूर हायस्पीड रेल्वेने (एमएनएचएसआर) औरंगाबादहून ( Mumbai-Nagpur High Speed Railway ) केवळ पावणेदोन तासांत मुंबईला जाणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया, पर्यावरण आणि सामाजिक परिणामाच्या मूल्यांकनासह डीपीआरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळ मजल्यावर रिजनल कमांड सेंटर (प्रादेशिक नियंत्रण केंद्र) सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी स्वतंत्र दालन देण्यात आले असून, अद्याप अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही.

जिल्ह्यात हायस्पीड रेल्वेचा १११ किलोमीटर ट्रॅक निर्माण करण्यात येणार असून, समृद्धी महामार्गालगत समांतर त्या रेल्वे ट्रॅकची बांधणी केली जाणार आहे. नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडचा हा प्रकल्प प्रस्तावित असून, कमांड कंट्रोल सेंटर सुरू होणार असल्याने लवकरच डीपीआरचे (सविस्तर प्रकल्प अहवाल) काम हाती घेण्यात येणार आहे. डीपीआरनंतर प्रकल्पाचा एकूण खर्च, बांधणीचा कालावधी, एकूण रहदारी याबाबी स्पष्ट होतील.

१४ ठिकाणी रेल्वे स्टेशन आणि फायद्याचे दावेअजनी, खापरी, वर्धा, पुलगाव, कारंजालाड, मालेगाव जहाँगीर, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, घोटी बुद्रूक, शहापूर, ठाणे या १४ ठिकाणी एचएसआर स्टेशन बांधणे प्रस्तावित आहे. मुंंबई ते नागपूर सव्वातीन तासात जाता येणार, टाऊनशिप वाढीसह रोजगारनिर्मिती होईल. शहरी रस्ते दुरुस्तीचा खर्च कमी, हवेची गुणवत्ता सुधारेल, शहरातील अंतर्गत वाहतुकीचे प्रमाण कमी होईल. विद्यमान दळणवळण सुविधा सुटसुटीत होतील. असा दावा आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील किती जमीन जाणार३ तालुक्यांतील ४९ गावांलगत १११ कि.मी. अंतरातून हायस्पीड रेल्वे जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातून १६७.९६ हेक्टर जमीन लागेल. त्यात ७३.७३ हेक्टर जमीन खासगी, तर ९४.२२ हेक्टर जमीन सरकारी असेल. सरकारी २०१, तर ४१० खासगी भूखंड संपादित करावे लागणार आहेत. औरंगाबाद तालुक्यातील २३ गावांतील ६१.९४ हेक्टर, गंगापूरमधील ११ गावांतील ३७.१०, तर वैजापूरमधील १५ गावांतील ६७.९० हेक्टर भूसंपादन केले जाणार आहे.

हायस्पीड रेल्वे प्रकल्पात नेमके काय असेल : एकूण लांबी - ७४९ किलोमीटरकिती स्थानक असणार - १४किती जिल्ह्यांना जोडणार-  १०भूसंपादन किती जमिनीचे - १२४५.६१ हेक्टररेल्वेचा ताशी वेग किती - ३३० ते ३५० कि.मी.प्रवासी वाहतूक क्षमता - ७५०एकूण किती बोगदे असणार - १५ (२५.२३ कि.मी. लांबी)समृद्धी महामार्गालगत - १७.५ मीटर रुंदीचा मार्ग

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादnagpurनागपूरrailwayरेल्वे