शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

औरंगाबाद कृषी विभागात हरभर्‍याचे क्षेत्र वाढले मात्र दर गडगडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 17:34 IST

औरंगाबाद विभागात औरंगाबादसह जालना व बीड जिल्ह्याचा समावेश आहे. येथे ६ लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ६ लाख ३० हजार ९२८ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात ७६.६७ टक्के, जालन्यात ११०.८० टक्के तर बीड जिल्ह्यात १००.२८ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.

ठळक मुद्दे ३० टक्के आयात शुल्क वाढूनही मंदीचबळीराजाच्या अडचणीत आणखी भर 

औरंगाबाद : मागील वर्षी हरभरा व हरभरा डाळीला उच्चांकी भाव मिळाला होता. यामुळे  यंदा शेतकर्‍यांनी रबी हंगामात ज्वारी, गव्हावरील लक्ष कमी करून १८६.४२ टक्के हरभर्‍याची पेरणी केली. मात्र, नवीन हरभरा हाती येण्यास आणखी दोन महिन्याचा अवधी बाकी असताना बाजारात मात्र, आतापासूनच हरभरा डाळीचे भाव गडगडण्यास सुरुवात झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे मार्चपर्यंत शेतकर्‍यांच्या हाती हरभरा पीक येईपर्यंत योग्य भाव मिळावा म्हणून सरकारने ३० टक्के आयात शुल्क लावले. मात्र, भाव वाढण्यापेक्षा कमी झाले. 

औरंगाबाद विभागात औरंगाबादसह जालना व बीड जिल्ह्याचा समावेश आहे. येथे ६ लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ६ लाख ३० हजार ९२८ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात ७६.६७ टक्के, जालन्यात ११०.८० टक्के तर बीड जिल्ह्यात १००.२८ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. पेरणीच्या बाबतीत औरंगाबाद जिल्हा मागे आहे. कृषी अधिकार्‍यांच्या मते ८५-८८ टक्क्यांपर्यंतच औरंगाबाद जिल्ह्यात रबीची पेरणी पूर्ण होईल. यंदा तिन्ही जिल्ह्यांतील शेतकर्‍यांनी गहू,ज्वारीऐवजी हरभरा पिकाला अधिक प्राधान्य दिले. कारण हरभर्‍याला एक ते दोन पाण्याच्या पाळ्या दिला तरी पीक चांगले येते. रोग पडण्याचा धोकाही कमी असतो. यामुळेच जिथे सरासरी १ लाख १७ हजार ४२८ हेक्टरवर हरभर्‍याचे पीक घेतल्या जात तेथे आजमितीपर्यंत २ लाख १८ हजार ९१५ हेक्टरवर हरभरा पेरणी पूर्ण झाली आहे. म्हणजेच तब्बल १८६.४२ टक्के आजपर्यंतची सर्वाधिक पेरणीची नोंद झाली आहे. डाळीचे व्यापारी नीलेश सोमाणी यांनी सांगितले की, मागील वर्षी आॅगस्ट २०१६ दरम्यान हरभरा डाळ ९००० ते ९५०० रुपये तर हरभरा ७००० ते ७५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत विकला होता.

यामुळे शेतकर्‍यांनी हरभर्‍याच्या पेरणीकडे आपले लक्ष केंद्रित केले. अशीच परिस्थिती देशभरातील आहे. यामुळे  पुढील वर्षी हरभराचे बंपर उत्पादन होणार हे आता निश्चित झाले आहे. याचा विचार करून केंद्र सरकारने २१ डिसेंबर रोजी ३० टक्के आयात शुल्क वाढवून टाकले. पण याचा क्षणिक परिणाम जाणवला, पण पुन्हा क्विंटलमागे १ हजार रुपयांनी भाव गडगडले. सध्या हरभरा ३८०० ते ४१५० रुपये तर हरभरा  डाळ ५००० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल विकत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हरभरा व डाळीचे भाव निम्मेच झाले आहेत.  यंदा नवीन हरभरा येण्याआधीच भाव गडगडल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. 

सात राज्यांत हरभरा पीक देशात महाराष्ट्रासह राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश या सात राज्यांत मोठ्या प्रमाणात हरभरा पीक घेतल्या जाते. दरवर्षी सुमारे ६५ लाख टन हरभरा देशाभरात पिकविला जातो. तरीही हरभर्‍याची मागणी कायम असते. त्यामुळे दरवर्षी आॅस्ट्रेलिया आणि  टांझानिया येथून सुमारे २० लाख टन हरभरा भारतात आयात केला जातो. देशात हरभराचे बंपर उत्पादन होणार हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने आयातीवर ३० टक्के शुल्क लावले आहे. सरकारने हरभर्‍याला ४४०० रुपये प्रतिक्विंटल किमान मूल्य दर (एमएसपी) काढला आहे; पण बाजारात हरभर्‍याचे भाव ३८०० रुपयांपर्यंत खाली येऊन ठेपले आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादBeedबीडJalanaजालना