शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांच्या दुभाजकांमधील झाडे ‘जैसे थे’ ठेवण्याचे खंडपीठाचे महापालिकेला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 12:28 IST

मनपातर्फे दुभाजकांमधील झाडे तोडण्याविरुद्धच्या जनहित याचिकेत अंतरिम आदेश

छत्रपती संभाजीनगर : शहरातील रस्त्यांच्या दुभाजकांमधील झाडे तूर्तास ‘आहेत तशीच ठेवा’ असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील आणि न्या. प्रफुल्ल खुबाळकर यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेला दिला.

‘वुई फॉर एन्व्हायर्नमेंट’ संस्थेतर्फे दाखल जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने मंगळवारी वरीलप्रमाणे आदेश दिला आहे. याचिकेवर नाताळच्या सुटीनंतर पुढील सुनावणी होईल. सिमेंट रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये अनेक ठिकाणी मोठी झाडे लावतात. लहान दुभाजकांमध्ये अशी झाडे जगू शकत नाहीत. कालांतराने ही झाडे मोठी होऊन रस्त्यावरच कोसळण्याची भीती असते. त्यामुळे मनपाने दुभाजकांमध्ये मोठी झाडे लावू नयेत, असे आवाहन केले असल्याचे मनपातर्फे ॲड. अमित वैद्य यांनी सांगितले.

याचिकाकर्त्या संस्थेचे अध्यक्ष कमलकुमार पहाडे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत म्हटल्यानुसार त्यांची संस्था ९ वर्षांपासून शहरात वृक्षारोपण करीत आहे. त्यांनी आतापर्यंत शहराभोवती ४५ हजारांवर भारतीय प्रजातीची झाडे स्वखर्चाने आणि लोकसहभागातून लावली आहेत. शहरातील सुमारे ७० कि.मी. रस्त्यांच्या दुभाजकांवर दर कि.मी.ला १०० झाडे या प्रमाणात मागील नऊ वर्षांत सुमारे एक लाखापेक्षा जादा झाडे लावली आहेत. स्थानिक नागरिक पाणी टाकून या झाडांचे संगोपन करतात.

असे असताना १२ ऑक्टोबर २०२४ रोजी मनपाच्या कर्मचाऱ्यांनी हर्सूल टी पॉइंट ते आंबेडकर चौकापर्यंतची संस्थेने लावलेली सुमारे ५०० झाडे काढून टाकली. संस्थेने याबाबत १५ ऑक्टोबर २०२४ रोजी मनपाला निवेदन देऊन संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य कारवाईची विनंती केली होती. मात्र, मनपाने कुठलीही कारवाई न केल्यामुळे संस्थेने याचिका दाखल केली आहे. शहरातील रस्त्यांच्या दुभाजकावरील वृक्षतोड थांबविण्याचे निर्देश द्यावेत. तसेच रस्त्यांच्या दुभाजकावर वृक्षारोपणासाठीचे ठरावीक धोरण निश्चित करण्याचे निर्देश प्रतिवादींना द्यावेत, अशी विनंती याचिकेद्वारे करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. स्वप्निल जोशी यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. स्वप्निल पातूनकर, ॲड. महेश स्वामी आणि ॲड. चेतन चौधरी यांनी सहकार्य केले.

देशी झाडांमुळे अनेक लाभमोठ्या देशी झाडांमुळे तापमान नियंत्रित होते, प्रदूषण कमी होते, शहराच्या सौंदर्यात भर पडून पर्यावरणाचा समतोल राखला जातो, आदी असंख्य लाभ होतात, असे संस्थेचे म्हणणे आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMuncipal Corporationनगर पालिकाAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ