शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

औरंगाबाद शहराचे सार्वजनिक वाहतुकीचे कंबरडे मोडले; धावतात अवघ्या १७ सिटी बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 16:35 IST

शहरातील रस्त्यावर सध्या अवघ्या १७ शहर बस धावत आहेत. उन्हाळी सुट्यांमुळे शहर बसच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे एसटी महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद : शहरातील रस्त्यावर सध्या अवघ्या १७ शहर बस धावत आहेत. उन्हाळी सुट्यांमुळे शहर बसच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे एसटी महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.

शहर बससेवा चालविताना गेल्या पाच वर्षांत एस. टी. महामंडळाला झालेला तोटा १६ कोटींवर गेला आहे. शहर बससेवा चालविणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे शहर बससेवा चालविताना होणाऱ्या नुकसानीची भरपाई मनपाने करावी, अन्यथा शहर बससेवा बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांना कळविले होते. प्रारंभी नोव्हेंबर २०१६ मध्ये शहर बससेवेपोटी झालेल्या नुकसानीची रक्कम देण्याची मागणी मनपाकडे करण्यात आली. यानंतरही वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. परंतु महापालिकेकडून प्रतिसाद मिळाला नाही. 

या सगळ्यात शहरात अवघ्या २५ ते ३० शहर बस चालविण्यावर भर देण्यात आला. यामध्येही आता कपात करून काही शहर बस थेट शहराबाहेर चालविण्यात येत आहेत. सध्या केवळ १७ शहर बस सुरू आहेत. यास एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. त्यामुळे अनेक मार्गांवर प्रवाशांना शहर बसची नुसती प्रतीक्षा करावी लागते. यातून प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.  शहर बसच्या अपुऱ्या संख्येमुळे नाईलाजाने आर्थिक भुर्दंड सहन करून रिक्षाने प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे.  

टॅग्स :state transportएसटीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad Central Bus Standऔरंगाबाद मुख्य बसस्थानकAurangabad Cidco Bus Standऔरंगाबाद सिडको बसस्थानक