शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

मुंंबई ते नागपूर सव्वातीन तासात, हायस्पीड रेल्वेच्या केंद्रस्थानी औरंगाबाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 12:53 IST

Mumbai-Nagpur High Speed Railway: औरंगाबाद जिल्ह्यातून जाणार १११ किलोमीटर ट्रॅक : पावणेदोन तासांत मुंबईला जाणे शक्य

औरंगाबाद : मुंबई - नागपूर हायस्पीड रेल्वेने (एमएनएचएसआर) औरंगाबादहून ( Mumbai-Nagpur High Speed Railway ) केवळ पावणेदोन तासांत मुंबईला जाणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया, पर्यावरण आणि सामाजिक परिणामाच्या मूल्यांकनासह डीपीआरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळ मजल्यावर रिजनल कमांड सेंटर (प्रादेशिक नियंत्रण केंद्र) सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी स्वतंत्र दालन देण्यात आले असून, अद्याप अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही.

जिल्ह्यात हायस्पीड रेल्वेचा १११ किलोमीटर ट्रॅक निर्माण करण्यात येणार असून, समृद्धी महामार्गालगत समांतर त्या रेल्वे ट्रॅकची बांधणी केली जाणार आहे. नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडचा हा प्रकल्प प्रस्तावित असून, कमांड कंट्रोल सेंटर सुरू होणार असल्याने लवकरच डीपीआरचे (सविस्तर प्रकल्प अहवाल) काम हाती घेण्यात येणार आहे. डीपीआरनंतर प्रकल्पाचा एकूण खर्च, बांधणीचा कालावधी, एकूण रहदारी याबाबी स्पष्ट होतील.

१४ ठिकाणी रेल्वे स्टेशन आणि फायद्याचे दावेअजनी, खापरी, वर्धा, पुलगाव, कारंजालाड, मालेगाव जहाँगीर, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, घोटी बुद्रूक, शहापूर, ठाणे या १४ ठिकाणी एचएसआर स्टेशन बांधणे प्रस्तावित आहे. मुंंबई ते नागपूर सव्वातीन तासात जाता येणार, टाऊनशिप वाढीसह रोजगारनिर्मिती होईल. शहरी रस्ते दुरुस्तीचा खर्च कमी, हवेची गुणवत्ता सुधारेल, शहरातील अंतर्गत वाहतुकीचे प्रमाण कमी होईल. विद्यमान दळणवळण सुविधा सुटसुटीत होतील. असा दावा आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील किती जमीन जाणार३ तालुक्यांतील ४९ गावांलगत १११ कि.मी. अंतरातून हायस्पीड रेल्वे जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातून १६७.९६ हेक्टर जमीन लागेल. त्यात ७३.७३ हेक्टर जमीन खासगी, तर ९४.२२ हेक्टर जमीन सरकारी असेल. सरकारी २०१, तर ४१० खासगी भूखंड संपादित करावे लागणार आहेत. औरंगाबाद तालुक्यातील २३ गावांतील ६१.९४ हेक्टर, गंगापूरमधील ११ गावांतील ३७.१०, तर वैजापूरमधील १५ गावांतील ६७.९० हेक्टर भूसंपादन केले जाणार आहे.

हायस्पीड रेल्वे प्रकल्पात नेमके काय असेल : एकूण लांबी - ७४९ किलोमीटरकिती स्थानक असणार - १४किती जिल्ह्यांना जोडणार-  १०भूसंपादन किती जमिनीचे - १२४५.६१ हेक्टररेल्वेचा ताशी वेग किती - ३३० ते ३५० कि.मी.प्रवासी वाहतूक क्षमता - ७५०एकूण किती बोगदे असणार - १५ (२५.२३ कि.मी. लांबी)समृद्धी महामार्गालगत - १७.५ मीटर रुंदीचा मार्ग

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादnagpurनागपूरrailwayरेल्वे